शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मंत्र्यांकडून निराशा; धान्य दुकानदार ठाम

By admin | Updated: July 15, 2017 14:34 IST

रत्नागिरी जिल्हा रास्तदर धान्य दुकान - चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी , दि. १५ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम चालू झाल्यापासून वाहतूक रिबेटच्या फरकाची रक्कम मिळावी, यासह इतर मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा रास्तदर धान्य दुकान - चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत निराशाच झाल्याने संघटनेने आपल्या १ आॅगस्टपासून धान्यउचल न करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.दि. २३ फेब्रुवारी २०१२च्या शासन निर्णयानुसार तालुका गोदामापासून धान्य दुकानापर्यंत सर्व धान्य पोहोच करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, निविदा प्रक्रिया अपूर्ण असल्याने गेली तीन वर्षे दुकानदार स्वत:च ही वाहतूक करीत आहेत. फेब्रुवारी २०१४ ते जुलै २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील ९३५ दुकानदारांनी अंदाजे १३,८३,७४,४०० एवढी रक्कम स्वत:कडील वापरली आहे. चालू अधिवेशनामध्ये या रकमेला मंजुरी घेऊन तरतूद करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा रास्तदर धान्य दुकानदार संघटनेने १ आॅगस्टपासून धान्याची उचल न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज रत्नागिरी दौऱ्यावर आलेले अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले व त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे उपस्थित होते.यावेळी चव्हाण यांनी संघटनेचे म्हणणे ऐकून घेतले. दुकानदार आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सध्या पॉस मशीनचे काम करा, असे आवाहन त्यांनी संघटनेला केले. मात्र, यातून संघटनेला दिलासा मिळाला नसल्याने संघटनेने सध्या तरी आपला निर्णय कायम ठेवला आहे.