शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

जाकादेवीत गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळे माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील ...

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळे माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील उर्फ बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.

जाकादेवी प्रशालेच्या कै. प्रभावती मधुकर खेऊर सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्याबाबत पालक, शिक्षक, संस्थाचालक यांच्यामध्ये चर्चाही करण्यात आली. पालकांच्या अनुमतीने शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण संस्थेने आपली भूमिका मांडली. या भूमिकेला पालकांनी सहमती दर्शवली आहे.

या सभेत दहावीतील भूषण अवधूत दांडेकर, सानिका अलंकार महाकाळ, यश पांडुरंग धोंगडे तर बारावी कला शाखेतील शर्वरी अर्जुन गावणकर, तनय तुळशीराम घाणेकर, नम्रता चंद्रकांत जोगळे, वाणिज्य शाखेतील भक्ती महेंद्र खेडेकर, मयुरी प्रकाश धामणे, दक्षता प्रकाश खापरे तर शास्त्र शाखेतील निकेश अशोक सुवरे मिथिला महेंद्र मेस्त्री, साहिल सूर्यकांत वडके तसेच राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्तीधारक नमिता संतोष बावदाने या गुणवंतांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुनील मयेकर यांच्यासमवेत संस्थेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर पाटील, विश्वस्त सुधीर देसाई, निमंत्रित संचालक श्रीकांत मेहेंदळे, जाकादेवी प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, संकेत देसाई, पालक संघाचे सचिव संतोष पवार, ज्येष्ठ शिक्षक भूपाल शेंडगे यांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.

ऑनलाइन शिक्षण, दीक्षा ॲप, व्हाॅट्सॲप यातून मिळणारे शिक्षण मर्यादित आहे. ग्रामीण भागात अनेकांकडे साधे मोबाइल नसल्याने ही शिक्षणप्रकिया परिपूर्ण नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत येणे गरजेचे असल्याचे सुनील मयेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्याला उपस्थित सर्व पालकांनी अनुमती दर्शविली. पालक सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक परकर यांनी केले. सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले. आभार ज्येष्ठ शिक्षक भूपाल शेंडगे यांनी मानले.