शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

राजापुरात पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST

राजापूर : गेले सव्वा वर्ष सुरू असलेले कोरोनाचे संकट आणि त्यामुळे निर्माण झालेली लॉकडाऊनची परिस्थिती यात सर्वसामान्य जनता पुरती ...

राजापूर : गेले सव्वा वर्ष सुरू असलेले कोरोनाचे संकट आणि त्यामुळे निर्माण झालेली लॉकडाऊनची परिस्थिती यात सर्वसामान्य जनता पुरती बेजार झाली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असतानाही पोलिसांकडून व्यापारी, नागरिकांवर २७९ कलमान्वये वारंवार केल्या जात असलेल्या कारवाईबाबत जनतेमधून नाराजी व्यक्त होत आहे. विनाकारण गर्दी जमविणारे लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करून कायम सर्वसामान्य जनतेवरच कारवाई केली जात असल्याने पोलीस प्रशासनाचा नेमका हेतू काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

गेले सव्वा वर्ष कोरोना आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीत लोकांनी नियम, अटींचे पालन करत प्रशासनाला सहकार्य केले. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. कडक लॉकडाऊननंतरही राजापूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर दैनंदिन कामकाजासाठी राजापूर बाजारपेठेत येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना नाहक पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत आहे. अँटिजन चाचणीलाही सामोरे जावे लागत आहे.

सद्यस्थितीत पोलीस आरोग्य विभागाच्या सहकार्यातून जणू धरपकड मोहीमच राबवत आहेत, अशी स्थिती आहे. बाजारात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पकडून त्याची अँटिजन चाचणी करण्याचा सपाटाच लावण्यात आला आहे. त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.