शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

‘मिशन’ म्हणून काम करा

By admin | Updated: October 6, 2015 23:46 IST

संदेश कोंडविलकर : चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा

चिपळूण : आता नगर परिषद व त्या नंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका येणार आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वत: निवडून येताना आपल्या सहकाऱ्यांनाही निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. सेना - भाजपमध्ये वाद आहेत. ते एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. उपाशी भाजपवाल्यांना खाण्याशिवाय काही दिसत नाही. त्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही. निवडणूक कार्यक्रम मिशन म्हणून पूर्ण करा, असे आवाहन निरीक्षक संदेश कोंडविलकर यांनी केले.चिपळूण येथे राधाताई लाड सभागृहात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा व गणेश सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. यावेळी पक्ष निरीक्षक कोंडविलकर, प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रमेश कदम, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, सभापती समीक्षा बागवे, पंचायत समिती सदस्या स्नेहा मेस्त्री, महिलाध्यक्षा चित्रा चव्हाण, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी त्यांचे स्वागत केले.गणेशोत्सव काळात घेतलेल्या गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार प्रथम पारितोषिक श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण, द्वितीय क्रमांक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बहाद्दूरशेख नाका, तृतीय क्रमांक महर्षी अण्णासाहेब कर्वे मंडई, चिपळूण तर उत्तेजनार्थ पोफळी गणेशोत्सव मंडळ व नवतरुण मित्र मंडळ, खेर्डी यांना गौरविण्यात आले.प्रदेश उपाध्यक्ष कदम यांनी आपण पालिकेकडे लक्ष दिले असून, पालिकेचा हागणदारीमुक्त म्हणून गौरव झाला आहे. हे यश सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे असल्याने कर्मचाऱ्यांचाही गौरव व्हायला हवा, असे सांगितले. तर जिल्हाध्यक्ष निकम यांनी सांगितले की, शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढणे गरजेचे आहे. विधानसभेला आपल्याला १० हजार मतांची आघाडी शहरातून अपेक्षित होती पण प्रत्यक्षात ३५०० मतांचीच आघाडी मिळाली हे चित्र बदलणे गरजेचे आहे. सुनील तटकरे, निरंजन डावखरे यांनीही फारसा संपर्क ठेवला नाही. त्यामुळे आता अधिक जोमाने काम करा, असे सांगितले. (प्रतिनिधी)रिकाम्या खुर्च्यांनी लक्ष वेधलेराष्ट्रवादीच्या आजच्या या मेळाव्याबाबत कार्यकर्ते व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये उदासिनता जाणवली. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या तालुक्यात केवळ दीड - दोनशे कार्यकर्तेच उपस्थित होते. रिकाम्या खुर्च्यांची संख्या उपस्थितांचे लक्ष वेधत होती.माजी आमदार रमेश कदम यांनी ग्रामीण भागात नियोजन नसल्याचे सांगून येताना प्रत्येक कार्यकर्त्याने १० ते १५ अन्य सहकाऱ्यांना आणायला हवे होते असे सुचवून आपल्याच पदाधिकाऱ्यांना चिमटा काढला. यातून मेळावा फसल्याचेच त्यांनी सूचित केले.