शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

बेरोजगारी वाढली तरी १६० ग्रामपंचायतींत एकही काम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकजण बेरोजगार झाले. मात्र, जिल्ह्यात सध्या सार्वजनिक कामे नसल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकजण बेरोजगार झाले. मात्र, जिल्ह्यात सध्या सार्वजनिक कामे नसल्याने केवळ वैयक्तिक कामेच सुरू असून, जिल्ह्यातील १६० ग्रामपंचायतींमध्ये यंदा एकही काम झालेले नाही.

जिल्ह्यात यंदा रस्ते, पूल आदींसारखी मोठी कामे रोजगार हमी योजनेंतर्गत झालेली नाहीत. कोरोनामुळे यावर्षी केवळ विहिरी, शोषखड्डे, घरकुले, आदी वैयक्तिक कामे करण्यात आल्याने अनेक छोट्या ग्रामपंचायतींमध्ये कामेच झालेली नाहीत.

जिल्ह्यात एकूण ८४६ ग्रामपंचायती आहेत. मात्र, सध्या मोठी कामे नसल्याने काही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेंतर्गत कामे झालेली नाहीत. यात १६० ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

कोरोनामुळे रोजगार हमी योजनेच्या कामावर काही परिणाम झाला नाही. पण जिल्ह्यात सध्या कुठलीच मोठी किंवा सार्वजनिक कामे नाहीत. जी आहेत ती शोषखड्डे, घरकुल, विहिरी यासारखी वैयक्तिक कामे असल्यानेच काही ग्रामपंचायतींकडून रोहयोंतर्गत कामे झाली तर काही ग्रामपंचायतींमध्ये यंदा कामाची निर्मिती झाली नाही.

- अमिता तळेकर, उपजिल्हाधिकारी, रोहयो, रत्नागिरी

फळबाग योजनेला प्रारंभ

रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात फळबाग लागवडीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यंदाही फळबाग लागवडीला या हंगामात सुरूवात करण्यात येणार आहे. ज्यांचे २ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र आहे, अशांनी ग्रामपंचायतीकडे किंवा कृषी सहाय्यकांकडे संपर्क करावा, असे आवाहन या विभागाने केले आहे.