शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बॉण्ड पेपरला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:12 IST

झाडी तोडण्याची मागणी रत्नागिरी : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत लाखो मजूर कार्यरत आहेत. पावसामुळे ग्रामीण मार्गावरील झाडी न ...

झाडी तोडण्याची मागणी

रत्नागिरी : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत लाखो मजूर कार्यरत आहेत. पावसामुळे ग्रामीण मार्गावरील झाडी न तोडल्यामुळे समोरील वाहन दिसत नाही. अपघाताचा धोका निर्माण झाला असल्याने झाडी तोडण्याची मागणी जनतेतून होत आहे. यासाठी एमआरजीएस अंतर्गत मजुरांना काम उपलब्ध व्हावे, अशी मागणी केली जात आहे.

परवानगीची मागणी

रत्नागिरी : शहरासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासेस घेण्यात येतात. परंतु, कोरोनामुळे क्लास घेण्यास बंदी असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ऑनलाइन क्लासेससाठी वेळेची मर्यादा असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कोचिंग क्लास सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी.

अणुस्कुरामार्गे वाहतूक

लांजा : लांजा एस. टी. आगारातून लांजा - पाचल अणुस्कुरामार्गे एस. टी. बस सुरू करण्यात आली आहे. याशिवाय सोमवार दिनांक २ ऑगस्टपासून तालुक्यातील ग्रामीण भागातील काही एस. टी. फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. हर्चे, खोरनिनको, साटवली, सापुचेतळे मार्गावर फेऱ्या सुरु केल्या जाणार आहेत.

अपघाताचा धोका

रत्नागिरी : शहरातील गोखले नाका येथे रस्त्याच्या मध्येच मोठा खड्डा पडला असून, छोट्या वाहनांना अपघाताचा धोका संभवत आहे. याठिकाणी पूर्वी पोलीस चौकी होती. परंतु त्याच मार्गावर आता खड्डा पडल्याने पावसाचे पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. शहरातील नागरिकांकडून येता-जाता खड्ड्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुख्यालयाचे वावडे

रत्नागिरी : अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे गरजेचे आहे. शासन निर्णय असतानाही अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे. शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, कृषीसेवक यासह अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

हळदीचे बियाणे उपलब्ध

रत्नागिरी : शहरालगतच्या भाट्ये नारळ संशोधन केंद्रात हळदीचे बियाणे उपलब्ध आहे. जिल्ह्यात हळदीचे चांगल्या प्रकारे उत्पादन होत आहे. शासनाकडून हळदीचे बियाणे उपलब्ध केले जात नव्हते. हे लक्षात घेऊन भाट्ये नारळ संशोधन केंद्रात बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात आहे.

वाहतुकीत बदल

चिपळूण : तालुक्यातील कळकवणे-आकले-तिवरे रस्त्यावरील पूल वाहून गेल्यामुळे व दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सध्या बंद आहे. पिंपरी नाका ते पेढांबे नाका-खडपोली व वालोटी, आकले या पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. पुलाचे काम होईपर्यंत पर्यायी मार्ग सुरू राहणार आहे.