शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

‘मिशन’ म्हणून काम करा

By admin | Updated: October 6, 2015 23:46 IST

संदेश कोंडविलकर : चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा

चिपळूण : आता नगर परिषद व त्या नंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका येणार आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वत: निवडून येताना आपल्या सहकाऱ्यांनाही निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. सेना - भाजपमध्ये वाद आहेत. ते एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. उपाशी भाजपवाल्यांना खाण्याशिवाय काही दिसत नाही. त्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही. निवडणूक कार्यक्रम मिशन म्हणून पूर्ण करा, असे आवाहन निरीक्षक संदेश कोंडविलकर यांनी केले.चिपळूण येथे राधाताई लाड सभागृहात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा व गणेश सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. यावेळी पक्ष निरीक्षक कोंडविलकर, प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रमेश कदम, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, सभापती समीक्षा बागवे, पंचायत समिती सदस्या स्नेहा मेस्त्री, महिलाध्यक्षा चित्रा चव्हाण, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी त्यांचे स्वागत केले.गणेशोत्सव काळात घेतलेल्या गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार प्रथम पारितोषिक श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण, द्वितीय क्रमांक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बहाद्दूरशेख नाका, तृतीय क्रमांक महर्षी अण्णासाहेब कर्वे मंडई, चिपळूण तर उत्तेजनार्थ पोफळी गणेशोत्सव मंडळ व नवतरुण मित्र मंडळ, खेर्डी यांना गौरविण्यात आले.प्रदेश उपाध्यक्ष कदम यांनी आपण पालिकेकडे लक्ष दिले असून, पालिकेचा हागणदारीमुक्त म्हणून गौरव झाला आहे. हे यश सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे असल्याने कर्मचाऱ्यांचाही गौरव व्हायला हवा, असे सांगितले. तर जिल्हाध्यक्ष निकम यांनी सांगितले की, शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढणे गरजेचे आहे. विधानसभेला आपल्याला १० हजार मतांची आघाडी शहरातून अपेक्षित होती पण प्रत्यक्षात ३५०० मतांचीच आघाडी मिळाली हे चित्र बदलणे गरजेचे आहे. सुनील तटकरे, निरंजन डावखरे यांनीही फारसा संपर्क ठेवला नाही. त्यामुळे आता अधिक जोमाने काम करा, असे सांगितले. (प्रतिनिधी)रिकाम्या खुर्च्यांनी लक्ष वेधलेराष्ट्रवादीच्या आजच्या या मेळाव्याबाबत कार्यकर्ते व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये उदासिनता जाणवली. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या तालुक्यात केवळ दीड - दोनशे कार्यकर्तेच उपस्थित होते. रिकाम्या खुर्च्यांची संख्या उपस्थितांचे लक्ष वेधत होती.माजी आमदार रमेश कदम यांनी ग्रामीण भागात नियोजन नसल्याचे सांगून येताना प्रत्येक कार्यकर्त्याने १० ते १५ अन्य सहकाऱ्यांना आणायला हवे होते असे सुचवून आपल्याच पदाधिकाऱ्यांना चिमटा काढला. यातून मेळावा फसल्याचेच त्यांनी सूचित केले.