शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अपुऱ्या जागेमुळे स्थानकात बस लावण्यासाठी शिस्तीचे पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:35 IST

मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मध्यवर्ती बसस्थानकाचे काम सुरू असल्याने ग्रामीण, लांब पल्ल्यांच्या गाड्या रहाटाघर बसस्थानकातून सोडण्यात ...

मेहरुन नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मध्यवर्ती बसस्थानकाचे काम सुरू असल्याने ग्रामीण, लांब पल्ल्यांच्या गाड्या रहाटाघर बसस्थानकातून सोडण्यात येत आहेत. रहाटाघर बसस्थानकातील अपुऱ्या जागेमुळे गाड्यांची गर्दी केली जात नाही. वेळापत्रकानुसार ज्या मार्गावर गाडी नियोजित वेळेवर सुटणार आहे, तत्पूर्वी अर्धा तास आधी माळनाका येथील आगार कार्यशाळेकडून गाड्या रहाटाघरच्या दिशेने रवाना होतात. फलाटावर दहा मिनिटे आधी गाडी लावली जाते. त्यामुळे एका शिस्तीचे पालन होत असलेले निदर्शनास येत आहे.

रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक रहाटाघर येथे हलविण्यात आले आहे. पहाटे पाच वाजलेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत ग्रामीण व लांब पल्ल्याच्या मार्गावर ८७२ गाड्या सुटतात. शहरी बसस्थानक मध्यवर्ती बसस्थानकालगत आहे. शहरी मार्गावर २५० फेऱ्या दररोज सुटत आहेत. शहरी बसस्थानकाबाहेर गाड्या लावण्यासाठी बऱ्यापैकी जागा आहे; मात्र रहाटाघर येथे अपुऱ्या जागेमुळे गर्दी होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध गाड्या वेळापत्रकानुसार लावण्यात येत आहे.

रहाटाघर बसस्थानकात फलाटासमोर बसेस दहा मिनीट आधी लावण्यात येत आहेत. त्यामुळे बस काढताना व लावताना शिस्तीचे पालन होत आहे.

बस वेळेवर लावल्या जातात

रहाटाघर बसस्थानकात जागा अपुरी असल्याने रिकाम्या गाड्या लावून गर्दी करण्यापेक्षा वेळापत्रकाचे पालन मात्र प्राधान्याने केले जात आहे. दहा मिनिटे आधी गाडी फलाटावर लावण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना चढणे साेयीस्कर होते. अपुऱ्या जागेमुळे शिस्तीचे पालन केले जात असून, ते कायम राहणे गरजेचे आहे.

- सुबोध पवार, चांदेराई

खड्डे बुजविण्यात यावेत

रहाटाघर येथे बस लावण्यासाठी व काढण्यासाठी गर्दी होत नाही; परंतु परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते गाडीचे चाक खड्ड्यांतून जाताना चिखलमिश्रीत पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याने खड्डे तातडीने बुजविण्याची आवश्यकता आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे प्राधान्याने बुजविण्यात यावेत.

- रोहित काेलगे, कोतवडे

बसस्थानकाच्या कामामुळे रहाटाघर येथील बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या, ग्रामीण बसेस सोडण्यात येत आहे. जागा अपुरी असल्याने माळनाका येथील आगार कार्यशाळेतून अर्धा तास आधी गाड्या रहाटाघर येथे पाठविण्यात येतात. शिवाय दहा मिनिटे आधी फलाटावर गाडी लावण्यात येत आहे. त्यामुळे गर्दी, गडबड होत नाही. शिवाय प्रवाशांना गाडीत चढणे सोयीस्कर होत आहे. शहरी बसस्थानक मात्र आहे त्याच ठिकाणी आहे.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी.