शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

पावसाळा सुरू होऊनही टंचाईची कामे कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST

रत्नागिरी : पावसाळा सुरू झाला, तरी टंचाई आराखड्यातील १२ कोटी ७८ लाख ५५ हजार रुपयांची नळपाणीपुरवठा योजना दुरुस्तीची ...

रत्नागिरी : पावसाळा सुरू झाला, तरी टंचाई आराखड्यातील १२ कोटी ७८ लाख ५५ हजार रुपयांची नळपाणीपुरवठा योजना दुरुस्तीची कामे अजूनही कागदावरच आहेत. कोरोनाचा परिणाम या योजना दुरुस्तीच्या कामावर होते. या विकासकामांची अजूनही ठेकेदारांना ऑर्डर दिलेली नाही. त्यामुळे ही कामे कधी सुरू होणार, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

यंदा जिल्ह्यात ६४ गावांतील १०६ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली होती. या टंचाईग्रस्तांना १३ टॅंकटरनी पाणीपुरवठा करण्यात येत होता. तोही अपुरा असल्याने लोकांचे पाण्यासाठी हाल सुरू होते, परंतु यंदा वादळांमुळे पाऊस पडल्याने जिल्ह्याला पाणी टंचाईचे संकट कमी प्रमाणात भेडसावले. त्यामुळे टँकरवरील खर्च कमी झालेला आहे. यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा १६ कोटी ४३ लाख ३४ हजार रुपयांचा होता. त्यामध्ये नळपाणी योजना दुरुस्तीवर १२ कोटी ७८ लाख ५५ हजार खर्च करण्याचे नमूद करण्यात आले आहे. २४९ नळपाणी योजनांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात मे महिन्यात पाण्याची पातळी खालावते. त्यामुळे भीषण पाणीटंचाई उद्भवते. यंदा कोरोनाच्या संकटात पाणीटंचाईची भीषणता कमी होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीची कामे झालेली नाहीत. एप्रिल आणि मे, २०२१ मध्ये जिल्ह्यात कोरोचा प्रादुर्भाव असल्याने नळपाणी योजना दुरुस्तीची कामे अजूनही निविदा स्तरावर असल्याने ही कामे रखडलेली आहेत.

--------------------------

पाणीटंचाई कृती आराखडा उशिरा

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम सर्वच विकास कामांवर झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर विभागांच्याही विकासकामांवर परिणाम झाल्याने ती सुरू होऊ शकलेली नाहीत. त्याप्रमाणेच या वर्षी तालुक्यातून टंचाईकृती आराखडे उशिरा सादर करण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेकडूनही हा आराखडा जिल्हा प्रशासनाकडे वेळेवर सादर होऊ शकला नाही. त्यातच मंजुरी मिळूनही आराखड्यातील कामे सुरू झालेली नसल्याने, टंचाईमध्ये लाेकांचे हाल झाले आहेत.

-----------------------

पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर - रुपये १६ कोटी ४३ लाख ३४ हजार

पाणी योजना दुरुस्ती खर्च - रुपये १२ कोटी ७८ लाख ५५ हजार

दुरुस्तीसाठी नळपाणीपुरवठा योजना- २४९

------------------------------

तालुका पाणी योजना खर्च (लाखांत)

मंडणगड १५ ९९.००

दापोली ४० १५३.००

खेड २४ १६०.००

चिपळूण ३१ १६९.५०

गुहागर १७ ९८.५०

संगमेश्वर ६७ २५५.५०

रत्नागिरी २२ १५४.००

लांजा १५ ६९.००

राजापूर १५ ११९.५०

एकूूण------------ २४९ १२७८.५५