शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

मिलिंद चव्हाण यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:13 IST

रत्नागिरी : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महासंचालक संजय पांडे यांनी बोधचिन्ह, सन्मानचिन्ह ...

रत्नागिरी : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महासंचालक संजय पांडे यांनी बोधचिन्ह, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक जाहीर केले आहे. राज्यातील ७९९ कर्मचाऱ्यांना हा सन्मान प्राप्त झाला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील २४ कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. रत्नागिरीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद भिकाजी चव्हाण यांना जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी सन्मानचिन्हाने सन्मानित करण्यात आले.

गेले वर्षभर कोरोना परिस्थितीमध्येही दिवस-रात्र पोलीस दल राज्यभर कार्यरत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पोलीस अहोरात्र सेवा देत आहेत. कोरोना काळात सेवा बजावून विविध गुन्ह्यांचा तपास तेवढ्याच तत्परतेने केला जात आहे. गेली अनेक वर्ष उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या राज्यातील ७९९ पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठीवर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी कौतुकाची थाप मारली आहे.

यात रत्नागिरी जिल्ह्यातील २४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रत्नागिरीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने, प्रकाश शिंदे, संजय उकार्डे, नाना शिवगण, मिलिंद चव्हाण, पोलीस हवालदार सचिन साळवी, प्रकाश मोरे, प्रशांत मसुरकर, जितेंद्र कदम, महेश कुबडे, प्रफुल्ल तारये, सचिन भुजबळराव, विनोद भितळे, अजय शिंदे, नितीन कुड, संजय मुठगर, मोहन कांबळे, संदीप महाडिक, नितीन डोमणे, विजय मावळंकर, प्रशांत बोरकर, पोलीस नाईक संदीप मालप, पूनम वाडकर यांना पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ उत्कृष्ट काम केल्याबद्दल, तर रोहन गमरे यांना राज्य पातळीवरील उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मान प्राप्त झाला आहे.

शहरानजिकच्या मिलिंद भिकाजी चव्हाण यांच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवाकार्याबद्दल महासंचालकानी जाहीर केलेल्या पुरस्काराबद्दल जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

या बातमीला ३ रोजीच्या शोभना फोल्डरला मिलिंद चव्हाण नावाने फोटो आहेत.

फोटो मजकूर

आंबेशेत (ता. रत्नागिरी) येथील मिलिंद भिकाजी चव्हाण यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल महाराष्ट्र दिनी महासंचालकानी जाहीर केलेल्या पुरस्काराबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या हस्ते रत्नागिरीत सन्मानित करण्यात आले.