शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

कामकाजाचा बोजवारा

By admin | Updated: November 1, 2015 22:52 IST

गुहागर तालुका : संगणकीकृत सातबारा, फेरफारात गोंधळ

गुहागर : संगणकीकृत सातबारा व फेरफारमुळे जमीन मालकांमध्ये गोंधळ उडाला आहे. याबाबत प्रांताधिकारी रवींद्र हजारे हे गुहागरमध्ये असताना याबाबत संपर्क साधला असता याविषयी सर्व प्रयत्नांनंतरही अपेक्षित यश येत नसल्याचे सांगितले. यामुुळे संगणकीकृत कामकाजाचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून, जमीनमालक व शेतकऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गुहागर तालुका लहान असल्याने राज्यातील प्रथम १० तालुक्यांमध्ये संगणकीकृत सातबारा व फेरफार नोंदीसाठी निवड करण्यात आली. गेल्या दहा वर्षांत तालुक्याला पर्यटनदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाल्याने जागांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याविषयी प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांना सद्यस्थितीबाबत माहिती विचारली असता सांगितले की, शासनाने दिलेल्या कामकाजाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आमचे काम आहे. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आपण करत आहोत. गुहागर तालुक्याचा विचार करता दुर्गम भागात इंटरनेट सुविधा नाही, यासाठी मंडल अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये ब्रॉडबॅण्ड सुविधा देण्यात आली आहे. असे असले तरी या ब्रॉडबॅण्ड सेवेतून संगणकीय नोंदीसाठी अपेक्षित गती मिळत नसल्याने कुठल्याच नोंदी व्यवस्थित होत नाहीत. ही गती वाढवण्याच्या दृष्टीने बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन यामधून काही पर्याय निघतो का, याबाबत प्रयत्न चालू आहेत. काही दिवसांपूर्वी तलाठ्यांना नोंदी घालताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी दोन संगणक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अल्पबचत हॉल येथे माहिती देण्यात आली. मात्र, इंटरनेट स्पीड नसल्याने हे तज्ज्ञही हतबल झाले. अडलेल्या नोंदी पूर्ण व्हाव्यात, यासाठी चिपळूण येथे काही तलाठ्यांना बोलावून तसा प्रयत्न करण्यात आला. यालाही अपेक्षित यश मिळाले नाही. अनेक वेळा रविवारी सुटीच्या दिवशी रत्नागिरी येथे जाऊन या नोंदी घालण्याचा प्रयत्न तलाठी करत असल्याचेही प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी सांगितले. जोपर्यंत मूळ सातबारा उताऱ्याप्रमाणे आॅनलाईन सातबारा जुळत नाही तोपर्यंत आॅनलाईन सातबारा व फेरफार नोंदी करणे बंद करुन हस्तलिखीत नोंदी व सातबारा उतारे देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आता ग्रामीण भागातून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) महसूल विभाग : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन हतबल झालेल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, महसूल विभागाने सातबारा उतारे आॅनलाईन केले आहेत. मात्र, याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होऊ लागला आहे. सातबारा मागण्यासाठी गेले असता नेट नाही, असे उत्तर दिले जाते. त्यामुळे जुनी पध्दती बरी होती, असे म्हणण्याची वेळ आहे.