शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

शहरासह जिल्ह्यात मुसळधार

By admin | Updated: June 14, 2016 00:04 IST

मान्सूनपूर्व पाऊस : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वृष्टी; हवामान खात्याचा निर्वाळा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला असून, सोमवारी सकाळपासूनच सरीवर सरी कोसळू लागल्या आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १६६.५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्ह्यात शनिवारपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. रविवारी काहीशी विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी पहाटेपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून रत्नागिरी शहरात संततधार सुरू असल्याने शहरातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. दिवसभर पाऊस सुरू होता. त्यामुळे हा मान्सूनचा पाऊस असल्याचा अंदाज नागरिकांकडून व्यक्त होत होता. मात्र, हवामान खात्याने हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे स्पष्ट केले आहे. समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मेघगर्जनेसह पाऊस पडत असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी बरसलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. जयस्तंभ, जेलरोड, लक्ष्मी चौक, जिल्हा परिषद रोड, आदी भागात अर्धा फूट पाणी साचले होते. रत्नागिरीतील मुख्य रस्त्यावर जिल्हा परिषदेनजीक मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने चढावातून वाहने नेताना तारेवरची कसरत करावी लागत होती. शहरातील फगरवठार येथील ओढ्याला पूर येऊन पूल पाण्याखाली गेला होता.दरम्यान, हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र पडला आहे. चिपळूण, देवरुख आदी भागातही सोमवारी पाऊस झाला. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यांमध्ये किरकोळ सरी, तर गुहागर, लांजा आणि राजापूरमध्ये मध्यम प्रकारचा, रत्नागिरी शहरासह संपूर्ण तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे.जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झालेल्या दूरध्वनी संदेशानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यातील खोरनिनको येथे एका घराचे किरकोळ नुकसान झाले. तसेच सायंकाळच्या सुमारास रत्नागिरी शहरानजीकच्या निवखोल येथील एका चाळीवर बांध कोसळून मातीचा ढिगारा घरात कोसळला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी दिली. (प्रतिनिधी)