शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

जिल्ह्याने ओलांडला ११ हजारांचा टप्पा; एकाचदिवशी ८७ ची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्ह्याने मार्च महिन्याच्याअखेरीस ११ हजारांचा टप्पा ओलांडला असून, बुधवारी नवीन ८७ रुग्णांची भर पडली. आरटीपीसीआर चाचणीत ४३, ...

रत्नागिरी : जिल्ह्याने मार्च महिन्याच्याअखेरीस ११ हजारांचा टप्पा ओलांडला असून, बुधवारी नवीन ८७ रुग्णांची भर पडली. आरटीपीसीआर चाचणीत ४३, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचणीत ४४ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत. यापैकी चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक ३२ रुग्ण आहेत. केवळ मार्च महिन्यात जिल्हयात १०५५ रुग्णांची नोंद झाली आहे.

होळीच्या सणासाठी कोरोनाचा हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबईहून अनेक चाकरमानी आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत आलेल्या चाकरमान्यांमुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढू लागली आहे. बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्या ८७ रुग्णांची भर पडली. यात रत्नागिरी आणि खेड प्रत्येकी १३, दापोली १६, चिपळूण ३२, गुहागर ४, संगमेश्वर ६, लांजा २ आणि राजापुरातील एका रुग्णाचा समावेश आहे. मंडणगडात एकही रुग्णाची नोंद नाही. कोरोनामुक्त झालेल्या ३० रुग्णांना बुधवारी घरी सोडण्यात आले. ८६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

जिल्ह्यातील पाॅझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आतापर्यंत ११,०२९ झाली आहे. १०,१०५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी परतले आहेत. ३७६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. १,००,२८६ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ४६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २७२ रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३७६ असून, मृत्यू दरात काहीशी घट होत आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढू लागल्याने त्या तुलनेत बरे झालेल्यांची टक्केवारी ९४ टक्क्यांवरून ९१.६२ टक्के इतकी दिसत आहे.