शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

आपत्ती, पुराचा धोका, त्रास कमी करण्यासाठी विविध उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST

रत्नागिरी : निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळ तसेच महापुरामुळे कोकणात अनेक ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी राज्य सरकारने ...

रत्नागिरी : निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळ तसेच महापुरामुळे कोकणात अनेक ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी राज्य सरकारने चार वर्षांचा कार्यक्रम तयार केला असून, त्याकरता ३ हजार ६०७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. या उपाययोजनांमध्ये धूपप्रतिबंधक बंधारे, विजेच्या भूमिगत केबल, तात्पुरत्या स्थलांतरासाठी निवारागृह अशा कामांवर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.

वादळ तसेच महापुराच्या घटनांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील सर्व जिल्ह्यांना भेट देऊन पाहणी केली. त्या वेळेपासूनच कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्याचा विचार सुरू होता. आपण तसेच खासदार विनायक राऊत यांचा त्यासाठी पाठपुरावा सातत्याने सुरू होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी एक समिती नेमली आहे. त्याचबरोबर चार वर्षांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यातून निवारागृह, धूपप्रतिबंधक बंधारे, भूमिगत केबल, वादळाबाबतची पूर्वसूचना देणारी यंत्रणा, वीज अटकाव यंत्रणा तसेच दरडप्रवण भागांमधील प्रतिबंधात्मक उपाययोजना अशी कामे केली जाणार आहेत, असे ते म्हणाले.

कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत नेमण्यात आलेल्या समितीकडून सरकारला अहवाल सादर केला जाईल. या अहवालात जे उपाय सुचवले जातील, तेही प्राधान्याने राबवले जाणार असल्याचे ते म्हणाले.

पुराच्या समस्येसाठी गाळ काढण्याच्या कामाकडेही प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे. हा गाळ काढण्यासाठी कोणी पुढे आल्यास त्यांच्याकडून रॉयल्टी न घेण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून डिझेलचा खर्च करून देऊन हे काम करून घेता येईल का, याचीही चाचपणी सुरू असल्याचे ते म्हणाले.

.................................

चिपी विमानतळाला नाथ पै यांचे नाव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी केवळ स्थानिक लोकच नाही तर सर्व लोकप्रतिनिधींचीही आहे. आपण तसा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमाेर ठेवला आहे. त्याला अनेक प्रक्रिया आहेत. पण तो मंजूर होईल, असे ते म्हणाले.

..................

रत्नागिरी विमानतळाला टिळकांचे नाव

रत्नागिरीतील विमानतळाबाबत इंटरनेटवर सर्च केले तर लोकमान्य टिळक विमानतळ असे नाव येते. हेच नाव कायम राहणार आहे, असेही सामंत यांनी या वेळी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला धनंजय कीर यांचे नाव देण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील उपकेंद्राला स्व. मधू दंडवते यांचे नाव दिले जाणार आहे, असे ते म्हणाले.