शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

जिल्हास्तरावर युती अशक्यच

By admin | Updated: October 28, 2016 23:42 IST

पालिका निवडणूक : अर्ज भरून झाले, समजावणार कोणाला; दोन्ही पक्ष कात्रीत

रत्नागिरी : पक्षांकडून सर्व प्रभागांमधील उमेदवार निश्चित झाले. अधिकृत उमेदवारीचे एबी फॉर्म वितरित झाले. आता युती करून माघार घ्यायला सांगायचे कोणाला, समजूत कोणाकोणाची घालणार आणि मुख्य म्हणजे युतीतल्या युतीमध्येच पक्षांतर केलेल्यांना काय समजावणार, असे प्रश्न शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांसमोर असल्याने राज्यस्तरावर युतीची घोषणा झाली असली, तरी रत्नागिरी जिल्ह्यात मात्र शिवसेना आणि भाजपची युती होणे अशक्य असल्याचे मत दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून व्यक्त केले जात आहे. वेळ निघून गेल्यानंतर झालेली युतीची घोषणा ही केवळ दिखाव्यासाठीच आहे की काय, असा प्रश्नही दोन्ही पक्षांमधून पुढे येत आहे. शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची गुरूवारी दूरध्वनीवरून चर्चा झाली आणि त्यानंतर खासदार संजय राऊत व रावसाहेब दानवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राज्यात शिवसेना-भाजप युतीने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर करण्यात आले. राज्यस्तरावरून युतीची घोषणा झाली असली, तरी जिल्हास्तरावर मात्र त्याबाबत फारसा उत्साह नाही. मुळात गेले काही दिवस दोन्ही पक्षांमध्ये मोठी ओढाताण सुरू आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांना राष्ट्रवादी किंवा काँग्रेसपेक्षा एकमेकांविरूद्धच लढण्याची ईर्षा अधिक आहे, असे चित्र सध्या दिसत आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांमुळे या दोन्ही पक्षांनी एकमेकांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्याकडे ओढण्यासाठी गेला बराच काळ जोरदार प्रयत्न केले आहेत. उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेतून भाजपमध्ये आणि भाजपमधून शिवसेनेमध्ये गेलेल्यांची संख्या बरीच आहे. युती झाली तर या पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय समजावणार, हा मोठा प्रश्न आहे. रत्नागिरीसारख्या ठिकाणी ३0 जागांची निवडणूक होत असताना ९0-१00 कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली आहे. कोणाकोणाला उमेदवारी द्यायची, असा प्रश्न आधीच या पक्षांसमोर आहे. जर युती झाली तर १५-१५ जागा देणार तरी कोणाला, हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना आता युती करण्यात स्वारस्य नाही, असाच मुद्दा दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून मांडला जात आहे. त्यामुळे राज्यस्तरावरून घोषणा झाली असली, तरी युती होण्याची शक्यता नाही, असे ठाम मत दोन्ही बाजूंचे नेते व्यक्त करत आहेत. (प्रतिनिधी) अजूनही पक्षांतरे सुरूच उमेदवारी मिळाली नाही या कारणास्तव अजूनही शिवसेनेतून भाजपमध्ये आणि भाजपमधून शिवसेनेत अशा पक्षांतरांना जिल्ह्यात वेग आला आहे. राजापूरपासून दापोलीपर्यंत ही पक्षांतरे सुरू आहेत. उद्या शनिवारी उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यावेळी आणखी काही पक्षांतरे समोर येण्याची शक्यता आहे. बाबा बार्इंग, संजय पुनसकर यांच्यासह अनेकजण भाजपमधून शिवसेनेत गेले आहेत. शिवसेनेतील काहीजण उद्या भाजपमध्ये जाण्याची मोठी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर युतीची शक्यता कमीच आहे. नगराध्यक्ष उमेदवारी द्यायची कोणाला? स्थानिक पातळीवर युती झाली तर उमेदवारी शिवसेनेला की भाजपला हाच प्रश्न मोठा असेल. याआधी युतीने निवडणूक लढवल्यानंतर पहिले सव्वा वर्ष शिवसेनेकडे नगराध्यक्ष पद होते. त्यानंतर हे पद भाजपकडे गेले आणि सव्वा वर्षानंतर भाजपने हे पद सोडलेच नाही. त्यामुळे आता शिवसेना-भाजपमधील वादाची दरी खूपच रूंदावली आहे. त्यामुळे राज्यस्तरावर दोन्ही पक्षांनी काहीही निर्णय घेतला तरी स्थानिक पातळीवर युती होणे अवघड आहे.