शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

जिल्ह्याने ओलांडला ११ हजारांचा टप्पा; एकाचदिवशी ८७ ची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्ह्याने मार्च महिन्याच्याअखेरीस ११ हजारांचा टप्पा ओलांडला असून, बुधवारी नवीन ८७ रुग्णांची भर पडली. आरटीपीसीआर चाचणीत ४३, ...

रत्नागिरी : जिल्ह्याने मार्च महिन्याच्याअखेरीस ११ हजारांचा टप्पा ओलांडला असून, बुधवारी नवीन ८७ रुग्णांची भर पडली. आरटीपीसीआर चाचणीत ४३, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचणीत ४४ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत. यापैकी चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक ३२ रुग्ण आहेत. केवळ मार्च महिन्यात जिल्हयात १०५५ रुग्णांची नोंद झाली आहे.

होळीच्या सणासाठी कोरोनाचा हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबईहून अनेक चाकरमानी आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत आलेल्या चाकरमान्यांमुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढू लागली आहे. बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्या ८७ रुग्णांची भर पडली. यात रत्नागिरी आणि खेड प्रत्येकी १३, दापोली १६, चिपळूण ३२, गुहागर ४, संगमेश्वर ६, लांजा २ आणि राजापुरातील एका रुग्णाचा समावेश आहे. मंडणगडात एकही रुग्णाची नोंद नाही. कोरोनामुक्त झालेल्या ३० रुग्णांना बुधवारी घरी सोडण्यात आले. ८६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

जिल्ह्यातील पाॅझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आतापर्यंत ११,०२९ झाली आहे. १०,१०५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी परतले आहेत. ३७६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. १,००,२८६ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ४६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २७२ रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३७६ असून, मृत्यू दरात काहीशी घट होत आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढू लागल्याने त्या तुलनेत बरे झालेल्यांची टक्केवारी ९४ टक्क्यांवरून ९१.६२ टक्के इतकी दिसत आहे.