शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

लोटेतील ‘दीपक केमटेक्स’ अचानक बंद

By admin | Updated: November 29, 2015 01:12 IST

कामगार अस्वस्थ : व्यवस्थापकांना मारहाण झाल्याची तक्रार

आवाशी : कामगार कमी केल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीनंतर कोणतीही पूर्वसूचना न देता लोटेतील दीपक केमटेक्स ही कंपनी एका रात्रीत अचानक बंद करण्यात आली आहे. कंपनीत तयार असलेला दहा हजार किलो माल रातोरात कंपनीतून गायब झाला असल्याने कामगारही बुचकळ्यात पडले आहेत. कंपनी नेमकी कधी सुरू होईल, याची माहिती कोणालाही नसल्याने ३५ कामगार अस्वस्थ झाले आहेत. दीपक केमटेक्स प्रा. लि. ही कंपनी लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीत, मात्र आवाशी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गेली वीस वर्षे कार्यरत आहे. स्थापनेपासूनच सतत काही ना काही कारणाने ही कंपनी चर्चेत राहिली आहे. कंपनीतील रंग उत्पादनापासून निघणारा घनगाळ उघड्यावर टाकण्यासारखे प्रकार सातत्याने सुरू होते. या घनगाळामुळे एका शेतकऱ्याला फटका बसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कंपनी दोन वर्षांपूर्वी बंद केली होती. त्यानंतर ती पुन्हा सुरू झाली. मागील आठ महिन्यांपासून ही कंपनी प्रदूषणाऐवजी व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणामुळे चर्चेत राहिली आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दोनवेळा प्रसिद्ध केले होते.दिवाळी पार पडल्यानंतर इथे कार्यरत असणाऱ्या पस्तीस कामगारांपैकी सत्यवान आंब्रे, प्रकाश आंब्रे व दिलीप कुळे या तीन कामगारांना चार दिवसांपूर्वी तडकाफडकी कामावर येण्यास मज्जाव करण्यात आला. त्याबाबतची कोणतीही लेखी सूचना आपल्याला दिलेली नसल्याचे या कामगारांनी सांगितले. हे तीनही कामगार महाराष्ट्र नवनिर्माण सेना युनियनचे सदस्य आहेत.शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता वैभव खेडेकर, युनियनचे उपाध्यक्ष राजेंद्र घाग व माजी विभागाध्यक्ष नाना चाळके हे कंपनीत गेले होते. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक एस. डी. महाडिक व त्यांच्यात चर्चा सुरू असताना महाडिक यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे किरकोळ बाचाबाची झाली. चर्चा निष्फळ ठरल्याने उद्यापासून गेटबंद आंदोलन पुकारू, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, शनिवारी सकाळी पहिल्या सत्रात व दुसऱ्या सत्रात आलेले जवळपास पंधरा कामगार अकरा वाजेपर्यंत कंपनीत बसून होते. कंपनी व्यवस्थापक, शिफ्ट इंचार्ज वा सुपरवायझर कोणीही कंपनीत न आल्याने ते भांबावून गेले. कामावर आलेले सर्व कामगार हे युनियनचे सभासद होते. कंपनीत मागील एक महिन्यापासून तयार केलेला अंदाजे दहा हजार किलो माल गायब झाला असून, कंपनीचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. अखेर या कामगारांनी दुपारपर्यंत वाट पाहून घरी जाणे पसंत केले. मात्र, याबाबत कोणालाही काहीही माहिती नसल्याचे समजते. याबाबत कंपनी पर्यवेक्षक प्रताप खेतले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी मनसेचे वैभव खेडेकर यांच्यासोबत आलेले राजेंद्र घाग व नाना चाळके यांनी कंपनी व्यवस्थापक महाडिक यांना मारहाण केली असून, आमच्याही जिवाला धोका असल्याने शनिवारी कंपनीत कोणीही आलेले नाही. मात्र, वीजपुरवठा का बंद करण्यात आला आहे याबाबत त्यांनी बोलणे टाळले. रात्री दहा हजार किलो माल कंपनीबाहेर काढल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे कंपनी नेमकी कधी सुरू होणार, की ती बंदच राहणार, याचे कोडे उलगडलेले नाही. (वार्ताहर) 

आमच्याकडे शुक्रवारी रात्री दीपक केमटेक्स या कंपनीचे महाडिक यांनी राजेंद्र घाग व नाना चाळके यांनी कंपनीत येऊन मारहाण केल्याची साधी तक्रार दिली आहे. महाडिक हे आजारी असून, दोन दिवसांनंतर रीतसर तक्रार देण्यासाठी येणार आहेत.- विवेक साळवी,हवालदार, लोटे पोलीस दूरक्षेत्रमला घशाचा त्रास होत असून, बोलता येत नाही. मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. कृपया मला सहकार्य करावे.- एस. डी. महाडिक,व्यवस्थापक, दीपक केमटेक्स प्रा. लि.