शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

पर्यटन विकासासाठी निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST

रत्नागिरी : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी अनेक सुविधा व निधी मिळण्यासाठी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे खासदार नारायण राणे ...

रत्नागिरी : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी अनेक सुविधा व निधी मिळण्यासाठी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे खासदार नारायण राणे यांना निवेदन देण्यात आले आहे.

जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असून, जर निधी उपलब्ध झाला तर जिल्ह्याचा योग्य प्रकारे विकास होऊन जिल्ह्याचा पर्यटन विकास सक्षम होईल. जिल्ह्यातील रस्त्यांची समस्या गंभीर असून, अनेक रस्ते खराब झाले असून ते नवीन करण्याची आवश्यकता आहे. तत्काळ रस्ते दुरुस्त करण्यात यावेत. जिल्ह्यात अनेक गड, किल्ले असून, त्यांची अवस्था दयनीय झाली असून दुरुस्ती होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अनेक समुद्र किनारे असून, तेथेही पार्किंग, प्रसाधनगृहे, पाण्याची, विजेची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. या सर्व व्यवस्था समुद्रकिनारी झाल्यास तेथे फार मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे, स्मारकांचा विकास होणे गरजेचे आहे. शहरातील लोकमान्य टिळकांच्या स्मारकाची दुरवस्था झाली असून, दुरुस्ती व्हावी, मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे रखडले असून, ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.