शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जिल्हा बँकेच्या खातेदारांचा मोर्चा

By admin | Updated: November 16, 2016 23:30 IST

तीव्र असंतोष : ग्रामीण भागाचे अर्थकारण कोलमडल्याने संताप

चिपळूण : शासनाच्या धोरणानुसार १००० व ५०० रुपयांच्या नोटा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत स्वीकारल्या जात नसल्याने ग्रामीण भागाचे अर्थकारण अडचणीत आले आहे. जनतेची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या संतप्त ग्राहकांनी बुधवारी सकाळी बँकेच्या चिपळूण शिवाजी चौक शाखेवर मोर्चा काढला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कल्पना जगताप- भोसले व तहसीलदार जीवन देसाई यांना निवेदन दिले.चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे व ग्रामीण लघुउद्योजकांचे व ग्रामीण कारागीरांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सभासदांनी आज मोर्चा काढला. त्यांनी प्रथम ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याबद्दल चिपळूण शिवाजी चौक येथील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा कार्यालयावर धडक दिली. तेथे कर्जाचे हप्ते भरण्यासाठीही नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे शाखा अधिकारी यांनी सांगितले. ग्रामीण भागात बँकेकडून कर्ज घेऊन शेती व उद्योग, व्यवसाय केले जातात. त्या कर्जाचे हप्ते जिल्हा बँकेत भरले जातात. परंतु, जिल्हा बँकेत नोटा स्वीकारल्या जात नाहीत. केंद्र शासनाने सर्व बँकातून ३० डिसेंबरपूर्वी रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिलेले असताना जिल्हा बँक नोटा का स्वीकारत नाही, असा प्रश्न या सर्व खातेदारांनी उपस्थित केला आहे.ग्रामीण भागातील अनेक खातेदारांची इतर बँकांत बचत खाती नाहीत. अशा परिस्थितीत या ग्राहकांनी नोटा भरायच्या कुठे? शिवाय कर्जाचे हप्ते न फेडल्याने दंड व्याज वाढणार. त्यामुळे या ग्राहकांना मानसिक त्रास होत आहे. १००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची जिल्हा बँकेला परवानगी द्यावी, अशी आपली मागणी असून, ती रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडे कळवावी, अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांना देण्यात आले. सकाळी बँक खातेदार ग्राहकांच्या वतीने प्रभाकर आरेकर, अशोक कदम, रघुनाथ कुंभार, शंकर येलोंडे, रामचंद्र पडवले, हनुमंत पवार, दिलीप गमरे, शिवाजी गोटल, अंकुश कदम, राकेश जाधव, शिवाजी चिले, कालवे, श्रीधर शिंदे यांच्यासह विविध सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, संचालक, पतसंस्थांचे संचालक तसेच जिल्हा बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी चिपळूणचे उपविभागीय अधिकारी भोसले व तहसीलदार देसाई यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)प्रांत व तहसीलदारांना दिले निवेदन.१००० व ५०० नोटा जिल्हा बँक स्वीकारत नसल्याने अडचणीत वाढ.ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडले.ग्रामीण जनतेची होतेय ससेहोलपट. जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये १००० व ५००च्या नोटा स्वीकारण्याची मागणी.खातेदार, पतसंस्था, खविसंचे व सोसायट्यांचे संचालक उतरले रस्त्यावर.