शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

ग्रामपंचायत पथदीप वीज बिलासाठी स्वतंत्र निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

आबलोली : ग्रामपंचायत पथदीपांचे वीज बिल हे १५ व्या वित्त आयोगातून कपात न करता शासनाने त्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध ...

आबलोली : ग्रामपंचायत पथदीपांचे वीज बिल हे १५ व्या वित्त आयोगातून कपात न करता शासनाने त्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्राम संवाद सरपंच संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रमेय प्रदीप आर्यमाने यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे.

ग्रामविकास विभागाने दिनांक २३ जून २०२१ रोजी शासनाने १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून पथदीपांचे वीज बिल भरण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचा सर्व स्तरातून विरोध होत आहे. महाराष्ट्रातील अनेक छोट्या ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाचा निधी हा फार कमी मिळतो. त्यामधूनच संगणक परिचालकाचे मानधन द्यावे लागते. त्यामधूनच जर पथदीपांचे वीज बिल भरले तर गावाचा विकास करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामपंचायतीच्या पथदीपांचे वीज बिल १५ व्या वित्त आयोगातून देण्याचा जो शासन निर्णय घेण्यात आला आहे. तो त्वरित मागे घेण्यात यावा आणि राज्य सरकारने वीज बिल भरण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी, अशी मागणी प्रमेय आर्यमाने यांनी केली आहे.