शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा

By admin | Updated: December 30, 2014 23:34 IST

पाण्याचे दुर्भिक्ष्य : पाणीच नसल्याने विद्यार्थ्यांना सुटी

रत्नागिरी : नाचणे येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची पाईपलाईन गंजली आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने आठवड्यातून तीन ते चार वेळा हजेरी घेऊन विद्यार्थ्यांना सुटी देण्यात येत आहे. संबंधित प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडला असून, शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत आयटीआय प्रशासन हतबल झाल्याने आज या विद्यार्थ्यांनीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पाईपलाईनची दुरूस्ती होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल, असा दिलासा दिला आहे.शहरातील नाचणे येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची पाईपलाईन अनेक वर्षांपासून गंजलेली आहे. त्यामुळे संस्थेला पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना कल्पना दिली होती. मात्र, आयटीआय प्रशासनाने याबाबत हतबलता दर्शवीत आपण नगरपरिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केला असून, जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिल्याचे या विद्यार्थ्यांना सांगितले. अधूनमधून आयटीआय प्रशासनाकडून एखादा टँकर मागवला जात होता. मात्र, त्याद्वारे मिळणारे पाणी अपुरे असेच आहे. आता तर या मुलांना पाण्याची समस्या अधिकच भेडसावू लागली आहे. गंजलेल्या पाईपलाईनमुळे सुमारे ८०० ते ९०० विद्यार्थ्यांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. त्यामुळे आठवड्यातून तीन ते चार वेळा हजेरी घेऊन विद्यार्थ्यांना सुटी देण्यात येत आहे. वसतिगृहात असलेल्या ४० मुलांची समस्या तर अधिकच बिकट आहे. त्यांना पाण्याअभावी जेवणासह सर्वच बाबतीत गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. संबंधित प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडला असून, शैक्षणिक नुकसान होत आहे. अखेर आज सुमारे ३५० विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकले. यावेळी पाच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या या समस्येबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या मुलांची समस्या ऐकून घेतली. आयटीआय प्रशासनाने पाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी तयार केलेल्या प्रस्तावात त्रुटी आहेत. त्यामुळे ही पाईपलाईन बदलण्यास विलंब होईल. अर्थात त्यासाठी लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी यात स्वत: लक्ष घालण्यात येईल. असे त्यांनी सांगितले. तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी संबंधित विभागाला त्वरित आदेश काढण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनीच ही जबाबदारी घेतल्याने या विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. (प्रतिनिधी)