शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात आपत्ती व्यवस्थापन कागदी

By admin | Updated: June 13, 2015 00:26 IST

पथक दाखल : प्रशिक्षणार्थीच नाहीत

असगोली : गुहागर येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यासाठी पुण्याहून एनडीआरएफ पाच बटालियनचे पथक दाखल झाले होते. मात्र, प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थीच नसल्याने गुहागर येथे आपत्ती व्यवस्थापन केवळ कागदावरच रंगत असल्याचे दिसत आहे. -राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी पुण्यातील एनडीआरएफ पाच बटालियनचे पंधराजणांचे पथक आले होते. महसूल विभाग या प्रशिक्षणाचे आयोजक होते. मात्र, आलेल्या पथकासमोर प्रशिक्षणार्थीच नसल्याने या पथकाने नाराजी व्यक्त केली. प्रशिक्षणासाठी आवश्यक व्यवस्थाही केली नसल्याने महसूल विभागातील तीन कर्मचारी, दोन मंडल अधिकारी, तीन तलाठी, एक उपनिरीक्षक, होमगार्ड प्रमुख सुधाकर कांबळे व त्यांचे सहकारी होमगार्ड पाच यांनाच तेथे बसवून प्रशिक्षण आटोपते घेण्यात आले. तरीही उपस्थितांना या पथकाने प्रशिक्षण देऊन आपली कामगिरी उत्तम पार पाडली. एनडीआरएफ पाच बटालियनचे प्रमुख सबइन्स्पेक्टर एस. के. सिंग यांनी संपूर्ण नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच पंचायत समितीमध्ये हा कार्यक्रम होऊनही याबाबत पंचायत समिती प्रशासनालाही कल्पना नव्हती. एकंदरीतच शासन आपत्तीच्या वेळी किती सज्ज आहे, हे दिसून आले.या प्रशिक्षणामध्ये सकाळच्या सत्रात भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीविषयी कोणती खबरदारी घ्यावी, वादळावेळी निर्माण होणाऱ्या आपत्तीवेळी कोणते कार्य करावे, पूरसदृश स्थितीत कोणती उपाययोजना असावी, याची तर दुपारच्या सत्रात रासायनिक पदार्थ, शत्रू आक्रमक तसेच रेडिओलॉजीकल दुर्घटनेवेळी आपत्ती व्यवस्थापनाने जनतेला सहकार्य कसे करावे, याची माहिती दिली.मात्र, यावेळी आवश्यक प्रशिक्षणार्थी नसल्याने हे प्रशिक्षण केवळ कागदावरच रंगत असल्याचा अनुभव यावेळी आला. (वार्ताहर)प्रशिक्षण कार्यक्रमाचा बोजवाराजिल्ह्यात सर्वत्र आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनाने जागृती दाखवली. सर्व ठिकाणी हे आपत्ती व्यवस्थापन पार पडले. मात्र, गुहागरात याबाबत वेगळाच अनुभव आला. गुहागरमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या पथकासमोर प्रशिक्षणार्थीच नसल्याचे दृश्य अवाक् करणारे होते. पावसाळा सुरू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व विभाग कामाला लागले आहेत. मात्र, गुहागरात प्रशिक्षणच संबंधिताना मिळाले नसेल तर... हे चित्र बदलणे आवश्यक आहे.