शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

रासायनिक सांडपाण्यामुळे म्हशींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

आवाशी : उघड्यावर सोडण्यात आलेले रासायनिक सांडपाणी प्यायल्याने गुणदे - तलारीवाडी येथील शेतकऱ्याच्या तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून, ...

आवाशी : उघड्यावर सोडण्यात आलेले रासायनिक सांडपाणी प्यायल्याने गुणदे - तलारीवाडी येथील शेतकऱ्याच्या तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून, सहा म्हशी अत्यवस्थ आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजता लोटे - आवाशी औद्योगिक वसाहतीतील हर्डेलिया कंपनीच्या माळरानावर घडली.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, गुणदे - तलारीवाडी येथील शेतकरी यशवंत आखाडे यांच्या नऊ म्हशी नेहमीप्रमाणे आवाशी - गुणदे फाट्यालगत असणाऱ्या हर्डेलिया कंपनीच्या माळरानावर चरण्यासाठी गेल्या होत्या. दुपार उलटली तरीही म्हशी गोठ्याकडे परतल्या नाहीत म्हणून आखाडे, त्यांचे शेजारी रमेश माने यांनी शोधाशोध सुरु केली. ते येथील हर्डेलिया कंपनीच्या आवारात येताच काही म्हशी या माळरानावर तोंडातून फेस येत असल्याच्या अवस्थेत दिसून आल्या. माने यांनी याची माहिती आखाडे यांना तत्काळ दिली. त्याप्रमाणे आखाडे व त्यांचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. या परिसरातील पशुवैद्यकीय अधिकारी मोडक यांना या घटनेची माहिती देऊन पाचारण करण्यात आले. त्यांनी लगेचच सर्वच म्हशींवर उपचार सुरु केले. मात्र, नऊपैकी तीन म्हशी उपचाराआधीच मृत झाल्या होत्या तर उर्वरित मृत्यूशी झुंत देत होत्या.

या घटनेची माहिती आवाशी - लोटे परिसरासह पंचक्रोशीत पसरताच अनेक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ एकवटले. यामध्ये खेडचे उपसभापती जीवन आंब्रे, माजी उपसभापती एस. के. आंब्रे, पप्पूशेठ आंब्रे, लोटेचे सरपंच चंद्रकांत चाळके, घाणेखुंटचे सरपंच अंकुश काते, आवाशीचे उपसरपंच अमित आंब्रे, लोट्याचे शाखाप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य सचिन काते, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष समीर आंब्रे, निशिकांत कदम, आवाशी, गुणदे, शेल्डी, घाणेखुंट, कोतवली, लोटे, पीरलोटे येथील शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी, लोटे पोलीस दूरक्षेत्र यांना ग्रामस्थांकडून देण्यात आली. यानंतर उशिराने खेडचे नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक निशा जाधव याही घटनास्थळी दाखल झाल्या. घाणेखुंटचे तलाठी डी. एस. ढगे, सीईटीपी इन्चार्ज शिंदे, घरडाचे एच. आर. मॅनेजर अनिल भोसले हेही त्याठिकाणी आले. यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

पावसाच्या पाण्याचा फायदा घेत येथील नाल्यातून सोडण्यात आलेल्या रासायनिक सांडपाण्याचे नमुने घेऊन संबंधित कंपनीचा शोध घ्यावा व शेतकरी आखाडे यांना नुकसानभरपाई देऊन संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

......................

प्रदूषणचे अधिकारी पाच तासांनी

अंदाजे सायंकाळी चार वाजता एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना कळवूनही रात्री आठ वाजेपर्यंत कोणीही अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्याने उपस्थितांमधून संताप व्यक्त केला जात होता.

...................

संशयाची सुई

ज्याठिकाणी घटना घडली ती जागा सध्या येथील घरडा केमिकल कंपनीच्या ताब्यात असून, याठिकाणी येणारे पावसाचे पाणी वा रासायनिक सांडपाणी हे येथील घरडा कंपनी, युएसव्ही व एम्को पेस्टीसाईड यांचे असावे, असा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संशयाची सुई या तीन कंपन्यांभोवती फिरत असून, यातील दोषी कोण? हे प्रदूषण नियंत्रण मंडळ उघड करणार का? असा प्रश्न केला जात आहे.