शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

नुकसानग्रस्तांना २ कोटी अनुदान वाटप

By admin | Updated: October 27, 2015 00:09 IST

संगमेश्वर तालुका : मंडल स्तरावर २ रोजी विशेष मोहीम

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यात फेब्रुवारी व मार्चमध्ये अवेळी पाऊस व गारपीट झाली होती. यामध्ये तालुक्यातील अनेक आंबा व काजू शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यापैकी १ हजार ५४६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आतापर्यंत २ कोटी ७०८ रुपये इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे. उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जलदगतीने अनुदान प्राप्त होण्यासाठी २ नोव्हेंबर रोजी मंडल स्तरावर विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.तालुुक्यात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट मोठ्या प्रमाणात झाली होती. यामध्ये आंबा व काजू पिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. यानंतर कृ षी विभागामार्फ त पंचनामे करण्यात आले होते. याचा अहवाल महसूल विभागाकडे सादर करण्यात आला होता.मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सातबारावर असलेल्या सर्व व्यक्तींचे संमत्तीपत्र जोडण्याची जाचक अट शासनाने घातल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या घरातील काही मंडळी कामानिमित्त मुंबई, पुणे सारख्या मोठमोठ्या शहरात बाहेरगावी असतात. अशावेळी केवळ काही हजार रुपये नुकसान भरपाई मिळण्यापोटी या सर्वांना संमत्तीपत्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून बोलावणे शक्य नसल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने संमत्तीपत्राची जाचक अट रद्द करावी, अशी आग्रही मागणी होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान मिळावे, यासाठी शासनाकडून मंडल स्तरावर ही विशेष मोहीम राबवण्यात येत असून, अनुदानाची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी २ नोव्हेंबर रोजी आपली परिपूर्ण माहिती मंडल अधिकारी कार्यालयात सादर करावी, असे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. (वार्ताहर)संगमेश्वर तालुक्यातील आंबा व काजू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून सुमारे १३ कोटी ८५ लाख २२ हजार ५०० रुपये इतके अनुदान प्राप्त झाले आहे. परिपूर्ण कागदपत्र सादर केलेल्या १ हजार ५४६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने २ कोटी ७०८ रुपये इतके अनुदान वाटप केले आहे. परंतु, उर्वरित ११ कोटी ८५ लाख २१ हजार ७१२ रुपयांचे अनुदान शासन केव्हा देणार? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. ही मदत तात्काळ मिळण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, काही त्रुटींमुळे ही मदत रखडली आहे.