शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

कोकण रेल्वे मार्गावर दिवस-रात्र ‘पहारा’

By admin | Updated: June 26, 2014 00:21 IST

५०० कर्मचारी तैनात : रत्नागिरी, बेलापूर, कारवारला नियंत्रण कक्ष, रत्नागिरी, वेर्ण्यात एआरएम व्हॅन सुविधा

रत्नागिरी : पावसाळी हंगामात कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास सुरक्षित होण्यासाठी मार्गावर २४ तास गस्त सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ५०० कर्मचारी डोळ्यात तेल घालून दिवस-रात्र पहारा देत आहेत. मार्गावर दर तासाला पावसाचे प्रमाण देणारी वर्षामापन यंत्रे बसविण्यात आली आहेत. बेलापूर, रत्नागिरी व कारवार येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून, ते पावसाळा संपेपर्यंत २४ तास कार्यरत राहणार आहेत. सुरक्षेबाबत आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक नंदू तेलंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोकण रेल्वेमार्गावरील पावसाळी सुरक्षिततेची माहिती आज, बुधवारी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. गेल्या काही वर्षांत सतत धोकादायक ठरलेल्या पोमेंडी व निवसर येथील उपाययोजनांसाठी पाहणी दौराही आयोजित केला होता. त्याआधी पत्रकार परिषदेत तेलंग यांनी उपायांची माहिती दिली. कोकण रेल्वेमार्गावर मान्सून ब्लॉक सेक्शन गस्तीची ७१, तर रेल्वे मार्गावरील बोगद्यांमधील गस्तीची ३८ ठिकाणे आहेत. कटिंग्जची २४ ठिकाणे आहेत. या सर्व ठिकाणी रात्रंदिवस गस्त सुरू आहे. त्यासाठी रेल्वेचे ३५०, तर १५० कंत्राटी कर्मचारी गस्तीचे काम करीत आहेत. याशिवाय धोक्याची सूचना देण्यासाठी मार्गावर एक किलोमीटरवर अंतरावर रेडिओ सॉकेट कॉल सिस्टीम बसविण्यात आली आहे. त्यामुळे काही आपत्ती आल्यास तत्काळ त्याबाबत नियंत्रण कक्षाला माहिती मिळणार आहे. सुरक्षाव्यवस्था पाहणाऱ्या गस्त कर्मचाऱ्यांकडे डिटोनेटर, रेट्रो रिफ्लेक्टिंग जॅकेट व अन्य सुरक्षा साहित्य देण्यात आले आहे. मार्गाच्या काही ठरावीक अंतरावर जनरेटर्सची व्यवस्थाही करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास रत्नागिरी, चिपळूण, खेड या ठिकाणी बेस्ट किचनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यावेळी सुमारे हजारपेक्षा अधिक लोकांना तातडीने भोजन व फराळाची व्यवस्था केली जाऊ शकेल. मात्र, अतिवृष्टी, मार्गालगत सापडणारी जांभ्या दगडाची माती (भूगर्भ शास्त्रज्ञांनाही विशेष आव्हान ठरणारी), भूगर्भीय संरचना ही आव्हाने आजही कोकण रेल्वेसमोर असल्याचे ते म्हणाले. कोकण रेल्वेचे रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक नंदू तेलंग यांच्यासमवेत कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता अलप्रकाश, मंजुनाथ, क्षेत्रीय अभियंता रेवनसिद्धाप्पा, सहायक वाणिज्य प्रबंधक सुनील नारकर, जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)