शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

विलंबाने सुटणाऱ्या गाड्यांमुळे देवरूखवासीय त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:18 IST

देवरुख : देवरुख आगारातून सोडण्यात येणाऱ्या बसेस विलंबाने सुटत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. आगाराच्या या कारभाराबद्दल ...

देवरुख : देवरुख आगारातून सोडण्यात येणाऱ्या बसेस

विलंबाने सुटत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. आगाराच्या या कारभाराबद्दल कमालीचा संताप व्यक्त होत आहे. वस्तीच्या गाड्या वेळेत

सोडण्यात याव्यात, याबाबत त्रस्त प्रवाशांनी निवेदनही दिले आहे. दरम्यान, टायरच्या कमतरतेमुळे गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम हाेत असल्याचे सांगण्यात आले.

देवरुख आगारातून दिवसभरात सुमारे १४० बसफेऱ्या सोडण्यात येतात. याकरिता दिवसभर १४० बसेस ग्रामीण भागासह, शहरी भागात फिरत असतात. याकरिता तेवढेच मनुष्यबळही लागते. यापूर्वी मनुष्यबळाअभावी अनेक

चालक - वाहकांना डबल ड्युटी करावी लागत होती. हे अपुऱ्या कर्मचाऱ्यांचे

चक्रव्यूह संपतेय तोपर्यंत या आगारात सध्या विविध मार्गांवरील बसफेऱ्या

वेळेत जात नसल्याची ओरड सुरू झाली आहे.

शनिवारी तर तब्बल ३२ बस फेऱ्या सुमारे तासाभराच्या उशिराने साेडण्यात आल्या. नेहमीच बसेस उशिरा जाण्यामागचे कारण जाणून घेतले

असता सध्या देवरुख आगराला आवश्यक असणाऱ्या बसेसकरिता टायरची उपलब्ध

नसल्याची माहिती सातत्याने पुढे येत आहे. सुमारे पंचवीस ते तीस बसेससाठी

अत्यावश्यक असलेले टायर आणि विविध साधन सामुग्री उपलब्ध होत नसल्याचे

प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

या

सगळ्याचा परिणाम प्रवाशांना भोगावा लागत आहे. सकाळी बदडवाडीला जाणारी बस अनेक वेळा तासाभरापेक्षा अधिक उशिराने जात असल्याचे विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षकांनी सांगितले. गाडीला उशिर झाला की, हे शिक्षक नेहमीच आगाराशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, बहुतांश वेळा

संपर्कच होत नसल्याचीही तक्रार व्यक्त होत आहे. तसेच देवरुख - पांगरी -

रत्नागिरी मार्गावर धावणाऱ्या सायंकाळच्या बसेस दररोज उशिराने सुटत

आहेत. या पूर्वीची सुपर गाडी सुरू करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली हाेती. मात्र, त्यांच्या या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे.

याबाबत देवरुख येथील नायब तहसीलदार के. जी. ठाकरे, काेषागार अधिकारी, पुरवठा विभागाचे

प्रमुख तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी आगाराच्या या कारभाराबाबत व्यथा मांडल्या आहेत. यात काही सुधारणा झाली नाही तर आपण

वरिष्ठांना निवेदन देऊन रितसर तक्रार करणार असल्याचे सांगितले.