शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

गावांचा विकास आराखडा तयार करावा : जिल्हाधिकारी

By admin | Updated: May 21, 2015 00:07 IST

योजनांची राबवत असताना आखून देण्यात आलेल्या वेळापत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, त्यादृष्टीने विकास आराखडा तयार करावा,

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून सहभागी गावांचा कायापालट करण्याची संधी प्राप्त झाली आहे. विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून आदर्श गाव साकार होऊ शकेल. गावाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून सर्व विभागप्रमुखांनी या गावांचा ग्राम विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना राधाकृष्णन म्हणाले, संसद आदर्श ग्राम योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. योजनेच्या माध्यमातून गावांच्या भौतिक प्रगतीबरोबरच आर्थिक उन्नती साधायची आहे. त्यादृष्टीने योजनेत नमूद केलेल्या विकासाच्या मुद्द्यांनुसार अंमलबजावणी कार्यक्रमाची आखणी करावी आणि गावांमध्ये विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व विभागांनी विशेष प्रयत्न करावेत. योजनांची राबवत असताना आखून देण्यात आलेल्या वेळापत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, त्यादृष्टीने विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विद्या मोरबाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. विवेक पनवेलकर, महिला बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. शेख, समाजल्याण विभागाचे सहायक आयुक्त अर्जुन बन्ने, यशदा, पुणेच्या प्रशिक्षिका सुरेखा जोशी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.यावेळी योजनेचा आराखडा तयार करण्याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)