शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

आपत्ती, पुराचा धोका, त्रास कमी करण्यासाठी विविध उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST

रत्नागिरी : निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळ तसेच महापुरामुळे कोकणात अनेक ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी राज्य सरकारने ...

रत्नागिरी : निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळ तसेच महापुरामुळे कोकणात अनेक ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी राज्य सरकारने चार वर्षांचा कार्यक्रम तयार केला असून, त्याकरता ३ हजार ६०७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. या उपाययोजनांमध्ये धूपप्रतिबंधक बंधारे, विजेच्या भूमिगत केबल, तात्पुरत्या स्थलांतरासाठी निवारागृह अशा कामांवर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.

वादळ तसेच महापुराच्या घटनांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील सर्व जिल्ह्यांना भेट देऊन पाहणी केली. त्या वेळेपासूनच कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्याचा विचार सुरू होता. आपण तसेच खासदार विनायक राऊत यांचा त्यासाठी पाठपुरावा सातत्याने सुरू होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी एक समिती नेमली आहे. त्याचबरोबर चार वर्षांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यातून निवारागृह, धूपप्रतिबंधक बंधारे, भूमिगत केबल, वादळाबाबतची पूर्वसूचना देणारी यंत्रणा, वीज अटकाव यंत्रणा तसेच दरडप्रवण भागांमधील प्रतिबंधात्मक उपाययोजना अशी कामे केली जाणार आहेत, असे ते म्हणाले.

कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत नेमण्यात आलेल्या समितीकडून सरकारला अहवाल सादर केला जाईल. या अहवालात जे उपाय सुचवले जातील, तेही प्राधान्याने राबवले जाणार असल्याचे ते म्हणाले.

पुराच्या समस्येसाठी गाळ काढण्याच्या कामाकडेही प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे. हा गाळ काढण्यासाठी कोणी पुढे आल्यास त्यांच्याकडून रॉयल्टी न घेण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून डिझेलचा खर्च करून देऊन हे काम करून घेता येईल का, याचीही चाचपणी सुरू असल्याचे ते म्हणाले.

.................................

चिपी विमानतळाला नाथ पै यांचे नाव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी केवळ स्थानिक लोकच नाही तर सर्व लोकप्रतिनिधींचीही आहे. आपण तसा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमाेर ठेवला आहे. त्याला अनेक प्रक्रिया आहेत. पण तो मंजूर होईल, असे ते म्हणाले.

..................

रत्नागिरी विमानतळाला टिळकांचे नाव

रत्नागिरीतील विमानतळाबाबत इंटरनेटवर सर्च केले तर लोकमान्य टिळक विमानतळ असे नाव येते. हेच नाव कायम राहणार आहे, असेही सामंत यांनी या वेळी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला धनंजय कीर यांचे नाव देण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील उपकेंद्राला स्व. मधू दंडवते यांचे नाव दिले जाणार आहे, असे ते म्हणाले.