शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीकरांच्या स्मरणात आजही दिलीपकुमार यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

रत्नागिरी : एका बँकेच्या उद्घाटनासाठी अभिनेते दिलीपकुमार रत्नागिरीला आले होते. उद्घाटन सोहळ्यानंतर पोलीस मैदानावर झालेल्या सभेत दिलीपकुमार यांनी सिनेसृष्टीतील ...

रत्नागिरी : एका बँकेच्या उद्घाटनासाठी अभिनेते दिलीपकुमार रत्नागिरीला आले होते. उद्घाटन सोहळ्यानंतर पोलीस मैदानावर झालेल्या सभेत दिलीपकुमार यांनी सिनेसृष्टीतील अनेक प्रसंग सांगितले होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने १९७६मधील जुन्या आठवणी ताज्या झाल्या असून, उद्घाटन सोहळ्यातील काही प्रसंग रत्नागिरीकरांच्या स्मरणात आजही आहेत.

उद्योजक पै. कासम ठाकूर व पै. एम.डी. नाईक यांच्या निमंत्रणावरून अभिनेते दिलीपकुमार रत्नागिरीतील बँकेच्या उद्घाटनासाठी आले होते. करंजारी येथील ठाकूर यांच्या निवासस्थानावरून ते मोटारीने रत्नागिरीत आले होते. उद्घाटन सोहळ्यानंतर पोलीस मैदानावर आयोजित कार्यक्रमासाठी त्यावेळी अडीच ते तीन हजार प्रेक्षकांनी गर्दी केली होते. लाडक्या अभिनेत्याला जवळून पाहण्याची क्रेझ तर होतीच, शिवाय ऐकण्याची संधी होती.

दिलीपकुमार यांनी यावेळी सिनेजगतातील अनेक आठवणींना उजाळा दिला हाेता. ‘आन’ या प्रथम भारतीय रंगीत चित्रपटाचा प्रीमियम शो लंडन येथे होता. शोनंतर राणी एलिझाबेथ यांनी सर्वांसाठी डिनरचा कार्यक्रम ठेवला होता. शाही व्यवस्था असल्याने टेबलावर सोन्याचे चमचे, वाट्या ठेवण्यात आल्या होत्या. काॅमेडी अभिनेते असलेल्या मुकरी यांनी हळूच एक चमचा खिशात ठेवल्याचे लक्षात आले. ते अस्वस्थ झाले. आपल्या देशाचे नाव खराब होऊ नये यामुळे ते चलबिचल झाले होते. राणी एलिझाबेथ यांनी डिनर सुरू होण्यापूर्वी आपण काय कराल, असा दिलीपकुमार यांना प्रश्न केला. विचारांती त्यांनी आपण जादूचा प्रयोग करणार असल्याचे सांगितले. त्यावर सर्वांनी होकार दर्शविला. दिलीपकुमार यांनी आपण एक चमचा उचलून खिशात ठेवत असल्याचे सांगून हा चमचा पुढच्या क्षणी दुसऱ्याच्या खिशातून काढणार असल्याचे सांगितले. त्यांनी मुकरी यांच्या खिशात चमचा असून त्यांनी बाहेर काढावा, असे सांगितले. मुकरी गोंधळले, त्यांनी खिशात हात घालून चमचा टेबलावर ठेवला. टाळ्याच्या कडकडाटात दिलीपकुमार यांना दाद देण्यात आली.

जेवण संपल्यानंतर मुकरी यांनी अभिनेते दिलीपकुमार यांना चमचा राहू दिला असता तर काय बिघडले असते, असे विचारले. त्यावर दिलीपकुमार यांनी इंग्रजांच्या देशात माझ्या भारत देशाचे नाव चोरीमुळे खराब झाल्याचे आवडणार नसल्याचे सांगितले. प्रसंग सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली, शिवाय भारतमातेचा जयघोषही केला हाेता.

ज्या बँकेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी दिलीपकुमार आले होते, त्या बँकेचे संचालकपद गेली २२ वर्षे बशीर मुर्तुझा भूषवित आहेत. त्यांनी अभिनेते दिलीपकुमार यांना अभिवादन करताना, जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळकरी विद्यार्थी म्हणून आपण मित्रासमोर त्यांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी उपस्थित होतो, असे त्यांनी सांगितले.

--------------------------------

हकीम रत्नागिरीचे असल्याने आलाे

‘मुघल-ए-आझम’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकासमवेत सिराज हकीम हेही होते, मात्र ते रत्नागिरीचे होते. मला रत्नागिरीला येण्याचे आमंत्रण संयोजकांनी दिले तेव्हा हकीम यांचे गाव असल्याने तत्काळ होकार दर्शविल्याचे दिलीपकुमार यांनी त्यावेळी सांगितले हाेते.