शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

दुर्गंधीमुळे पर्यटकवर्ग हैराण

By admin | Updated: May 1, 2016 00:09 IST

गणपतीपुळे परिसर : चिमणपऱ्यातच सांडपाणी सोडले जात असल्याने नाराजी

गणपतीपुळे : गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांबरोबरच येथील ग्रामस्थांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. येथील चिमणपऱ्यामध्ये परिसरातील सांडपाणी सोडले जात असल्याने आता गणपतीपुळे ग्रामस्थ व पर्यटकांसाठी दुर्गंधी ही रोजचीच डोकेदुखी झाली आहे.गणपतीपुळेतील कोल्हटकर तिठा या ठिकाणीही दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिसरातील अस्वच्छतेमुळे येथे डासांचे प्रमाणही वाढले आहे. नव्याने बांधलेल्या इमारतींचे सांडपाणी या वहाळांमध्ये राजरोसपणे सोडल्याचे येथील रहिवासी महेश कुबडे यांनी सांगितले. गणपतीपुळे येथे सध्या पर्यटन हंगाम जोरात सुरु आहे. दररोज सध्या हजारो पर्यटक गणपतीपुळे येथे दर्शन तसेच सहलीसाठी येतात. त्यामुळे हा परिसर कायम गजबजलेला असतो. मात्र, पर्यटकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अख्ख्या गावाचं सांडपाणी या पऱ्यातच सोडले जात असून, त्यामुळे ग्रामस्थांसह पर्यटकांना नाकाला रुमाल लावूनच पुढे जावे लागत आहे. यावर गणपतीपुळे ग्रामपंचायतीने उपाययोजना करावी, अशी मागणी पर्यटकांमधून करण्यात येत आहे.या सांडपाण्यामुुळे निर्माण होणारी दुर्गंधी, डासांची होणारी पैदास आणि त्यातून उद्भवणारी रोगराई याला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत येथील ग्रामस्थ दत्ताराम सुर्वे, विश्वनाथ पालकर, महेश कुबडे व अन्य ग्रामस्थ यांनी आरोग्य विभागाजवळ लेखी तक्रार करुनही आरोग्य खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे. (वार्ताहर)ग्रामपंचायतीला विसर : ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माणपरिसरातील लॉज व हॉटेल व्यावसायिकांनी कोल्हटकर तिठ्यातील वहाळात सोडलेली सांडपाण्याची घाण व दलदल शिमगोत्सवाच्या काळात ग्रामपंचायतीने स्वखर्चाने साफ केली. त्यावेळी कोल्हटकर तिठा येथील एका विहिरीचे पाणी यामुळे दूषित झाले होते. त्यामुळे जेसीबी लावून हा वहाळ साफ करण्यात आला व आठ ते दहा दिवसांत याठिकाणचे सांडपाणी हे पाईपलाईनद्वारे योग्य ठिकाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आज या आश्वासनाला दोन ते तीन महिने कालावधी लोटला असून, सोईस्करपणे ग्रामपंचायतीला याचा विसर पडला आहे.- विश्वनाथ पालकर 

आज गणपतीपुळे गावातील गटारांचा मोठा प्रश्न आहे. विकास आराखड्यात ही गटारे बंदिस्त होणार आहेत. मात्र, यासाठी किती कालावधी लागेल हे आज सांगता येत नाही. आज मीही याच रस्त्यावरुन ये-जा करत असतो. कोल्हटकर तिठ्यात गेल्यानंतर प्रचंड दुर्गंधी येते. पावसाळ्यातील पाणी जाण्याच्या वहाळाला आज एका लॉजचे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या लॉज व्यावसायिकांनी या वहाळाला पाणी सोडलं आहे, त्यांनी त्यांच्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.- दत्ताराम सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते 

विल्हेवाट लावावीगणपतीपुळे ग्रामपंचायतीने या सांडपाण्याची अन्यत्र विल्हेवाट लावावी किंवा बंदिस्त गटारामधून ते सोडण्यात यावे. तरच हा प्रश्न सुटू शकतो, असे मत गावातील अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. ग्रामपंचायत आता याबाबत कोणता निर्णय घेते? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.