शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले

By admin | Updated: October 9, 2016 23:23 IST

भातपिकाचे नुकसान : जनजीवन विस्कळीत; लांजा तालुक्यात काही गावांचा वीज पुरवठा खंडित

रत्नागिरी : परतीच्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जोर धरला असून रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात रविवारी दिवसभर संतंतधार सुरू होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे कोठेही पडझड झाल्याचे वृत्त नसले तरी भातशेतीला मोठा फटका बसला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी रात्री जोरदार पुनरागमन केले. मध्यरात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत अव्याहतपणे पाऊस बरसत होता. सध्या नवरात्रौत्सवानिमित्त सर्वत्र दांडिया रंगू लागले असतानाच या पावसामुळे महिला व नागरिकांचा हिरमोड झाला. रविवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. चिपळूण शहरासह तालुक्यात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. मात्र, पावसाचा म्हणावा तसा जोर नसल्याने दिवसभर ढगाळ वातावरण होते. राजापूर तालुक्यात दिवसभर किरकोळ सरी बरसल्या. लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र जोरदार पाऊस बरसत होता. पहाटेपासून सुरू झालेला पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत बरसत होता. त्यामुळे तालुक्यातील काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. संगमेश्वर तालुक्यातील देवरूख, बावनदी, उक्षी, आदी परिसरातही रविवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागात मुसळधार पाऊस बरसत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गुहागर, मंडणगड, खेड तालुक्यांतही रविवारी पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झाले होते. दापोली परिसरात रविवारी सकाळी मुसळधार पाऊस बरसला. मात्र, सायंकाळी पावसाचा जोर ओसरला. भातशेतीची वाताहत जिल्ह्यात हळव्या जातीचे भात ४० टक्के, निमगरव्या जातीचे ४० टक्के, तर गरव्या जातीच्या भाताची लागवड २० टक्के क्षेत्रावर करण्यात आली आहे. हळवे भात तयार झाले असून, शेतकऱ्यांनी कापणीस प्रारंभ केला आहे. घटस्थापनेपूर्वी पाऊस चांगला बरसला होता. घटस्थापनेनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली होती, परंतु रविवारी सकाळपासून दिवसभर मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. शनिवारी कापलेले भात पाण्यावर तरंगू लागल्याचे विदारक दृश्य आता दिसू लागले आहे. निमगरवे भातदेखील तयार झाले असून, त्यामुळे या भातशेतीलाही पावसाचा फटका बसला आहे. गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस गतवर्षी सरासरी दोन हजार ७५४.२९ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता, परंतु यावर्षी आतापर्यंत चार हजार १५५.७२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यंदाचा पाऊस दुप्पट असल्याचे दिसून येते.