शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

पक्षाच्या पराभवाची चचा

By admin | Updated: October 29, 2014 00:15 IST

विधानसभा निवडणूक : तालुकानिहाय अहवाल प्रदेशकडे सादर्र

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दयनीय अवस्थेची दखल वरिष्ठ पातळीवरुन घेण्यात येत आहे. चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी कदम यांना अपेक्षेपेक्षा कमी मिळालेल्या मतांमुळे पक्षातील गटातटाच्या राजकारणाला पुन्हा चालना मिळणार आहे.आघाडीतील फुटीमुळे काँग्रेसने जिल्ह्यात स्वतंत्र उमेदवार उभे केले. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेल्या कदम यांना यावेळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेस बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांचा दारूण झाला होता. त्यानंतर विधानसभेसाठी पाच मतदारसंघात उभ्या असलेल्या काँग्रेस उमेदवारांची लाखातही न गेलेली मते हा प्रकार तरी काय आहे? असा संतप्त सवाल पक्षाचे ज्येष्ठ नेते विचारत आहेत. याबाबतीतील प्रत्येक उमेदवाराचा अहवाल प्रदेशकडे पाठविण्यात येत आहे. काँग्रेसची प्रदेश पातळीवरील संघटनात्मक बैठक टिळक भवनमध्ये मंगळवारी सुरु असतानाच जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर पुन्हा भर दिला जाणार आहे.रश्मी कदम यांनी स्वत:ला मिळालेल्या मतांमुळे संतप्त भावना व्यक्त केल्या. पक्षाची चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात ताकद असताना आपल्याला नगण्य मते मिळतात, याचाच अर्थ काय होतो? विरोधकांनी या निवडणुकीत पैशांचा वापर केला व पक्षाची मते इतरत्र वळविण्याचा प्रयत्न केला. हे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. याबाबतचा लेखी अहवाल आपण राणे यांना सुपूर्द केला असल्याचे त्यांनी सांगितले. देवरुख - संगमेश्वर भागात सुभाष बने हे शिवसेनेत दाखल झाले. रवींद्र माने यांनी राष्ट्रवादीचा प्रचार जोमाने केला. अशावेळी हक्काची असलेली मते पक्षाला का मिळाली नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. आपण प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला. मतदारसंघ मोठा असल्याने सर्व ठिकाणी यंत्रणाही राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षाची इतकी दयनीय अवस्था का झाली, याला जबाबदार कोण? याचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे.जिल्ह्यात उघडउघड गटबाजी आहे. प्रत्येक निवडणुकीत ती उफाळून येते. याचाच फटका आपल्याला बसल्याचे कदम यांनी सांगितले. मात्र, हे किती दिवस चालणार, याकडे लक्ष आहे. (प्रतिनिधी)काँग्रेसची झालेली दाणादाण लक्षात घेता पुन्हा जिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरु झाली आहे. काही ठिकाणी तालुकाध्यक्षांच्या कामगिरीचा फेरआढावा घेण्यात येणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी पुढील काही काळ कसोटीचा राहणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेत बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.