शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

संभाजी राजांच्या इतिहासाचे विकृत लेखन

By admin | Updated: May 16, 2016 00:35 IST

प्रा. यशवंत गोसावी : चिपळुणात प्रथमच संभाजी राजे जयंती साजरी

शिरगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी तिसऱ्या वर्षी मातृत्व हरवलेल्या संभाजी राजेंना केवळ स्वराज्यासाठी वयाच्या सातव्या वर्षी गहाण ठेवले होते. वयाच्या आठव्या वर्षी मथुरेत संभाजी राजेनी शिवरायांना माझ्यापेक्षा स्वराज्याला तुमची गरज असल्याचे सांगितले होते. वयाच्या दहाव्या वर्षी आठ भाषा अवगत असणाऱ्या संभाजी राजांनी चार ग्रंथ लिहिले. ३२ वर्ष स्वराज्यासाठी जगलेल्या छत्रपती संभाजी राजेंचा इतिहास मात्र मनुवाद्यांनी विकृत लिहिला. ही शोकांतिका मराठा बहुजन समाजाने जाणावी, असे प्रतिपादन प्रा. यशवंत गोसावी यांनी चिपळूण येथे केले. संभाजी ब्रिगेडतर्फे चिपळूण येथे प्रथमच छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आपल्या तडाखेबाज व्याख्यानात प्रा. गोसावी यांनी छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी राजांच्या जीवन संघर्षाची पाने उलगडली. केवळ शिवनीती, मावळ्यांची निष्ठा व सह्याद्रीच्या साथीने स्वराज्याचे ६० हजार सैन्य औरंगजेबाचे लाखो सैनिकांना भिडत असताना कोणताही धार्मिक संघर्ष नव्हता तर रयतेच्या राज्यासाठीचा हा राजकीय संघर्ष होता. मात्र, आजवरच्या मनुवादी इतिहासकारांनी खोटा इतिहास पुढे आणून धर्माचे राजकारण केले. औरंगजेबसह शायिस्तेखान, सिध्दी हे भारताबाहेरील मुस्लिम होते. भारतीय मुस्लिम बहुसंख्येने शिवरायांसोबतच इमानदार राहिले. तथापि, आजची पिढी खरा इतिहास जाणत नाही. आम्ही बिडीला संभाजी, शिवाजी व मंडईला महात्मा फुले नाव देत राहिलो. छत्रपती संभाजीना औरंगजेबाने केवळ दोन प्रश्न विचारले होते. त्याची मुलगी जैबुनिसा ५१ वर्षाची व संभाजी ३२ वर्षाचे मग इतिहास विकृत का लिहिला? संभाजी राजेंची हत्या मनुस्मृतीच्या निर्देशानुसारच झाली आहे. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूची बातमी पन्हाळ्यावरच्या संभाजीना दोन महिन्यांनी कळविणाऱ्या अधिकाऱ्यांना रायगडावर शिक्षा झाली. त्यांच्या वारसांनी संभाजीना पुढील काळात बदनाम केले. मराठा बहुजनांनी इतिहास घडवला. मात्र, मनुवादी कावळ्यांनी तो लिहिला इथे सगळा घोळ झाला. प्रा. गोसावी यांनी इतिहासाचे पुनर्लेखन ही काळाची गरज असल्याचे सांगितले. आजच्या तरुणांनी राजकारण घरात नेऊ नये. राजकारणामुळे जसे चंद्र, सूर्य एकत्र येत नाहीत, तशी रक्ताची माणसे दुरावतात, असे सांगतानाच याबाबतचे दाखलेही दिले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुधीर भोसले, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे मुजफ्फर सय्यद, जिजाऊ ब्रिगेडच्या मालती पवार, सतीश मोरे, रावी मोरे, सीमा चाळके, सुचित सुतार, रोहन सुर्वे, संतोष सावंत निर्मला जाधव, अंजली कदम, मानवाधिकार संघटनेचे मंगेश माटे, रफीक केरोटगी उपस्थित होते. समीक्षा भोसले यांनी जिजाऊ वंदन गीत सादर केले. सूत्रसंचालन मकरंद जाधव यांनी केले. (वार्ताहर)