शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

जिल्हा बँकेच्या खातेदारांचा मोर्चा

By admin | Updated: November 16, 2016 23:30 IST

तीव्र असंतोष : ग्रामीण भागाचे अर्थकारण कोलमडल्याने संताप

चिपळूण : शासनाच्या धोरणानुसार १००० व ५०० रुपयांच्या नोटा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत स्वीकारल्या जात नसल्याने ग्रामीण भागाचे अर्थकारण अडचणीत आले आहे. जनतेची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या संतप्त ग्राहकांनी बुधवारी सकाळी बँकेच्या चिपळूण शिवाजी चौक शाखेवर मोर्चा काढला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कल्पना जगताप- भोसले व तहसीलदार जीवन देसाई यांना निवेदन दिले.चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे व ग्रामीण लघुउद्योजकांचे व ग्रामीण कारागीरांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सभासदांनी आज मोर्चा काढला. त्यांनी प्रथम ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याबद्दल चिपळूण शिवाजी चौक येथील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा कार्यालयावर धडक दिली. तेथे कर्जाचे हप्ते भरण्यासाठीही नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे शाखा अधिकारी यांनी सांगितले. ग्रामीण भागात बँकेकडून कर्ज घेऊन शेती व उद्योग, व्यवसाय केले जातात. त्या कर्जाचे हप्ते जिल्हा बँकेत भरले जातात. परंतु, जिल्हा बँकेत नोटा स्वीकारल्या जात नाहीत. केंद्र शासनाने सर्व बँकातून ३० डिसेंबरपूर्वी रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिलेले असताना जिल्हा बँक नोटा का स्वीकारत नाही, असा प्रश्न या सर्व खातेदारांनी उपस्थित केला आहे.ग्रामीण भागातील अनेक खातेदारांची इतर बँकांत बचत खाती नाहीत. अशा परिस्थितीत या ग्राहकांनी नोटा भरायच्या कुठे? शिवाय कर्जाचे हप्ते न फेडल्याने दंड व्याज वाढणार. त्यामुळे या ग्राहकांना मानसिक त्रास होत आहे. १००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची जिल्हा बँकेला परवानगी द्यावी, अशी आपली मागणी असून, ती रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडे कळवावी, अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांना देण्यात आले. सकाळी बँक खातेदार ग्राहकांच्या वतीने प्रभाकर आरेकर, अशोक कदम, रघुनाथ कुंभार, शंकर येलोंडे, रामचंद्र पडवले, हनुमंत पवार, दिलीप गमरे, शिवाजी गोटल, अंकुश कदम, राकेश जाधव, शिवाजी चिले, कालवे, श्रीधर शिंदे यांच्यासह विविध सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, संचालक, पतसंस्थांचे संचालक तसेच जिल्हा बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी चिपळूणचे उपविभागीय अधिकारी भोसले व तहसीलदार देसाई यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)प्रांत व तहसीलदारांना दिले निवेदन.१००० व ५०० नोटा जिल्हा बँक स्वीकारत नसल्याने अडचणीत वाढ.ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडले.ग्रामीण जनतेची होतेय ससेहोलपट. जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये १००० व ५००च्या नोटा स्वीकारण्याची मागणी.खातेदार, पतसंस्था, खविसंचे व सोसायट्यांचे संचालक उतरले रस्त्यावर.