शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
3
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
4
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
5
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
6
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
7
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
8
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
9
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
10
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
11
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
12
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
13
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
14
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
15
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
16
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
17
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
18
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
19
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
20
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती

पक्षाच्या पराभवाची चचा

By admin | Updated: October 29, 2014 00:15 IST

विधानसभा निवडणूक : तालुकानिहाय अहवाल प्रदेशकडे सादर्र

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दयनीय अवस्थेची दखल वरिष्ठ पातळीवरुन घेण्यात येत आहे. चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी कदम यांना अपेक्षेपेक्षा कमी मिळालेल्या मतांमुळे पक्षातील गटातटाच्या राजकारणाला पुन्हा चालना मिळणार आहे.आघाडीतील फुटीमुळे काँग्रेसने जिल्ह्यात स्वतंत्र उमेदवार उभे केले. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेल्या कदम यांना यावेळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेस बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांचा दारूण झाला होता. त्यानंतर विधानसभेसाठी पाच मतदारसंघात उभ्या असलेल्या काँग्रेस उमेदवारांची लाखातही न गेलेली मते हा प्रकार तरी काय आहे? असा संतप्त सवाल पक्षाचे ज्येष्ठ नेते विचारत आहेत. याबाबतीतील प्रत्येक उमेदवाराचा अहवाल प्रदेशकडे पाठविण्यात येत आहे. काँग्रेसची प्रदेश पातळीवरील संघटनात्मक बैठक टिळक भवनमध्ये मंगळवारी सुरु असतानाच जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर पुन्हा भर दिला जाणार आहे.रश्मी कदम यांनी स्वत:ला मिळालेल्या मतांमुळे संतप्त भावना व्यक्त केल्या. पक्षाची चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात ताकद असताना आपल्याला नगण्य मते मिळतात, याचाच अर्थ काय होतो? विरोधकांनी या निवडणुकीत पैशांचा वापर केला व पक्षाची मते इतरत्र वळविण्याचा प्रयत्न केला. हे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. याबाबतचा लेखी अहवाल आपण राणे यांना सुपूर्द केला असल्याचे त्यांनी सांगितले. देवरुख - संगमेश्वर भागात सुभाष बने हे शिवसेनेत दाखल झाले. रवींद्र माने यांनी राष्ट्रवादीचा प्रचार जोमाने केला. अशावेळी हक्काची असलेली मते पक्षाला का मिळाली नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. आपण प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला. मतदारसंघ मोठा असल्याने सर्व ठिकाणी यंत्रणाही राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षाची इतकी दयनीय अवस्था का झाली, याला जबाबदार कोण? याचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे.जिल्ह्यात उघडउघड गटबाजी आहे. प्रत्येक निवडणुकीत ती उफाळून येते. याचाच फटका आपल्याला बसल्याचे कदम यांनी सांगितले. मात्र, हे किती दिवस चालणार, याकडे लक्ष आहे. (प्रतिनिधी)काँग्रेसची झालेली दाणादाण लक्षात घेता पुन्हा जिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरु झाली आहे. काही ठिकाणी तालुकाध्यक्षांच्या कामगिरीचा फेरआढावा घेण्यात येणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी पुढील काही काळ कसोटीचा राहणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेत बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.