शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

शेताच्या बांधावर भात बियाणे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST

रत्नागिरी : कोरोनाकाळात शेतकऱ्यांना खरीप हंगामात भात बियाणे व खताची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी ...

रत्नागिरी : कोरोनाकाळात शेतकऱ्यांना खरीप हंगामात भात बियाणे व खताची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी रोहिणी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी तालुका कृषी कार्यालयातर्फे केळ्ये व कोतवडे उंबरवाडी येथे शेताच्या बांधावर भात बियाणांचे वाटप करण्यात आले.

केळ्ये व कोतवडे उंबरवाडी गावातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम पूर्वतयारी व वेळेची बचत व्हावी यासाठी कृषी विभागाकडून रोहिणी पंधरवड्यांतर्गत भात बियाणे, बीजप्रक्रिया, बियाणे उगवणक्षमता चाचणी, बियाणे पेरणीसाठी गादीवाफे तयार करणे इत्यादी प्रात्यक्षिके वाडीवर आयोजित करण्यात येत आहेत. तसेच शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिवाय कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे.

शेतीशाळेच्या माध्यमातून कोरोना संसर्ग नियमांचे पालन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी कृषी पर्यवेक्षक एल. जे. मांडवकर, हर्षला पाटील, कृषी सहायक सतीश तायडे, गणेश जुवळे आदी उपस्थित होते.