शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

राजापुरात पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST

राजापूर : गेले सव्वा वर्ष सुरू असलेले कोरोनाचे संकट आणि त्यामुळे निर्माण झालेली लॉकडाऊनची परिस्थिती यात सर्वसामान्य जनता पुरती ...

राजापूर : गेले सव्वा वर्ष सुरू असलेले कोरोनाचे संकट आणि त्यामुळे निर्माण झालेली लॉकडाऊनची परिस्थिती यात सर्वसामान्य जनता पुरती बेजार झाली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असतानाही पोलिसांकडून व्यापारी, नागरिकांवर २७९ कलमान्वये वारंवार केल्या जात असलेल्या कारवाईबाबत जनतेमधून नाराजी व्यक्त होत आहे. विनाकारण गर्दी जमविणारे लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करून कायम सर्वसामान्य जनतेवरच कारवाई केली जात असल्याने पोलीस प्रशासनाचा नेमका हेतू काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

गेले सव्वा वर्ष कोरोना आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीत लोकांनी नियम, अटींचे पालन करत प्रशासनाला सहकार्य केले. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. कडक लॉकडाऊननंतरही राजापूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर दैनंदिन कामकाजासाठी राजापूर बाजारपेठेत येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना नाहक पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत आहे. अँटिजन चाचणीलाही सामोरे जावे लागत आहे.

सद्यस्थितीत पोलीस आरोग्य विभागाच्या सहकार्यातून जणू धरपकड मोहीमच राबवत आहेत, अशी स्थिती आहे. बाजारात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पकडून त्याची अँटिजन चाचणी करण्याचा सपाटाच लावण्यात आला आहे. त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.