शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

आपत्ती, पुराचा धोका, त्रास कमी करण्यासाठी विविध उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST

रत्नागिरी : निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळ तसेच महापुरामुळे कोकणात अनेक ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी राज्य सरकारने ...

रत्नागिरी : निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळ तसेच महापुरामुळे कोकणात अनेक ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी राज्य सरकारने चार वर्षांचा कार्यक्रम तयार केला असून, त्याकरता ३ हजार ६०७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. या उपाययोजनांमध्ये धूपप्रतिबंधक बंधारे, विजेच्या भूमिगत केबल, तात्पुरत्या स्थलांतरासाठी निवारागृह अशा कामांवर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.

वादळ तसेच महापुराच्या घटनांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील सर्व जिल्ह्यांना भेट देऊन पाहणी केली. त्या वेळेपासूनच कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्याचा विचार सुरू होता. आपण तसेच खासदार विनायक राऊत यांचा त्यासाठी पाठपुरावा सातत्याने सुरू होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी एक समिती नेमली आहे. त्याचबरोबर चार वर्षांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यातून निवारागृह, धूपप्रतिबंधक बंधारे, भूमिगत केबल, वादळाबाबतची पूर्वसूचना देणारी यंत्रणा, वीज अटकाव यंत्रणा तसेच दरडप्रवण भागांमधील प्रतिबंधात्मक उपाययोजना अशी कामे केली जाणार आहेत, असे ते म्हणाले.

कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत नेमण्यात आलेल्या समितीकडून सरकारला अहवाल सादर केला जाईल. या अहवालात जे उपाय सुचवले जातील, तेही प्राधान्याने राबवले जाणार असल्याचे ते म्हणाले.

पुराच्या समस्येसाठी गाळ काढण्याच्या कामाकडेही प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे. हा गाळ काढण्यासाठी कोणी पुढे आल्यास त्यांच्याकडून रॉयल्टी न घेण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून डिझेलचा खर्च करून देऊन हे काम करून घेता येईल का, याचीही चाचपणी सुरू असल्याचे ते म्हणाले.

.................................

चिपी विमानतळाला नाथ पै यांचे नाव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी केवळ स्थानिक लोकच नाही तर सर्व लोकप्रतिनिधींचीही आहे. आपण तसा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमाेर ठेवला आहे. त्याला अनेक प्रक्रिया आहेत. पण तो मंजूर होईल, असे ते म्हणाले.

..................

रत्नागिरी विमानतळाला टिळकांचे नाव

रत्नागिरीतील विमानतळाबाबत इंटरनेटवर सर्च केले तर लोकमान्य टिळक विमानतळ असे नाव येते. हेच नाव कायम राहणार आहे, असेही सामंत यांनी या वेळी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला धनंजय कीर यांचे नाव देण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील उपकेंद्राला स्व. मधू दंडवते यांचे नाव दिले जाणार आहे, असे ते म्हणाले.