शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वायूगळती झाल्याने कामगाराचा मृत्यू

By admin | Updated: August 13, 2016 00:38 IST

एक गंभीर : गरूडा केमिकल्स कंपनीतील दुर्घटना

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील गरुडा केमिकल कंपनीत गुरुवारी सायंकाळी वायूगळती झाली. यामध्ये मुकेश सुभाष पवार या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य एका कामगाराची प्रकृ ती गंभीर असून, त्याच्यावर डेरवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये गरुडा केमिकल ही कंपनी सन २००१पासून कार्यरत आहे. गरुडा केमिकल कंपनी ही राजेंद्र गोगटे यांच्या मालकीची असून, या कंपनीमध्ये एम. ए. जी. सायलीक अ‍ॅसिड या केमिकलचे उत्पादन घेतले जाते. यासाठी लागणारा कच्चा माल (टुक्लोरो इथेनॉल) हे द्रवरूप रसायन ड्रममधून बाहेर काढत असताना या रसायनाचा घातक वायू हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर मिसळून त्या ठिकाणी काम करणाऱ्या मुकेश सुभाष पवार (२९, रा. नातूनगर, खेड, सध्या आवाशी) व अनिल गंगाराम हळदे (३५, रा. चिरणी, ता. खेड) या दोन कामगारांना वायूची बाधा झाली. दोन्ही कामगारांना त्वरित चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. शुक्रवारी सकाळी सात वाजता मुकेश सुभाष पवार याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. अनिल हळदे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक कैलास घोसाळकर यांनी दिली.लोटे सरपंच श्रेया चाळके व उपसरपंच सुरेंद्र गोवळकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी कंपनीला भेट दिली. संबंधित कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. लवकरच लोटे ग्रामपंचायतीमध्ये लोटे वसाहतीतील कंपनी व्यवस्थापकांची बैठक घेतली जाणार आहे. कंपन्यांमध्ये गेले काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांची संबंधितांकडून माहिती घेऊन कामगारांच्या सुरक्षिततेविषयी सुधारणा करण्याची विनंती केली जाणार असल्याची माहिती सरपंच श्रेया चाळके यांनी दिली.या घटनेची नोंद लोटे पोलिस चौकीत झाली असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. एस. काकडे करत आहेत. (वार्ताहर)चौकटसुरक्षेची साधने नाहीत ?गरुडा कंपनीमध्ये सुरक्षा साधनांची कमतरता असून, गेल्या दहा वर्षांपासून येथे काम करणाऱ्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधीही भरला जात नसल्याचे समजते. तसेच कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधाही पुरविल्या जात नाहीत. कंपनीमध्ये आग लागल्यास आग विझविण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे येथील कामगारांनी सांगितले.कामगारांना अपुरी माहितीगरुडा कंपनीमध्ये मुकेश सुभाष पवार हा कामगार मागील एक महिन्यापासून कामाला होता, तर अनिल हळदे हे गेली दोन वर्षे येथे काम करतात. घटना घडली त्यावेळी टुक्लोरो इथेनॉल हे रसायन दोनशे लीटरच्या ड्रममधून पन्नास लीटरच्या ड्रममध्ये खाली करण्याचे काम सुरू होते. हे काम एका रबरी पाईपच्या सहाय्याने केले जाते. मात्र, या दोन कामगारांना याची माहिती दिली गेली नसल्याने या कामगारांनी दोनशे लीटरचा ड्रम आडवा करून त्यातून टुक्लोरो इथेनॉल रसायन काढण्याचा प्रयत्न केला. तसेच या कामगारांकडे कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने नसल्याने या घातक वायूची लागण दोघांना झाली.