शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

मंत्र्यांकडून निराशा; धान्य दुकानदार ठाम

By admin | Updated: July 15, 2017 14:34 IST

रत्नागिरी जिल्हा रास्तदर धान्य दुकान - चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी , दि. १५ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम चालू झाल्यापासून वाहतूक रिबेटच्या फरकाची रक्कम मिळावी, यासह इतर मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा रास्तदर धान्य दुकान - चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत निराशाच झाल्याने संघटनेने आपल्या १ आॅगस्टपासून धान्यउचल न करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.दि. २३ फेब्रुवारी २०१२च्या शासन निर्णयानुसार तालुका गोदामापासून धान्य दुकानापर्यंत सर्व धान्य पोहोच करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, निविदा प्रक्रिया अपूर्ण असल्याने गेली तीन वर्षे दुकानदार स्वत:च ही वाहतूक करीत आहेत. फेब्रुवारी २०१४ ते जुलै २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील ९३५ दुकानदारांनी अंदाजे १३,८३,७४,४०० एवढी रक्कम स्वत:कडील वापरली आहे. चालू अधिवेशनामध्ये या रकमेला मंजुरी घेऊन तरतूद करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा रास्तदर धान्य दुकानदार संघटनेने १ आॅगस्टपासून धान्याची उचल न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज रत्नागिरी दौऱ्यावर आलेले अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले व त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे उपस्थित होते.यावेळी चव्हाण यांनी संघटनेचे म्हणणे ऐकून घेतले. दुकानदार आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सध्या पॉस मशीनचे काम करा, असे आवाहन त्यांनी संघटनेला केले. मात्र, यातून संघटनेला दिलासा मिळाला नसल्याने संघटनेने सध्या तरी आपला निर्णय कायम ठेवला आहे.