शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोळशाच्या आणखी दोन भट्ट्या उद्ध्वस्त

By admin | Updated: June 9, 2016 01:17 IST

टेरव येथे वनखात्याची कारवाई : आतापर्यंत २१ भट्ट्यांवर कारवाई

चिपळूण : तालुक्यातील टेरव टेटवीचा माळ येथे वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता कोळशाच्या दोन भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या कारवाईत एकूण २१ भट्ट्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.चिपळूणचे परिक्षेत्र वन अधिकारी गोविंद कोले यांना टेरव येथील कोळशाच्या भट्टीची खबर मिळताच त्यांनी वनपाल आर. बी. पाताडे, रामपूरचे वनरक्षक रामदास खोत, कोळकेवाडीचे वनरक्षक सुर्वे यांच्या पथकाला सांगून ही कारवाई केली. पाताडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कोळशाच्या दोन भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. मात्र या भट्ट्या कोणाच्या आहेत, याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.टेरव परिसरात गेले दोन ते तीन महिने कोळशाच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्याचे काम वनखात्याने सुरू केले आहे. एकनाथ माळी यांनी प्रथम तक्रार केल्यानंतर वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली. यापूर्वी एक ते दोन वेळा आरोपी सापडले होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. परंतु, तरीही भट्ट्या लावण्याचे प्रमाण सुरूच आहे. वनखात्याने आतापर्यंत २१ भट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. विभागीय वन अधिकारी विकास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेत्र वनअधिकारी गोविंद कोले, फिरत्या पथकाचे परीक्षेत्र वनअधिकारी शहाजी पाटील यांच्या सूचनेनुसार ही ठोस कारवाई करण्यात आली. या आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी वनखात्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)