शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

जिल्हा बँकेच्या खातेदारांचा मोर्चा

By admin | Updated: November 16, 2016 23:30 IST

तीव्र असंतोष : ग्रामीण भागाचे अर्थकारण कोलमडल्याने संताप

चिपळूण : शासनाच्या धोरणानुसार १००० व ५०० रुपयांच्या नोटा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत स्वीकारल्या जात नसल्याने ग्रामीण भागाचे अर्थकारण अडचणीत आले आहे. जनतेची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या संतप्त ग्राहकांनी बुधवारी सकाळी बँकेच्या चिपळूण शिवाजी चौक शाखेवर मोर्चा काढला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कल्पना जगताप- भोसले व तहसीलदार जीवन देसाई यांना निवेदन दिले.चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे व ग्रामीण लघुउद्योजकांचे व ग्रामीण कारागीरांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सभासदांनी आज मोर्चा काढला. त्यांनी प्रथम ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याबद्दल चिपळूण शिवाजी चौक येथील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा कार्यालयावर धडक दिली. तेथे कर्जाचे हप्ते भरण्यासाठीही नोटा स्वीकारल्या जात नसल्याचे शाखा अधिकारी यांनी सांगितले. ग्रामीण भागात बँकेकडून कर्ज घेऊन शेती व उद्योग, व्यवसाय केले जातात. त्या कर्जाचे हप्ते जिल्हा बँकेत भरले जातात. परंतु, जिल्हा बँकेत नोटा स्वीकारल्या जात नाहीत. केंद्र शासनाने सर्व बँकातून ३० डिसेंबरपूर्वी रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिलेले असताना जिल्हा बँक नोटा का स्वीकारत नाही, असा प्रश्न या सर्व खातेदारांनी उपस्थित केला आहे.ग्रामीण भागातील अनेक खातेदारांची इतर बँकांत बचत खाती नाहीत. अशा परिस्थितीत या ग्राहकांनी नोटा भरायच्या कुठे? शिवाय कर्जाचे हप्ते न फेडल्याने दंड व्याज वाढणार. त्यामुळे या ग्राहकांना मानसिक त्रास होत आहे. १००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची जिल्हा बँकेला परवानगी द्यावी, अशी आपली मागणी असून, ती रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडे कळवावी, अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांना देण्यात आले. सकाळी बँक खातेदार ग्राहकांच्या वतीने प्रभाकर आरेकर, अशोक कदम, रघुनाथ कुंभार, शंकर येलोंडे, रामचंद्र पडवले, हनुमंत पवार, दिलीप गमरे, शिवाजी गोटल, अंकुश कदम, राकेश जाधव, शिवाजी चिले, कालवे, श्रीधर शिंदे यांच्यासह विविध सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, संचालक, पतसंस्थांचे संचालक तसेच जिल्हा बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी चिपळूणचे उपविभागीय अधिकारी भोसले व तहसीलदार देसाई यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)प्रांत व तहसीलदारांना दिले निवेदन.१००० व ५०० नोटा जिल्हा बँक स्वीकारत नसल्याने अडचणीत वाढ.ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडले.ग्रामीण जनतेची होतेय ससेहोलपट. जिल्हा बँकेच्या सर्व शाखांमध्ये १००० व ५००च्या नोटा स्वीकारण्याची मागणी.खातेदार, पतसंस्था, खविसंचे व सोसायट्यांचे संचालक उतरले रस्त्यावर.