शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांकडून निराशा; धान्य दुकानदार ठाम

By admin | Updated: July 15, 2017 14:34 IST

रत्नागिरी जिल्हा रास्तदर धान्य दुकान - चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी , दि. १५ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम चालू झाल्यापासून वाहतूक रिबेटच्या फरकाची रक्कम मिळावी, यासह इतर मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा रास्तदर धान्य दुकान - चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत निराशाच झाल्याने संघटनेने आपल्या १ आॅगस्टपासून धान्यउचल न करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.दि. २३ फेब्रुवारी २०१२च्या शासन निर्णयानुसार तालुका गोदामापासून धान्य दुकानापर्यंत सर्व धान्य पोहोच करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, निविदा प्रक्रिया अपूर्ण असल्याने गेली तीन वर्षे दुकानदार स्वत:च ही वाहतूक करीत आहेत. फेब्रुवारी २०१४ ते जुलै २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील ९३५ दुकानदारांनी अंदाजे १३,८३,७४,४०० एवढी रक्कम स्वत:कडील वापरली आहे. चालू अधिवेशनामध्ये या रकमेला मंजुरी घेऊन तरतूद करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा रास्तदर धान्य दुकानदार संघटनेने १ आॅगस्टपासून धान्याची उचल न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज रत्नागिरी दौऱ्यावर आलेले अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले व त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे उपस्थित होते.यावेळी चव्हाण यांनी संघटनेचे म्हणणे ऐकून घेतले. दुकानदार आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सध्या पॉस मशीनचे काम करा, असे आवाहन त्यांनी संघटनेला केले. मात्र, यातून संघटनेला दिलासा मिळाला नसल्याने संघटनेने सध्या तरी आपला निर्णय कायम ठेवला आहे.