शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या जागेमुळे स्थानकात बस लावण्यासाठी शिस्तीचे पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:35 IST

मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मध्यवर्ती बसस्थानकाचे काम सुरू असल्याने ग्रामीण, लांब पल्ल्यांच्या गाड्या रहाटाघर बसस्थानकातून सोडण्यात ...

मेहरुन नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मध्यवर्ती बसस्थानकाचे काम सुरू असल्याने ग्रामीण, लांब पल्ल्यांच्या गाड्या रहाटाघर बसस्थानकातून सोडण्यात येत आहेत. रहाटाघर बसस्थानकातील अपुऱ्या जागेमुळे गाड्यांची गर्दी केली जात नाही. वेळापत्रकानुसार ज्या मार्गावर गाडी नियोजित वेळेवर सुटणार आहे, तत्पूर्वी अर्धा तास आधी माळनाका येथील आगार कार्यशाळेकडून गाड्या रहाटाघरच्या दिशेने रवाना होतात. फलाटावर दहा मिनिटे आधी गाडी लावली जाते. त्यामुळे एका शिस्तीचे पालन होत असलेले निदर्शनास येत आहे.

रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक रहाटाघर येथे हलविण्यात आले आहे. पहाटे पाच वाजलेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत ग्रामीण व लांब पल्ल्याच्या मार्गावर ८७२ गाड्या सुटतात. शहरी बसस्थानक मध्यवर्ती बसस्थानकालगत आहे. शहरी मार्गावर २५० फेऱ्या दररोज सुटत आहेत. शहरी बसस्थानकाबाहेर गाड्या लावण्यासाठी बऱ्यापैकी जागा आहे; मात्र रहाटाघर येथे अपुऱ्या जागेमुळे गर्दी होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध गाड्या वेळापत्रकानुसार लावण्यात येत आहे.

रहाटाघर बसस्थानकात फलाटासमोर बसेस दहा मिनीट आधी लावण्यात येत आहेत. त्यामुळे बस काढताना व लावताना शिस्तीचे पालन होत आहे.

बस वेळेवर लावल्या जातात

रहाटाघर बसस्थानकात जागा अपुरी असल्याने रिकाम्या गाड्या लावून गर्दी करण्यापेक्षा वेळापत्रकाचे पालन मात्र प्राधान्याने केले जात आहे. दहा मिनिटे आधी गाडी फलाटावर लावण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना चढणे साेयीस्कर होते. अपुऱ्या जागेमुळे शिस्तीचे पालन केले जात असून, ते कायम राहणे गरजेचे आहे.

- सुबोध पवार, चांदेराई

खड्डे बुजविण्यात यावेत

रहाटाघर येथे बस लावण्यासाठी व काढण्यासाठी गर्दी होत नाही; परंतु परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते गाडीचे चाक खड्ड्यांतून जाताना चिखलमिश्रीत पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याने खड्डे तातडीने बुजविण्याची आवश्यकता आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे प्राधान्याने बुजविण्यात यावेत.

- रोहित काेलगे, कोतवडे

बसस्थानकाच्या कामामुळे रहाटाघर येथील बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या, ग्रामीण बसेस सोडण्यात येत आहे. जागा अपुरी असल्याने माळनाका येथील आगार कार्यशाळेतून अर्धा तास आधी गाड्या रहाटाघर येथे पाठविण्यात येतात. शिवाय दहा मिनिटे आधी फलाटावर गाडी लावण्यात येत आहे. त्यामुळे गर्दी, गडबड होत नाही. शिवाय प्रवाशांना गाडीत चढणे सोयीस्कर होत आहे. शहरी बसस्थानक मात्र आहे त्याच ठिकाणी आहे.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी.