शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जलशुध्दिकरण केंद्राशेजारीच कचऱ्याचे आगार

By admin | Updated: February 23, 2015 00:20 IST

पालिकेचा आंधळा कारभार : तप उलटले तरी निर्धारापलिकडे उडीच नाही

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात दरदिवशी संकलित होणाऱ्या २२ टन कचऱ्यामुळे शहराची कचरा समस्या गंभीर झाली आहे. गेल्या १० ते १२ वर्षांच्या काळात नगरपरिषदेला घनकचरा प्रकल्प उभारणे शक्य झाले नसल्याने कचऱ्याची ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारात कचऱ्याचे ढीगच ढीग तयार झाले असूून, जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच तेथे दररोज कचरा जाळला जात असल्याने निर्माण होणाऱ्या धुराने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अख्ख्या शहराचा हा कचरा डेपो येथून अन्यत्र हटवावा, अशी आग्रही मागणी आता नागरिकांतून होत आहे. दांडेआडोम येथे घनकचरा प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी शहरापासून दांडेआडोम हे अंतर १२ किलोमीटर्सपेक्षा अधिक आहे. त्यामुळे कचऱ्याच्या वाहतुकीवर मोठा खर्च होणार आहे. शहराजवळील कोणत्याही भागात घनकचरा प्रकल्प उभारण्याची चाचपणी केली तरी त्याला त्या भागातून विरोध होत आहे. कारण संपूर्ण शहराचा कचरा आपल्या भागात का? असा प्रश्नही विचारला जात आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात ५ ते १० गुंठे जागेत ७ घनकचरा प्रकल्प उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. अर्थात त्यासाठी प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना पुुढाकार घ्यावा लागणार आहे. परंतु तेथील नागरिकांचा विरोध धुडकावून प्रभागवार घनकचरा प्रकल्पासाठी किती नगरसेवक या कल्पनेला पसंती देतील, याबाबतही साशंकता आहेच. या छोट्या प्रकल्पांमध्ये केवळ कंपोस्ट खतासाठीची प्रक्रिया केली जाईल. ज्याठिकाणी बायोगॅस निर्मिती शक्य आहे तेथे तसे युनिटही उभारले जातील. शहरवासीयांचे या प्रकल्पांसाठी सहकार्य घेतले जाईल. त्यामुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नातही वाढ होईल, असे नगराध्यक्ष मयेकर यांचे म्हणणे आहे. मात्र, हे केवळ सांगूून होणारे काम नाही. त्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांना विश्वासात घ्यावे लागेल. प्रकल्प काय आहे, हे समजावून सांगावे लागेल. शेवटी शहरातील कचरा नष्ट करणे ही केवळ पालिकेचीच जबाबदारी नाही. त्यात नागरिकांचाही सहभाग आवश्यक आहे. अन्यथा प्रकल्प कधीच उभे राहणार नाहीत व कचऱ्याची समस्या अत्यंत गंभीर बनेल. त्यामुळे शासनाच्या व न्यायालयाच्या रोषाला नगरपरिषदेला सामोरे जावे लागणार आहे. सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी, रत्नागिरीतीललोकप्रतिनिधींनी या गंभीर विषयाबाबत तातडीने निर्णय घेऊन शहरातील कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत ठोसपणे निर्णय घ्यायला हवा. (प्रतिनिधी)पालिकेला जमलेले नाहीरत्नागिरी शहरात दररोज २२ टन कचरा संकलित केला जातो. मात्र, या कचऱ्याचे करायचे काय, हा प्रश्न अनेकवेळा अनुत्तरीतच राहातो. या कचऱ्याचे प्रमाण पाहता पालिकेला घनकचरा प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक आहे. या परिसरात कचरा प्रकल्प उभारला जाण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू असले तरी घनकचरा प्रकल्प राबविणे पालिकेला शक्य झालेले नाही. घनकचरा प्रकल्प तयार करताना अनेक अडचणी निर्माण होतात. अशा वेळी त्यातून विविध प्रश्न निर्माण होतात. कधी संघर्ष करण्याची वेळ येते.