शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

भास्कर शेट्ये यांच्या जाण्याने वडिलकीचा आधार हरपला : अभिजित हेगशेट्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:38 IST

रत्नागिरी : भास्करकाका यांचा फार मोठा भावनिक व वैचारिक आधार होता. त्यांच्या जाण्याने वडिलकीचा आधार हरपल्याची जाणीव झाली. नवनिर्माण ...

रत्नागिरी : भास्करकाका यांचा फार मोठा भावनिक व वैचारिक आधार होता. त्यांच्या जाण्याने वडिलकीचा आधार हरपल्याची जाणीव झाली. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद सांभाळत त्यांनी मूल्याधिष्ठितेचा आधार नवनिर्माण चळवळीला दिला. त्यांच्या जाण्याने पोरकेपणाची जाणीव होत असल्याचे मत नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी व्यक्त केले.

येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेतर्फे विधानसभेचे माजी निवृत्त सचिव व माजी न्यायाधीश भास्कर शेट्ये यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून भास्कर शेट्ये विराजमान होते. संस्थेतर्फे आयोजित शोकसभेसाठी संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये, नवनिर्माण हाय सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका नजमा मुजावर, डॉ. आशा जगदाळे उपस्थित होते. यावेळी अभिजित हेगशेट्ये यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अभिजित हेगशेट्ये पुढे म्हणाले की, रत्नागिरीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या उच्च शिक्षणानंतर न्यायमूर्ती शेट्ये यांची कारकीर्द अत्यंत वैभवशाली राहिली. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांनी विधिमंडळातील प्रधान सचिव पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. सर्व व्यापातून कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त पद सांभाळत साहित्य चळवळीला सन्मान मिळवून दिला. रत्नागिरीच्या सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीचे नैतिक आणि वैचारिक आधार होते. त्यांच्या जाण्याने आधार कोसळला असल्याचे हेगशेट्ये यांनी स्पष्ट केले.