शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

विलंबाने सुटणाऱ्या गाड्यांमुळे देवरूखवासीय त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:18 IST

देवरुख : देवरुख आगारातून सोडण्यात येणाऱ्या बसेस विलंबाने सुटत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. आगाराच्या या कारभाराबद्दल ...

देवरुख : देवरुख आगारातून सोडण्यात येणाऱ्या बसेस

विलंबाने सुटत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. आगाराच्या या कारभाराबद्दल कमालीचा संताप व्यक्त होत आहे. वस्तीच्या गाड्या वेळेत

सोडण्यात याव्यात, याबाबत त्रस्त प्रवाशांनी निवेदनही दिले आहे. दरम्यान, टायरच्या कमतरतेमुळे गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम हाेत असल्याचे सांगण्यात आले.

देवरुख आगारातून दिवसभरात सुमारे १४० बसफेऱ्या सोडण्यात येतात. याकरिता दिवसभर १४० बसेस ग्रामीण भागासह, शहरी भागात फिरत असतात. याकरिता तेवढेच मनुष्यबळही लागते. यापूर्वी मनुष्यबळाअभावी अनेक

चालक - वाहकांना डबल ड्युटी करावी लागत होती. हे अपुऱ्या कर्मचाऱ्यांचे

चक्रव्यूह संपतेय तोपर्यंत या आगारात सध्या विविध मार्गांवरील बसफेऱ्या

वेळेत जात नसल्याची ओरड सुरू झाली आहे.

शनिवारी तर तब्बल ३२ बस फेऱ्या सुमारे तासाभराच्या उशिराने साेडण्यात आल्या. नेहमीच बसेस उशिरा जाण्यामागचे कारण जाणून घेतले

असता सध्या देवरुख आगराला आवश्यक असणाऱ्या बसेसकरिता टायरची उपलब्ध

नसल्याची माहिती सातत्याने पुढे येत आहे. सुमारे पंचवीस ते तीस बसेससाठी

अत्यावश्यक असलेले टायर आणि विविध साधन सामुग्री उपलब्ध होत नसल्याचे

प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

या

सगळ्याचा परिणाम प्रवाशांना भोगावा लागत आहे. सकाळी बदडवाडीला जाणारी बस अनेक वेळा तासाभरापेक्षा अधिक उशिराने जात असल्याचे विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षकांनी सांगितले. गाडीला उशिर झाला की, हे शिक्षक नेहमीच आगाराशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, बहुतांश वेळा

संपर्कच होत नसल्याचीही तक्रार व्यक्त होत आहे. तसेच देवरुख - पांगरी -

रत्नागिरी मार्गावर धावणाऱ्या सायंकाळच्या बसेस दररोज उशिराने सुटत

आहेत. या पूर्वीची सुपर गाडी सुरू करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली हाेती. मात्र, त्यांच्या या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे.

याबाबत देवरुख येथील नायब तहसीलदार के. जी. ठाकरे, काेषागार अधिकारी, पुरवठा विभागाचे

प्रमुख तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी आगाराच्या या कारभाराबाबत व्यथा मांडल्या आहेत. यात काही सुधारणा झाली नाही तर आपण

वरिष्ठांना निवेदन देऊन रितसर तक्रार करणार असल्याचे सांगितले.