शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST

रत्नागिरी : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष हरिश शेकासन यांनी शासनाकडे ...

रत्नागिरी : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष हरिश शेकासन यांनी शासनाकडे केली आहे.

यंदा २०२१ मध्ये देशभरात जनगणना होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. देशात १८७२ मध्ये पहिल्यांदा जनगणना झाली होती. त्यानंतर १८८१ पासून दर १० वर्षांनी जनगणना होते. १९३१ पर्यंत देशात प्रत्येक जातीची गणना केल जात होती. त्यात प्रत्येक जातीची संख्या, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीची माहिती असायची. १९४१च्या जनगणनेतही जातीचा उल्लेख करणारा कॉलम होता. मात्र, दुसरे महायुध्द सुरू झाल्याने ही जनगणना झाली नाही. दुसऱ्या मागास आयोग म्हणजेच मंडल आयोगाने ओबीसींची देशात ५२ टक्के लोकसंख्या असल्याचे जाहीर केले होते. त्यावरून ओबीसींना आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली होती.

नव्वदच्या दशकात मंडल आयोग आल्यानंतर प्रादेशिक पक्षांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. देशात यापूर्वी जातनिहाय जनगणना झाली नव्हती असे नाही. स्वातंत्र्यापूर्वी जातनिहाय जनगणना झाली होती. मात्र, १९४१ नंतर जातनिहाय जनगणना बंद करण्यात आली. फक्त अनुसूचित जाती आणि जमातीचीच जनगणना केली जात आहे, मात्र ओबीसींची जनगणना होत नसल्याने त्यांची ठोस लोकसंख्या किती आहे याची माहिती मिळत नाही. त्यामुळे त्यांची शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीही समजून येत नाही. त्यांचे शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करता येत नाही. तसेच ओबीसींची आकडेवारी नसल्याने त्यांच्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष निधी पाठविला जात नाही. ओबीसींसाठी योजना, कार्यक्रम आखण्यासाठी स्वतंत्र जनगणना होणे आवश्यक आहे. त्यासाठी सन २०२१ या चालू वर्षात होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष हरिश शेकासन यांनी केली आहे.