शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाच्या पराभवाची चचा

By admin | Updated: October 29, 2014 00:15 IST

विधानसभा निवडणूक : तालुकानिहाय अहवाल प्रदेशकडे सादर्र

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दयनीय अवस्थेची दखल वरिष्ठ पातळीवरुन घेण्यात येत आहे. चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी कदम यांना अपेक्षेपेक्षा कमी मिळालेल्या मतांमुळे पक्षातील गटातटाच्या राजकारणाला पुन्हा चालना मिळणार आहे.आघाडीतील फुटीमुळे काँग्रेसने जिल्ह्यात स्वतंत्र उमेदवार उभे केले. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेल्या कदम यांना यावेळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेस बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांचा दारूण झाला होता. त्यानंतर विधानसभेसाठी पाच मतदारसंघात उभ्या असलेल्या काँग्रेस उमेदवारांची लाखातही न गेलेली मते हा प्रकार तरी काय आहे? असा संतप्त सवाल पक्षाचे ज्येष्ठ नेते विचारत आहेत. याबाबतीतील प्रत्येक उमेदवाराचा अहवाल प्रदेशकडे पाठविण्यात येत आहे. काँग्रेसची प्रदेश पातळीवरील संघटनात्मक बैठक टिळक भवनमध्ये मंगळवारी सुरु असतानाच जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर पुन्हा भर दिला जाणार आहे.रश्मी कदम यांनी स्वत:ला मिळालेल्या मतांमुळे संतप्त भावना व्यक्त केल्या. पक्षाची चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात ताकद असताना आपल्याला नगण्य मते मिळतात, याचाच अर्थ काय होतो? विरोधकांनी या निवडणुकीत पैशांचा वापर केला व पक्षाची मते इतरत्र वळविण्याचा प्रयत्न केला. हे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. याबाबतचा लेखी अहवाल आपण राणे यांना सुपूर्द केला असल्याचे त्यांनी सांगितले. देवरुख - संगमेश्वर भागात सुभाष बने हे शिवसेनेत दाखल झाले. रवींद्र माने यांनी राष्ट्रवादीचा प्रचार जोमाने केला. अशावेळी हक्काची असलेली मते पक्षाला का मिळाली नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. आपण प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला. मतदारसंघ मोठा असल्याने सर्व ठिकाणी यंत्रणाही राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षाची इतकी दयनीय अवस्था का झाली, याला जबाबदार कोण? याचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे.जिल्ह्यात उघडउघड गटबाजी आहे. प्रत्येक निवडणुकीत ती उफाळून येते. याचाच फटका आपल्याला बसल्याचे कदम यांनी सांगितले. मात्र, हे किती दिवस चालणार, याकडे लक्ष आहे. (प्रतिनिधी)काँग्रेसची झालेली दाणादाण लक्षात घेता पुन्हा जिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरु झाली आहे. काही ठिकाणी तालुकाध्यक्षांच्या कामगिरीचा फेरआढावा घेण्यात येणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी पुढील काही काळ कसोटीचा राहणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेत बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.