शहरं
Join us  
Trending Stories
1
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
2
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
3
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
4
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
5
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
6
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
7
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
8
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
9
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
10
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
13
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
14
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
15
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
16
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
17
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
18
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
19
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
20
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...

आपत्ती व्यवस्थापन; महावितरण नापास

By admin | Updated: June 10, 2015 00:29 IST

नाराजी : पावसाला काही तासच बाकी

चिपळूण : महावितरण कंपनीने पावसाळापूर्व आपत्ती व्यवस्थापनाची कामे पूर्ण केली आहेत. तरीही पावसाळ्यापूर्वीच सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरण आपल्या कामात नापास झाले आहे. पावसाळा जवळ आला की, पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती डागडुजी व उपाययोजना केली जाते. आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली अत्यावश्यक असणारी कामे पूर्ण करुन घेतली जातात. यावर्षी तर शहरातील विजेचे खांब बदलणे, ट्रान्सफार्मर बदलणे, नवीन विद्युत वाहिनी टाकणे, यासाठी गेले कित्येक दिवस वीज पुरवठा खंडित केला जात होता. ग्राहकांना वेठीस धरुन ही कामे पूर्ण करण्यात आली.महावितरणने आपली कामे पूर्ण करुनही शहरात अद्याप अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होतो. मे व जून महिन्याच्या कालावधीत मार्कंडी, काविळतळी, परशुरामनगर, रावतळे ते अगदी रेल्वेस्टेशनपर्यंतच्या परिसरात तीन वेळा अंधाराचे साम्राज्य होते. त्यामुळे या परिसरातील ग्राहक हैराण आहेत. सोमवारी रात्री २ वाजता रावतळे परिसरात विजेच्या तारांवर झाडाची फांदी पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर युनायटेड इंग्लिश स्कूल येथेही अडचण निर्माण झाली होती. रात्री २ वाजल्यापासून पहाटेपर्यंत वीज पुरवठा खंडित होता. सातत्याने चौकशी करुनही फॉल्ट अद्याप मिळाला नाही, असेच उत्तर दिले जात होते. अजून आपत्ती खऱ्या अर्थाने सुरू व्हायची आहे. एकंदरीत महावितरणच्या सुलतानशाही कारभाराचा फटका वेगवेगळ्या मार्गाने नागरिकांना बसत आहे. बिलाच्या दरवाढीचे चटके असह्य होत असतानाच सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. याबाबत नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. महावितरण कंपनीने वेळीच आपला कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)ग्राहकांना धरले जातेय वेठीस पावसाळा जवळ आल्यानंतर प्रत्येक खाते जागे होते. आरोग्य, वीज, बांधकाम ही खाती पटलावर असतात. चिपळूण शहरात महावितरण कंपनीद्वारे शहरातील डागडुजी व उपाययोजना केली जाते. धोकादायक खांब बदलणे, नवीन वाहिनी टाकणे यांसाठी शहरात गेले कित्येक दिवस वीज पुरवठा खंडित करण्यात येत होता. ग्राहकांना यासाठी वेठीस धरण्यात आल्याचा आरोप काहिनी केला आहे. कामे करूनही महावितरण ग्राहकांच्या परीक्षेत नापास झाल्याची चर्चा होत आहे.