शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणावरून पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST

- धरणातून पाणी सोडल्याने पूर येतो अशा अफवांवर विश्वास ठेवू नये लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : तालुक्यातील अर्जुना मध्यम ...

- धरणातून पाणी सोडल्याने पूर येतो अशा अफवांवर विश्वास ठेवू नये

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्पातून पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दरवाजा नाही. पावसाळ्यात आणि पूरपरिस्थिती काळात अर्जुना धरणातील पाणी सोडल्याने पुराचे पाणी वाढले व पूरपरिस्थिती निर्माण झाली, अशा कोणत्याही प्रकारच्या अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांनी केले आहे.

या पावसाळ्यात धरण पूर्णपणे भरलेले आहे, त्यातच गेले तीन ते चार दिवस धरण परिसरात प्रतिदिन २०० ते ३०० मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणाच्या वरून होणारा पाण्याचा विसर्ग वाढला असून, अर्जुनेच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झालेली आहे, तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे अर्जुनेला मोठा पूर आलेला आहे, असेही सलगर यांनी सांगितले.

अर्जुना धरणाचे नियंत्रण असणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अशा प्रकारे पाणी सोडण्याची कोणतीही यंत्रणाच धरणात नाही, कारण या धरणाला पाणी सोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दरवाजा नाही. त्यामुळे पावसाळ्यात काय पण उन्हाळ्यातही पाणी सोडू शकत नाही. मात्र, या धरणाला डावा आणि उजवा असे दोन कालवे असून, या कालव्यांतून पाणी सोडण्यासाठी एक छोटा दरवाजा आहे. मात्र, पावसाळ्यात हा पूर्णपणे बंद केलेला असतो, कारण पावसाळ्यात कालव्यांमध्ये पाणी सोडले जात नसल्याचे सलगर यांनी सांगितले. उन्हाळ्यात कालव्यांमध्ये पाणी सोडले जाते व त्यावेळी त्या - त्या भागात माहिती दिली जाते.

या धरणाची लांबी १२६० मीटर, तर उंची ही ७० मीटर इतकी असून, सध्या धरण पूर्णपणे भरलेले आहे. धरणाची पाणीसाठ्याची क्षमता ही २.६३ टीएमसी इतकी आहे. त्यामुळे धरण आता पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या वरून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत आहे. त्यातच गेल्या तीन ते चार दिवसात धरण परिसरात आणि धरणाच्या वरच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर म्हणजे अगदी प्रतिदिन २०० ते ३०० मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे या परिसरात माेठ्या प्रमाणावर पाणी वाढले व धरणातूनही माेठ्या प्रमाणावर पाणी ओव्हर फ्लोने वाहू लागले. त्यामुळे अर्जुना नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झालेली आहे. मात्र, रात्री - अपरात्री धरणातून पाणी सोडले जाते, अशा कोणत्याही अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन सलगर यांनी केले आहे. राजापूर तालुक्यातील चिंचवाडी धरणही पूर्णपणे भरले असून, धरणाच्या वरून पाण्याचा विसर्ग होत असल्याचे सलगर यांनी सांगितले.