शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भोपण खाडीतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: July 15, 2014 23:44 IST

दापोली तालुका : निधी मंजूर होऊनही पंधरा वर्षे खाडीपुलाकडे दुर्लक्ष...

शिवाजी गोरे - दापोलीदापोली तालुक्यातील दाभीळ भोपण खाडीवर पूल व्हावा, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे. १९६६मध्ये दाभीळ येथे मॉडर्न हायस्कूलची स्थापना झाली व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना आशेचा किरण मिळाला. परंतु शिक्षण घेण्यासाठी होडक्याचा आधार घ्यावा लागला. गेली ४० वर्षे आपली शैक्षणिक भूक भागवण्यासाठी जीव धोक्यात घालून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.दाभीळ येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये आपली शैक्षणिक भूक भागवण्यासाठी भोपण-पंदेरी येथील सुमारे ६० विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून त्यांना खाडी पार करावी लागत आहे. आपला पाल्य घराबाहेर पडल्यापासून घरी परत येईपर्यंत पालकांना काळजी असते. पावसाचा जोर वाढल्यास होडकाचालकसुद्धा त्यांना धोक्याचा इशारा देऊन परत पाठवतो.काही वेळा अतिवृष्टीचा इशारा दिल्यास सलग आठ दिवस शाळेला दांडी मारावी लागते. दाभीळ पंचक्रोशीत एकमेव मॉडर्न हायस्कूल आहे. या हायस्कूलमुळे शिक्षणाची सोय झाली. परंतु गेली ४० वर्षे खाडीपुलाची मागणी करुनही ग्रामस्थांच्या मागणीला यश आले नाही.युतीच्या सत्ता काळात तत्कालीनमंत्री रामदास कदम यांनी या खाडी पुलाला मंजुरी दिली होती. १९ जून १९९९ रोजी या पुलाची टेंडर नोटीस प्रसिद्ध झाली होती. ७ कोटी रुपये या खाडीपुलासाठी मंजूर झाले होते. परंतु त्यानंतर युतीचे सरकार गेले व आघाडी सरकार आले. गेली २५ वर्षे या खाडीपुलाचा भोपण ग्रामपंचायतीमार्फत पाठपुरावा सुरु आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.दाभीळ भोपण खाडीपूल मार्गी लागल्यास दळणवळणाची सोय होइल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार नाही. सरकारने विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण केले आहे. मात्र, हेच सरकार दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहेत. धोकादायक खाडीत यापूर्वी दोनवेळा दुर्घटना घडून काहींना मृत्यूला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे गावातील शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी दाभीळला पाठवण्याऐवजी काही पालक मुलींचे शिक्षणच बंद करीत आहेत. धोकादायक खाडी पार करुन शाळेत जाण्यापेक्षा शाळा सोडा, असा तगादा काही पालक विद्यार्थ्यांकडे लावत आहेत.दाभोळ मॉडर्न हायस्कूलचे मुख्याध्यापक दळवी, अकबर शमशुद्दीन, अजित तांबे, एस. एन. होनवले, एस. एम. मुस्सा, ए. एस. दळवी, एफ. आय. काववेकर, कैलास गांधी, बी. एस. शिरसाट आदी शिक्षक मुलांना प्रोत्साहीत करुन शाळेत येण्यास सांगतात.