शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

देवरूख आमसभेत अधिकारी धारेवर

By admin | Updated: January 13, 2015 00:11 IST

बांधकाम, महावितरणवर आगपाखड : इकोसेन्सिटिव्ह गावे वगळण्याचा ठराव

देवरुख : संगमेश्वर पंचायत समितीच्या आमसभेत सोमवारी एस. टी., बांधकाम विभाग, महावितरण, कृषी, घरकुले, पाणीपुरवठा या विषयांवर सर्वाधिक चर्चा करण्यात आली. महावितरण व बांधकामच्या काही अधिकाऱ्यांना धारेवर धरत इको सेन्सिटिव्हमधील गावे वगळण्यात यावीत, असा ठराव आमसभेमध्ये मंजूर करण्यात आला.तीन तास चाललेल्या आमसभेमध्ये अनेकांना आपले प्रश्न मांडता आले नाहीत. तसेच महत्त्वाचे प्रश्न चर्चिले न गेल्याने नाराजी व्यक्त करीत सभा गुंडाळण्यात आल्याची भावना काहींनी सभागृहात बोलून दाखविली. ही आमसभा यापूर्वी दोनवेळा रद्द झाली होती. सभेमध्ये प्रथम एस. टी. या विभागापासून चर्चा करण्यात आली. यावेळी हल्ली एस. टी.मध्ये नव्याने भरती झालेल्या चालकांच्या वेगावर लगाम लावला पाहिजे, अशी मागणी विजय पांचाळ यांनी केली. तसेच अनेकांनी बसफेऱ्यांच्या अनियमिततेबाबत एस. टी. सुरु करण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. एसटीवर अनेक प्रश्न असल्याने आ. चव्हाण यांनी आगार व्यवस्थापक यांना गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना केल्या. तसेच विभागीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्या, असेही सुचित केले.याबरोबरच महावितरणच्या वर्षानुवर्षे गंजलेला पोलचा प्रश्न जैसे थे असल्याचे बोरुकर व गुरव यांनी स्पष्ट केले. पालकमंत्र्यांच्या आदेशाने एखादे काम तीन दिवसात होते, तर अन्य कामांना का इतका वेळ लागतो, असे खडे बोल आमदार चव्हाण यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच गंजलेले पोल प्राधान्याने बदलण्यात यावेत, असा निर्णय घेण्यात आला.तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक रस्ते उखडलेले असताना अधिकाऱ्यांकडून चालढकल होताना दिसत असल्याने सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता यांना आ. चव्हाण यांनी धारेवर धरत तुम्ही स्थानिक आहात तरीदेखील तुम्ही असे का वागता? तुम्ही खोत झाले आहेत अशा कडक शब्दात सुनावले. तर युयुत्सू आर्ते यांनी फणसट धनगरवाडी येथील ३० लाख रुपये खर्चून केलेला रस्ता पळविला आहे, असे सभागृहात सांगत मंजूर झालेला निधी अन्य ठिकाणी खर्च कसा झाला, याबाबत चौकशीची मागणी आर्ते यांनी केली. यापुढे तालुक्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याचे काम काणे करते? असा सवाल भाई बोरुकर, छोट्या गवाणकर यांनी उपस्थित केला.कृषीमध्ये आलेल्या विषयांची तसेच आंगवली सोनारवाडीतील घरकुलांची चौकशी करण्यात यावी, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले. तर गोळवली अंगणवाडी सेविका तसेच काही शिक्षक आपल्या शाळा सोडून पंचायत समिती आवारात फिरत असतात, त्यांची चौकशी व्हावी. याखेरीज धामणी बडदवाडी येथे २००७ मध्ये भारत निर्माणमधून पाणी पुरवण्याचे काम अद्यापही झालेले नाही, असे निदर्शनास आणून देत याकडे लक्ष देण्याची मागणी धामणीचे ग्रामस्थांनी केली.सभा आवरती घेतल्याने बावा चव्हाण, ललिता गुडेकर आदींना आपले प्रश्न आटोपते घ्यावे लागले. या सभेला आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर, पंचायत समिती सभापती मनीषा गुरव, उपसभाती संतोष डावल, नगराध्यक्ष स्वाती राजवाडे, उपनगराध्यक्ष मनीष सावंत, जिल्हा परिषद सदस्य राजेश मुकादम, विलास चाळके, वेदा फडके, माजी उपसभापती संतोष थेराडे, गटविकास अधिकारी रश्मी कुलकर्णी, तहसीलदार वैशाली माने, युयुत्सू आर्ते, नीलम हेगशेट्ये, मुख्याधिकारी शिल्पा नाईक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)