शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले

By admin | Updated: October 9, 2016 23:23 IST

भातपिकाचे नुकसान : जनजीवन विस्कळीत; लांजा तालुक्यात काही गावांचा वीज पुरवठा खंडित

रत्नागिरी : परतीच्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जोर धरला असून रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात रविवारी दिवसभर संतंतधार सुरू होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे कोठेही पडझड झाल्याचे वृत्त नसले तरी भातशेतीला मोठा फटका बसला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी रात्री जोरदार पुनरागमन केले. मध्यरात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत अव्याहतपणे पाऊस बरसत होता. सध्या नवरात्रौत्सवानिमित्त सर्वत्र दांडिया रंगू लागले असतानाच या पावसामुळे महिला व नागरिकांचा हिरमोड झाला. रविवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. चिपळूण शहरासह तालुक्यात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. मात्र, पावसाचा म्हणावा तसा जोर नसल्याने दिवसभर ढगाळ वातावरण होते. राजापूर तालुक्यात दिवसभर किरकोळ सरी बरसल्या. लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र जोरदार पाऊस बरसत होता. पहाटेपासून सुरू झालेला पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत बरसत होता. त्यामुळे तालुक्यातील काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. संगमेश्वर तालुक्यातील देवरूख, बावनदी, उक्षी, आदी परिसरातही रविवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागात मुसळधार पाऊस बरसत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गुहागर, मंडणगड, खेड तालुक्यांतही रविवारी पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन मात्र विस्कळीत झाले होते. दापोली परिसरात रविवारी सकाळी मुसळधार पाऊस बरसला. मात्र, सायंकाळी पावसाचा जोर ओसरला. भातशेतीची वाताहत जिल्ह्यात हळव्या जातीचे भात ४० टक्के, निमगरव्या जातीचे ४० टक्के, तर गरव्या जातीच्या भाताची लागवड २० टक्के क्षेत्रावर करण्यात आली आहे. हळवे भात तयार झाले असून, शेतकऱ्यांनी कापणीस प्रारंभ केला आहे. घटस्थापनेपूर्वी पाऊस चांगला बरसला होता. घटस्थापनेनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली होती, परंतु रविवारी सकाळपासून दिवसभर मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. शनिवारी कापलेले भात पाण्यावर तरंगू लागल्याचे विदारक दृश्य आता दिसू लागले आहे. निमगरवे भातदेखील तयार झाले असून, त्यामुळे या भातशेतीलाही पावसाचा फटका बसला आहे. गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस गतवर्षी सरासरी दोन हजार ७५४.२९ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता, परंतु यावर्षी आतापर्यंत चार हजार १५५.७२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यंदाचा पाऊस दुप्पट असल्याचे दिसून येते.