शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

मच्छिमारांसाठी वेल्फअर बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय

By admin | Updated: July 16, 2014 22:42 IST

मुंबईत बैठक : असंघटित खलासी, बोटमालक व वितरकांशी चर्चा

गुहागर : आजपर्यंत असंघटित असलेले मच्छिमार बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने फिशरमॅन वेल्फेअर बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बोटीवर काम करणारे खलासी, बोटींचे मालक आणि वितरकांचे प्रतिनिधी यांची मंत्रालयात एक विशेष बैठक झाली, त्यावेळी कामगारमंत्री भास्कर जाधव यांनी हा निर्णय जाहीर केला.वर्षातून पावसाळ्याचे ४ महिने ेवगळता समुद्रात बोटीवर जीवन जगणाऱ्या या समाजाचा आर्थिक स्तर वाढवा, त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक सहाय मिळावे, हा विचार करुन शासनाने असंघटित मच्छिमार बांधवांसह बोटींचे मालक आणि वितरक यांना एकत्र करुन संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात बैठक आयोजित केली होती.खलाशांमुळे मालकाचे आणि मालकामुळे खलाशाचे नुकसान होऊ नये, या मुद्द्यासह बोटींच्या मालकांनाही सोयीसुविधा उपलब्ध करुन देऊन घाऊक व्यापाऱ्यांकडून त्यांच्या मालाला चांगला भाव कसा मिळेल, याबाबतही बैठकीत चर्चा झाली. नेपाळ, गुजरात, कर्नाटकमधून रोजगारासाठी येणाऱ्या खलाशांना त्यांच्या कुटुंबाला सोयीसुविधा देता येऊ शकतील. केवळ समुद्रात किंवा खाडीत मच्छिमारी करणाऱ्यांनाच नव्हे; तर गोड्या पाण्यात मच्छिमारी करणाऱ्यांनाही या वेल्फेअर बोर्डाचे फायदे मिळू शकतील, असे जाधव यांनी सांगितले. बैठकीत चर्चेवेळी उपस्थित झालेल्या सर्व मुद्द्यांना बोटींच्या मालकांनीही मान्यता दर्शवली.या बैठकीला आमदार माणिक जगताप, चंदू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, दापोली - मंडणगड विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई, मच्छिमार समाजाचे नेते दत्ताजी वणकर, भास्कर मोरे, चिपळूणचे माजी नगरसेवक फैसल कास्कर यांच्यासह खलासी, मालक व वितरक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)