शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

मासळी बाजार दोन वेळा सुरू ठेवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:29 IST

रत्नागिरी : कोरोना संसर्गामुळे शासनाकडून करण्यात आलेेल्या कडक लॉकडाऊनमुळे मच्छीमार समाजाच्या व्यवसायावर खूपच वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने ...

रत्नागिरी : कोरोना संसर्गामुळे शासनाकडून करण्यात आलेेल्या कडक लॉकडाऊनमुळे मच्छीमार समाजाच्या व्यवसायावर खूपच वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने त्वरित याेग्य ते स्पष्ट आदेश जारी करून मच्छीमार समाजाला दिवसातून दोन वेळा मासळी विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र कृती समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे केली आहे.

शासनाच्या आदेशानुसार मासळी खरेदी-विक्री, वाहतूक करण्याची परवानगी आहे. मासळी विक्री सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत असा नियम आहे. मासेमारीचा केवळ ४० दिवसांचा हंगाम शिल्लक आहे. त्यानंतर ६१ दिवस मासेमारी बंद राहणार आहे. अशा वेळी संचारबंदीच्या काळात मासळी विक्री झाली नाही तर मासेमारी नौकांवर काम करणारे तांडेल, खलाशी यांचा दैनंदिन मेहनताना देणार कुठून, डिझेल, बर्फ, इत्यादी सामग्रीसाठी खर्च करणार कुठून, अशा अनेक आर्थिक संकटांत मच्छीमार व त्यावर अवलंबून असलेला मच्छीमार समाज अडचणीत आहे.

त्यासाठी किरकोळ व होलसेल मासळी विक्री बाजार तसेच बंदरांवर, जेटींवर पहाटे पाच ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत अशा दोन सत्रांत मासळी विक्री सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. तसेच नागरिकांना मार्केटमध्ये येण्या-जाण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या परवानग्या देता येत नसतील तर मासेमारी नौकेवरील संबंधित सर्व तांडेल, खलाशी यांची मेहनताना रक्कम ३१ मे अगोदर राज्य सरकारने देण्याची हमी द्यावी. मासेमार, मासे विक्रेता संबंधित सर्व कुटुंबाला चार महिन्यांचा म्हणून प्रतिकुटुंबास प्रतिमहिना २५ हजार रुपये भत्ता द्यावा. परराज्यांतील खलाशी यांना गावी जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक व्यवस्था करावी, याप्रमाणे व्यवस्था केल्यास मासेमारी व्यवसाय बंद करण्याचा विचार करू अथवा संचारबंदीमध्ये मागण्यांनुसार सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे करण्यात आली आहे.