शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाच्या पराभवाची चचा

By admin | Updated: October 29, 2014 00:15 IST

विधानसभा निवडणूक : तालुकानिहाय अहवाल प्रदेशकडे सादर्र

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दयनीय अवस्थेची दखल वरिष्ठ पातळीवरुन घेण्यात येत आहे. चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी कदम यांना अपेक्षेपेक्षा कमी मिळालेल्या मतांमुळे पक्षातील गटातटाच्या राजकारणाला पुन्हा चालना मिळणार आहे.आघाडीतील फुटीमुळे काँग्रेसने जिल्ह्यात स्वतंत्र उमेदवार उभे केले. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेल्या कदम यांना यावेळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेस बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांचा दारूण झाला होता. त्यानंतर विधानसभेसाठी पाच मतदारसंघात उभ्या असलेल्या काँग्रेस उमेदवारांची लाखातही न गेलेली मते हा प्रकार तरी काय आहे? असा संतप्त सवाल पक्षाचे ज्येष्ठ नेते विचारत आहेत. याबाबतीतील प्रत्येक उमेदवाराचा अहवाल प्रदेशकडे पाठविण्यात येत आहे. काँग्रेसची प्रदेश पातळीवरील संघटनात्मक बैठक टिळक भवनमध्ये मंगळवारी सुरु असतानाच जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर पुन्हा भर दिला जाणार आहे.रश्मी कदम यांनी स्वत:ला मिळालेल्या मतांमुळे संतप्त भावना व्यक्त केल्या. पक्षाची चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात ताकद असताना आपल्याला नगण्य मते मिळतात, याचाच अर्थ काय होतो? विरोधकांनी या निवडणुकीत पैशांचा वापर केला व पक्षाची मते इतरत्र वळविण्याचा प्रयत्न केला. हे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. याबाबतचा लेखी अहवाल आपण राणे यांना सुपूर्द केला असल्याचे त्यांनी सांगितले. देवरुख - संगमेश्वर भागात सुभाष बने हे शिवसेनेत दाखल झाले. रवींद्र माने यांनी राष्ट्रवादीचा प्रचार जोमाने केला. अशावेळी हक्काची असलेली मते पक्षाला का मिळाली नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. आपण प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला. मतदारसंघ मोठा असल्याने सर्व ठिकाणी यंत्रणाही राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षाची इतकी दयनीय अवस्था का झाली, याला जबाबदार कोण? याचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे.जिल्ह्यात उघडउघड गटबाजी आहे. प्रत्येक निवडणुकीत ती उफाळून येते. याचाच फटका आपल्याला बसल्याचे कदम यांनी सांगितले. मात्र, हे किती दिवस चालणार, याकडे लक्ष आहे. (प्रतिनिधी)काँग्रेसची झालेली दाणादाण लक्षात घेता पुन्हा जिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरु झाली आहे. काही ठिकाणी तालुकाध्यक्षांच्या कामगिरीचा फेरआढावा घेण्यात येणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी पुढील काही काळ कसोटीचा राहणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेत बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.