शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा

By admin | Updated: December 30, 2014 23:34 IST

पाण्याचे दुर्भिक्ष्य : पाणीच नसल्याने विद्यार्थ्यांना सुटी

रत्नागिरी : नाचणे येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची पाईपलाईन गंजली आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने आठवड्यातून तीन ते चार वेळा हजेरी घेऊन विद्यार्थ्यांना सुटी देण्यात येत आहे. संबंधित प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडला असून, शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत आयटीआय प्रशासन हतबल झाल्याने आज या विद्यार्थ्यांनीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पाईपलाईनची दुरूस्ती होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल, असा दिलासा दिला आहे.शहरातील नाचणे येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची पाईपलाईन अनेक वर्षांपासून गंजलेली आहे. त्यामुळे संस्थेला पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना कल्पना दिली होती. मात्र, आयटीआय प्रशासनाने याबाबत हतबलता दर्शवीत आपण नगरपरिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केला असून, जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिल्याचे या विद्यार्थ्यांना सांगितले. अधूनमधून आयटीआय प्रशासनाकडून एखादा टँकर मागवला जात होता. मात्र, त्याद्वारे मिळणारे पाणी अपुरे असेच आहे. आता तर या मुलांना पाण्याची समस्या अधिकच भेडसावू लागली आहे. गंजलेल्या पाईपलाईनमुळे सुमारे ८०० ते ९०० विद्यार्थ्यांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. त्यामुळे आठवड्यातून तीन ते चार वेळा हजेरी घेऊन विद्यार्थ्यांना सुटी देण्यात येत आहे. वसतिगृहात असलेल्या ४० मुलांची समस्या तर अधिकच बिकट आहे. त्यांना पाण्याअभावी जेवणासह सर्वच बाबतीत गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. संबंधित प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडला असून, शैक्षणिक नुकसान होत आहे. अखेर आज सुमारे ३५० विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकले. यावेळी पाच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या या समस्येबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या मुलांची समस्या ऐकून घेतली. आयटीआय प्रशासनाने पाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी तयार केलेल्या प्रस्तावात त्रुटी आहेत. त्यामुळे ही पाईपलाईन बदलण्यास विलंब होईल. अर्थात त्यासाठी लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी यात स्वत: लक्ष घालण्यात येईल. असे त्यांनी सांगितले. तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी संबंधित विभागाला त्वरित आदेश काढण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनीच ही जबाबदारी घेतल्याने या विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. (प्रतिनिधी)