शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी मिश्रा यांच्याबद्द्लची नाराजी वाढली; समविचारी मुख्यमंत्र्यासह लाेकायुक्तांकडे करणार तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

रत्नागिरी : रत्नागिरीतील वकील सुरज मोरे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नोटीस दिल्यानंतर त्यापाठोपाठ आता सर्वसामान्य जनतेच्या ...

रत्नागिरी : रत्नागिरीतील वकील सुरज मोरे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नोटीस दिल्यानंतर त्यापाठोपाठ आता सर्वसामान्य जनतेच्या भावना विचारात घेऊन ‘जिल्हाधिकारी हटाव, रत्नागिरी बचाव’ मोहीम महाराष्ट्र समविचारी मंचकडून सुरु करण्यात येत आहे. याविषयीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याची माहिती मंचाचे संजय पुनसकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी मिश्रा यांच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल जनतेच्या मनात कुरबूर सुरु आहे. विशेषतः कोरोनाविषयक प्रशासकीय आरोग्य यंत्रणा राबविण्यात आणि लॉकडाऊन विषयात घेतलेल्या निर्णयातील अदलाबदल त्यायोगे सामान्य माणसे विशेषतः व्यापाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. नेमका हाच धागा पकडून समविचारी मंचने कायदेतज्ज्ञांची मते घेऊन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कोरोना महामारीत घेतलेले निर्णय व अन्य प्रशासकीय बाबी तपासून त्यांची बदली करावी आणि त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह लोकायुक्तांकडे करण्याचे ठरविले असल्याचे समविचारीकडून सांगण्यात आले आहे.

निर्णय प्रक्रियेच्या अदलाबदलासह इतर सर्व विषय घेण्यात येणार असून, सर्वप्रथम बदलीनंतर या विषयांबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समविचारीकडून केली जाईल, असे सांगितले. समविचारीच्या सर्वानुमते घेतलेल्या निर्णयात केशव भट, बाबा ढोल्ये, संजय पुनसकर, नीलेश आखाडे, रघुनंदन भडेकर, राजाराम गावडे, मंदार लेले, रिकी नाईक, विश्वजित कोतवडेकर, सागर खेडेकर, सचिन रायकर, अनिकेत खैर, नवनीत लांजेकर, तन्मय पटवर्धन, प्रवीण नागवेकर, अनिल नागवेकर, अमोल सावंत, आदींचा सहभाग होता.