शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
2
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
3
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
4
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
5
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
6
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
7
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
8
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
9
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
10
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
11
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
12
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
13
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
14
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
15
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
16
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
17
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
18
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
19
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
20
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 

जलशुध्दिकरण केंद्राशेजारीच कचऱ्याचे आगार

By admin | Updated: February 23, 2015 00:20 IST

पालिकेचा आंधळा कारभार : तप उलटले तरी निर्धारापलिकडे उडीच नाही

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात दरदिवशी संकलित होणाऱ्या २२ टन कचऱ्यामुळे शहराची कचरा समस्या गंभीर झाली आहे. गेल्या १० ते १२ वर्षांच्या काळात नगरपरिषदेला घनकचरा प्रकल्प उभारणे शक्य झाले नसल्याने कचऱ्याची ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारात कचऱ्याचे ढीगच ढीग तयार झाले असूून, जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच तेथे दररोज कचरा जाळला जात असल्याने निर्माण होणाऱ्या धुराने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अख्ख्या शहराचा हा कचरा डेपो येथून अन्यत्र हटवावा, अशी आग्रही मागणी आता नागरिकांतून होत आहे. दांडेआडोम येथे घनकचरा प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी शहरापासून दांडेआडोम हे अंतर १२ किलोमीटर्सपेक्षा अधिक आहे. त्यामुळे कचऱ्याच्या वाहतुकीवर मोठा खर्च होणार आहे. शहराजवळील कोणत्याही भागात घनकचरा प्रकल्प उभारण्याची चाचपणी केली तरी त्याला त्या भागातून विरोध होत आहे. कारण संपूर्ण शहराचा कचरा आपल्या भागात का? असा प्रश्नही विचारला जात आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात ५ ते १० गुंठे जागेत ७ घनकचरा प्रकल्प उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. अर्थात त्यासाठी प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना पुुढाकार घ्यावा लागणार आहे. परंतु तेथील नागरिकांचा विरोध धुडकावून प्रभागवार घनकचरा प्रकल्पासाठी किती नगरसेवक या कल्पनेला पसंती देतील, याबाबतही साशंकता आहेच. या छोट्या प्रकल्पांमध्ये केवळ कंपोस्ट खतासाठीची प्रक्रिया केली जाईल. ज्याठिकाणी बायोगॅस निर्मिती शक्य आहे तेथे तसे युनिटही उभारले जातील. शहरवासीयांचे या प्रकल्पांसाठी सहकार्य घेतले जाईल. त्यामुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नातही वाढ होईल, असे नगराध्यक्ष मयेकर यांचे म्हणणे आहे. मात्र, हे केवळ सांगूून होणारे काम नाही. त्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांना विश्वासात घ्यावे लागेल. प्रकल्प काय आहे, हे समजावून सांगावे लागेल. शेवटी शहरातील कचरा नष्ट करणे ही केवळ पालिकेचीच जबाबदारी नाही. त्यात नागरिकांचाही सहभाग आवश्यक आहे. अन्यथा प्रकल्प कधीच उभे राहणार नाहीत व कचऱ्याची समस्या अत्यंत गंभीर बनेल. त्यामुळे शासनाच्या व न्यायालयाच्या रोषाला नगरपरिषदेला सामोरे जावे लागणार आहे. सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी, रत्नागिरीतीललोकप्रतिनिधींनी या गंभीर विषयाबाबत तातडीने निर्णय घेऊन शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत ठोसपणे निर्णय घ्यायला हवा. (प्रतिनिधी)पालिकेला जमलेले नाहीरत्नागिरी शहरात दररोज २२ टन कचरा संकलित केला जातो. मात्र, या कचऱ्याचे करायचे काय, हा प्रश्न अनेकवेळा अनुत्तरीतच राहातो. या कचऱ्याचे प्रमाण पाहता पालिकेला घनकचरा प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक आहे. या परिसरात कचरा प्रकल्प उभारला जाण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू असले तरी घनकचरा प्रकल्प राबविणे पालिकेला शक्य झालेले नाही. घनकचरा प्रकल्प तयार करताना अनेक अडचणी निर्माण होतात. अशा वेळी त्यातून विविध प्रश्न निर्माण होतात. कधी संघर्ष करण्याची वेळ येते.