शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

राजापुरात पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST

राजापूर : गेले सव्वा वर्ष सुरू असलेले कोरोनाचे संकट आणि त्यामुळे निर्माण झालेली लॉकडाऊनची परिस्थिती यात सर्वसामान्य जनता पुरती ...

राजापूर : गेले सव्वा वर्ष सुरू असलेले कोरोनाचे संकट आणि त्यामुळे निर्माण झालेली लॉकडाऊनची परिस्थिती यात सर्वसामान्य जनता पुरती बेजार झाली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असतानाही पोलिसांकडून व्यापारी, नागरिकांवर २७९ कलमान्वये वारंवार केल्या जात असलेल्या कारवाईबाबत जनतेमधून नाराजी व्यक्त होत आहे. विनाकारण गर्दी जमविणारे लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करून कायम सर्वसामान्य जनतेवरच कारवाई केली जात असल्याने पोलीस प्रशासनाचा नेमका हेतू काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

गेले सव्वा वर्ष कोरोना आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीत लोकांनी नियम, अटींचे पालन करत प्रशासनाला सहकार्य केले. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. कडक लॉकडाऊननंतरही राजापूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर दैनंदिन कामकाजासाठी राजापूर बाजारपेठेत येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना नाहक पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत आहे. अँटिजन चाचणीलाही सामोरे जावे लागत आहे.

सद्यस्थितीत पोलीस आरोग्य विभागाच्या सहकार्यातून जणू धरपकड मोहीमच राबवत आहेत, अशी स्थिती आहे. बाजारात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पकडून त्याची अँटिजन चाचणी करण्याचा सपाटाच लावण्यात आला आहे. त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.