शहरं
Join us  
Trending Stories
1
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
2
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
3
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
4
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
6
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
7
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
8
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
9
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
10
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
11
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
12
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
13
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
14
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
15
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
16
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोललो..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
17
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
18
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
19
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
20
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक

अर्जुना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणावरून पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST

- धरणातून पाणी सोडल्याने पूर येतो अशा अफवांवर विश्वास ठेवू नये लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : तालुक्यातील अर्जुना मध्यम ...

- धरणातून पाणी सोडल्याने पूर येतो अशा अफवांवर विश्वास ठेवू नये

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : तालुक्यातील अर्जुना मध्यम प्रकल्पातून पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दरवाजा नाही. पावसाळ्यात आणि पूरपरिस्थिती काळात अर्जुना धरणातील पाणी सोडल्याने पुराचे पाणी वाढले व पूरपरिस्थिती निर्माण झाली, अशा कोणत्याही प्रकारच्या अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांनी केले आहे.

या पावसाळ्यात धरण पूर्णपणे भरलेले आहे, त्यातच गेले तीन ते चार दिवस धरण परिसरात प्रतिदिन २०० ते ३०० मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणाच्या वरून होणारा पाण्याचा विसर्ग वाढला असून, अर्जुनेच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झालेली आहे, तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे अर्जुनेला मोठा पूर आलेला आहे, असेही सलगर यांनी सांगितले.

अर्जुना धरणाचे नियंत्रण असणाऱ्या लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अशा प्रकारे पाणी सोडण्याची कोणतीही यंत्रणाच धरणात नाही, कारण या धरणाला पाणी सोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दरवाजा नाही. त्यामुळे पावसाळ्यात काय पण उन्हाळ्यातही पाणी सोडू शकत नाही. मात्र, या धरणाला डावा आणि उजवा असे दोन कालवे असून, या कालव्यांतून पाणी सोडण्यासाठी एक छोटा दरवाजा आहे. मात्र, पावसाळ्यात हा पूर्णपणे बंद केलेला असतो, कारण पावसाळ्यात कालव्यांमध्ये पाणी सोडले जात नसल्याचे सलगर यांनी सांगितले. उन्हाळ्यात कालव्यांमध्ये पाणी सोडले जाते व त्यावेळी त्या - त्या भागात माहिती दिली जाते.

या धरणाची लांबी १२६० मीटर, तर उंची ही ७० मीटर इतकी असून, सध्या धरण पूर्णपणे भरलेले आहे. धरणाची पाणीसाठ्याची क्षमता ही २.६३ टीएमसी इतकी आहे. त्यामुळे धरण आता पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या वरून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत आहे. त्यातच गेल्या तीन ते चार दिवसात धरण परिसरात आणि धरणाच्या वरच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर म्हणजे अगदी प्रतिदिन २०० ते ३०० मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे या परिसरात माेठ्या प्रमाणावर पाणी वाढले व धरणातूनही माेठ्या प्रमाणावर पाणी ओव्हर फ्लोने वाहू लागले. त्यामुळे अर्जुना नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झालेली आहे. मात्र, रात्री - अपरात्री धरणातून पाणी सोडले जाते, अशा कोणत्याही अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन सलगर यांनी केले आहे. राजापूर तालुक्यातील चिंचवाडी धरणही पूर्णपणे भरले असून, धरणाच्या वरून पाण्याचा विसर्ग होत असल्याचे सलगर यांनी सांगितले.