शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापन; महावितरण नापास

By admin | Updated: June 10, 2015 00:29 IST

नाराजी : पावसाला काही तासच बाकी

चिपळूण : महावितरण कंपनीने पावसाळापूर्व आपत्ती व्यवस्थापनाची कामे पूर्ण केली आहेत. तरीही पावसाळ्यापूर्वीच सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरण आपल्या कामात नापास झाले आहे. पावसाळा जवळ आला की, पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती डागडुजी व उपाययोजना केली जाते. आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली अत्यावश्यक असणारी कामे पूर्ण करुन घेतली जातात. यावर्षी तर शहरातील विजेचे खांब बदलणे, ट्रान्सफार्मर बदलणे, नवीन विद्युत वाहिनी टाकणे, यासाठी गेले कित्येक दिवस वीज पुरवठा खंडित केला जात होता. ग्राहकांना वेठीस धरुन ही कामे पूर्ण करण्यात आली.महावितरणने आपली कामे पूर्ण करुनही शहरात अद्याप अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होतो. मे व जून महिन्याच्या कालावधीत मार्कंडी, काविळतळी, परशुरामनगर, रावतळे ते अगदी रेल्वेस्टेशनपर्यंतच्या परिसरात तीन वेळा अंधाराचे साम्राज्य होते. त्यामुळे या परिसरातील ग्राहक हैराण आहेत. सोमवारी रात्री २ वाजता रावतळे परिसरात विजेच्या तारांवर झाडाची फांदी पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर युनायटेड इंग्लिश स्कूल येथेही अडचण निर्माण झाली होती. रात्री २ वाजल्यापासून पहाटेपर्यंत वीज पुरवठा खंडित होता. सातत्याने चौकशी करुनही फॉल्ट अद्याप मिळाला नाही, असेच उत्तर दिले जात होते. अजून आपत्ती खऱ्या अर्थाने सुरू व्हायची आहे. एकंदरीत महावितरणच्या सुलतानशाही कारभाराचा फटका वेगवेगळ्या मार्गाने नागरिकांना बसत आहे. बिलाच्या दरवाढीचे चटके असह्य होत असतानाच सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. याबाबत नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. महावितरण कंपनीने वेळीच आपला कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)ग्राहकांना धरले जातेय वेठीस पावसाळा जवळ आल्यानंतर प्रत्येक खाते जागे होते. आरोग्य, वीज, बांधकाम ही खाती पटलावर असतात. चिपळूण शहरात महावितरण कंपनीद्वारे शहरातील डागडुजी व उपाययोजना केली जाते. धोकादायक खांब बदलणे, नवीन वाहिनी टाकणे यांसाठी शहरात गेले कित्येक दिवस वीज पुरवठा खंडित करण्यात येत होता. ग्राहकांना यासाठी वेठीस धरण्यात आल्याचा आरोप काहिनी केला आहे. कामे करूनही महावितरण ग्राहकांच्या परीक्षेत नापास झाल्याची चर्चा होत आहे.