शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कंत्राटी कामगार वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे गेली दोन वर्षे आरोग्य यंत्रणा तणावाखाली काम करत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानामधून कंत्राटी पद्धतीने ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे गेली दोन वर्षे आरोग्य यंत्रणा तणावाखाली काम करत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानामधून कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय यांची नियुक्ती करण्यात आली. सेवामुक्तीनंतर पुन्हा ही नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांना विमा कवचांपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

यंत्रणा सज्ज

रत्नागिरी : आपत्कालीन परिस्थितीसाठी कोकण विभागातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जीवरक्षक बोटी, जॅकेटस् व इतर सामग्री उपलब्ध आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) तुकडी चिपळूण येथे तैनात केली जाणार आहे.

दोन जिल्ह्यांचा आराखडा

रत्नागिरी : माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी व्यापक आराखडा तयार करण्याचे काम भारत संचार निगमचे अधिकारी करत आहेत. या आराखड्यासह प्रभू स्वत: दूरसंचार मंत्र्यांची बैठक घेणार असून त्याची अंमलबजावणी झाल्यास रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात डिजिटल क्रांती होणार आहे.

काळा सप्ताह

रत्नागिरी : शेतकरी व कामगार यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे २७ मेपासून काळा सप्ताह पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचे काम ग्रामपथकासोबत करण्यास नकार दिल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्रास दिला. त्यामुळे आंदोलन करून काळा सप्ताह पाळण्यात येणार आहे.

खांब बदलण्याची मागणी

राजापूर : तालुक्यातील कोतापूर घुमेवाडी येथील विजेचे खांब गंजले असून तळाकडील भाग सडला आहे. हे खांब केव्हाही पडण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने खांब बदलण्याची मागणी शिवतेज प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे.

ग्राहकांची गैरसोय

गुहागर : तालुक्यातील कोतळूक बागकर स्टॉप येथील भारत संचार निगमचा टॉवर बंद असून रेंज नसल्यामुळे परिसरातील ग्राहकांची गैरसोय होत आहे. हा टॉवर तातडीने कार्यान्वित न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मोबाईल टॉवर बंद असल्याने केवळ शोभेचे बाहुले ठरले आहे.

विजेचा लपंडाव

मंडणगड : तौक्ते वादळानंतर अद्यापही तालुक्यामध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री अचानक वीज खंडित होत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. उष्म्यामुळे घामाने नागरिक हैराण होत असून त्यातच विजेच्या लपंडावामुळे कमालीचा त्रास सोसावा लागत आहे.

शिक्षकांमध्ये नाराजी

रत्नागिरी : राज्यातील शिक्षकांना कोरोनासंदर्भातील सेवेत मोठ्या प्रमाणावर सामील करून घेतले जात आहे. ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या शिक्षकांनाही कोरोनाच्या सेवा बंधनकारक करण्यात आल्याने शिक्षक संघटनांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ५० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या शिक्षकांना ड्युटी किंवा सेवा लावू नये, अशी मागणी होत आहे.

कर्मचाऱ्यांचा बहिष्कार

रत्नागिरी : पोषण ट्रॅकर अ‍ॅप उपलब्ध झाले पाहिजे. अन्यथा अंगणवाडी कर्मचारी त्यावर बहिष्कार टाकतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे. या मुख्य मागणीसह अनियमित पोषण आहार, विमा व मोबाईल प्रोत्साहन भत्त्याचा प्रश्न राज्य सरकारने सोडवावा, अशी मागणी होत आहे.

भाजावळीची कामे अर्धवट

देवरुख : अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीमध्ये भाजावळीची कामे अर्धवट राहिली आहेत. १० टक्के शेतकऱ्यांनी अद्याप भाजावळ केलेली नाही. पालापाचोळा शेतात टाकण्यात आला होता. मात्र, पावसामुळे तो भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.