शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा

By admin | Updated: December 30, 2014 23:34 IST

पाण्याचे दुर्भिक्ष्य : पाणीच नसल्याने विद्यार्थ्यांना सुटी

रत्नागिरी : नाचणे येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची पाईपलाईन गंजली आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने आठवड्यातून तीन ते चार वेळा हजेरी घेऊन विद्यार्थ्यांना सुटी देण्यात येत आहे. संबंधित प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडला असून, शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत आयटीआय प्रशासन हतबल झाल्याने आज या विद्यार्थ्यांनीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पाईपलाईनची दुरूस्ती होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल, असा दिलासा दिला आहे.शहरातील नाचणे येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची पाईपलाईन अनेक वर्षांपासून गंजलेली आहे. त्यामुळे संस्थेला पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना कल्पना दिली होती. मात्र, आयटीआय प्रशासनाने याबाबत हतबलता दर्शवीत आपण नगरपरिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केला असून, जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिल्याचे या विद्यार्थ्यांना सांगितले. अधूनमधून आयटीआय प्रशासनाकडून एखादा टँकर मागवला जात होता. मात्र, त्याद्वारे मिळणारे पाणी अपुरे असेच आहे. आता तर या मुलांना पाण्याची समस्या अधिकच भेडसावू लागली आहे. गंजलेल्या पाईपलाईनमुळे सुमारे ८०० ते ९०० विद्यार्थ्यांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. त्यामुळे आठवड्यातून तीन ते चार वेळा हजेरी घेऊन विद्यार्थ्यांना सुटी देण्यात येत आहे. वसतिगृहात असलेल्या ४० मुलांची समस्या तर अधिकच बिकट आहे. त्यांना पाण्याअभावी जेवणासह सर्वच बाबतीत गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. संबंधित प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडला असून, शैक्षणिक नुकसान होत आहे. अखेर आज सुमारे ३५० विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकले. यावेळी पाच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या या समस्येबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या मुलांची समस्या ऐकून घेतली. आयटीआय प्रशासनाने पाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी तयार केलेल्या प्रस्तावात त्रुटी आहेत. त्यामुळे ही पाईपलाईन बदलण्यास विलंब होईल. अर्थात त्यासाठी लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी यात स्वत: लक्ष घालण्यात येईल. असे त्यांनी सांगितले. तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी संबंधित विभागाला त्वरित आदेश काढण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनीच ही जबाबदारी घेतल्याने या विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. (प्रतिनिधी)