शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले

By admin | Updated: October 9, 2016 23:23 IST

भातपिकाचे नुकसान : जनजीवन विस्कळीत; लांजा तालुक्यात काही गावांचा वीज पुरवठा खंडित

रत्नागिरी : परतीच्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जोर धरला असून रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात रविवारी दिवसभर संतंतधार सुरू होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे कोठेही पडझड झाल्याचे वृत्त नसले तरी भातशेतीला मोठा फटका बसला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी रात्री जोरदार पुनरागमन केले. मध्यरात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत अव्याहतपणे पाऊस बरसत होता. सध्या नवरात्रौत्सवानिमित्त सर्वत्र दांडिया रंगू लागले असतानाच या पावसामुळे महिला व नागरिकांचा हिरमोड झाला. रविवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. चिपळूण शहरासह तालुक्यात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. मात्र, पावसाचा म्हणावा तसा जोर नसल्याने दिवसभर ढगाळ वातावरण होते. राजापूर तालुक्यात दिवसभर किरकोळ सरी बरसल्या. लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र जोरदार पाऊस बरसत होता. पहाटेपासून सुरू झालेला पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत बरसत होता. त्यामुळे तालुक्यातील काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. संगमेश्वर तालुक्यातील देवरूख, बावनदी, उक्षी, आदी परिसरातही रविवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागात मुसळधार पाऊस बरसत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गुहागर, मंडणगड, खेड तालुक्यांतही रविवारी पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झाले होते. दापोली परिसरात रविवारी सकाळी मुसळधार पाऊस बरसला. मात्र, सायंकाळी पावसाचा जोर ओसरला. भातशेतीची वाताहत जिल्ह्यात हळव्या जातीचे भात ४० टक्के, निमगरव्या जातीचे ४० टक्के, तर गरव्या जातीच्या भाताची लागवड २० टक्के क्षेत्रावर करण्यात आली आहे. हळवे भात तयार झाले असून, शेतकऱ्यांनी कापणीस प्रारंभ केला आहे. घटस्थापनेपूर्वी पाऊस चांगला बरसला होता. घटस्थापनेनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली होती, परंतु रविवारी सकाळपासून दिवसभर मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. शनिवारी कापलेले भात पाण्यावर तरंगू लागल्याचे विदारक दृश्य आता दिसू लागले आहे. निमगरवे भातदेखील तयार झाले असून, त्यामुळे या भातशेतीलाही पावसाचा फटका बसला आहे. गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस गतवर्षी सरासरी दोन हजार ७५४.२९ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता, परंतु यावर्षी आतापर्यंत चार हजार १५५.७२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यंदाचा पाऊस दुप्पट असल्याचे दिसून येते.