शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

धनादेश देऊनही सांस्कृतिक केंद्राच्या कामाला विलंब

By admin | Updated: December 10, 2015 00:52 IST

रमेश कदम : नगराध्यक्षांना नाहक बदनामीचा घाट

रमेश कदम : नगराध्यक्षांना नाहक बदनामीचा घाटचिपळूण : इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या कामापोटी ठेकेदाराला धनादेश द्यावा. यासाठी पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा मोर्चा आणण्यात आला. नगराध्यक्षांना कोणत्याही धनादेशावर सही करण्याचा अधिकार नाही, असे असताना नगराध्यक्षांचे नाव नाहक बदनाम करण्याचा घाट काहींनी घातला. आता ठेकेदाराला देयकाचा धनादेश देऊन झाला आहे. तरीही सांस्कृतिक केंद्राचे काम का सुरू झाले नाही, याचे उत्तर ठेकेदारासाठी मोर्चा काढणाऱ्यांनी द्यावे, असे माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावे, असे आम्हालाही वाटते. सन २००५पासून सांस्कृतिक केंद्र बंद आहे. त्यावेळी सत्ताधारी वेगळे होते. आमची सत्ता आल्यानंतर आम्ही सांस्कृतिक केंद्राबाबत पाठपुरावा सुरु केला. माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी दीड कोटी रुपये आम्हाला दिले आणि या कामाला गती आली. परंतु, निकषानुसार त्याचा खर्च केला जात आहे. त्याचे राजकारण केले जात आहे. काही लोकांनी भंगार विकले, त्याचे मूल्यांकन केले नाही आणि बोंबाबोंब सुरु केली आहे. लोकांना वस्तुस्थिती माहिती आहे. सुपारी देऊन बिले काढण्यासाठी मोर्चा आणल्याचे नागरिक जाणतात, असेही ते म्हणाले. नगरसेवक इनायत मुकादम सातत्याने कुरबुरी व आरोप करत असल्याबद्दल छेडले असता त्याच्याबद्दल काय बोलणार. त्यांचा स्वभाव सर्व जनतेला माहीत आहे. नगराध्यक्षांनी तिजोरी लुटली, असे त्यांचे म्हणणे आहे. नगराध्यक्षा स्वच्छ चारित्र्याच्या व पारदर्शक कारभार करणाऱ्या आहेत. हे जनतेला ठाऊक आहे. मुंबईत जातानाही त्या स्वत:ची गाडी घेऊन जातात. अशा नगराध्यक्षांवर आरोप करताना आपली योग्यता ओळखायला हवी. माझा पीए असताना त्याने काय काय प्रताप केले ते मला माहीत आहे. सात ते आठ महिने आणखी उड्या मारेल. पुढे काय करेल, असा प्रतिप्रश्नही कदम यांनी केला. भाजी मंडईच्या मूल्यांकनाबाबत ते म्हणाले, कमी खर्चात भाजी मंडई कशी उभी राहिली, असा प्रश्न जिल्हाधिकारी यांनी केला आहे. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलातील रंगमंचासाठी १८ ते १९ हजार रुपये भाडे आकारण्याची शिफारस केली आहे. एवढे भाडे कोण देईल का? मग ते क्रीडा संकुल बंद राहील नाही तर काय? लोकांना वस्तुस्थिती माहीत नाही. परंतु, ज्यांना वस्तुस्थिती माहीत आहे तेही अपप्रचार करतात व पालिकेला बदनाम करतात हे अयोग्य आहे. चार वर्षे सुखाने संसार केल्यानंतर तुम्हाला आत्ताच साथ सोडावी असे का वाटले? किंवा आताच आघाडी बेकायदेशीर आहे, असे स्वप्न का पडले? हा सगळा प्रसिध्दीसाठीचा स्टंट आहे. या शहरातील जनता सुज्ञ आहे, असेही कदम म्हणाले. (प्रतिनिधी)रमेश कदम म्हणाले,इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या कामाचे राजकारण केले जातेय.काहींनी भंगार विकले, त्याचे मूल्यांकन केले नाही.सुपारी देऊन बिले काढण्यासाठी मोर्चा आणला.वस्तुस्थिती माहीत असणारेच पालिकेला बदनाम करताहेत.चार वर्षे सुखाने संसार केल्यावर आताच का साथ सोडता?