शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीत संजय कदम ‘जायंट किलर’

By admin | Updated: October 21, 2014 23:43 IST

तीन वर्षापूर्वी बंड : प्रस्थापित सूर्यकांत दळवींच्या साम्राज्याला जोरदार धक्का

शिवाजी गोरे- --प्रमुख पक्ष यावेळी स्वतंत्र लढल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लढती अटीतटीच्या होत्या. असे असले तरीही दापोली विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा सर्वात सुरक्षित व बालेकिल्ला असल्याचे बोलले जात होते. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी ५ वेळा निवडून जाण्याचा भीमपराक्रम केला होता. यावेळी ते षटकार मारणार असा सर्वांचाच अंदाज होता. सेनेच्या या जागेबाबत कुणालाही भीती नव्हती. मात्र त्यांचा पराभव करणारे राष्ट्रवादीचे नवखे तरूण उमेदवार संजय कदम खऱ्या अर्थाने कदम जायंट किलर ठरले आहेत.दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेला लोकसभा निवडणुकीतच धोक्याची घंटा वाजली होती. शिवसेना खासदार अनंत गीते यांना गेल्या वेळी दापोली विधानसभेतून ४८ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र २०१४ च्या निवडणुकीत अनंत गीते यांना जिंकण्यासाठी फार झगडावे लागले. शेवटच्या क्षणाला कुणबी समाजाचे कार्ड वापरल्याने त्याचा निसटता विजय झाला. मात्र दापोली विधानसभा मतदार संघातील ४८ हजारांचे मताधिक्य १४ हजार मतावर येवून ठेपल्याने अनंत गीते कुणबी समाजाचे असूनसुद्धा मतदारांनी त्यांना नाकारले हे सिद्ध झाले होते. अनंत गीते यांचे घटलेले मताधिक्य पाहून तरी वेळीच सावध होण्याची गरज असतानासुद्धा केवळ शिवसेना, भगवा झेंडा याभोवती भावनिक राजकारण सुरु ठेवले गेले.दापोली तालुक्यातील मतदार खेडच्या उमेदवाराला स्वीकारणार नाही हा फाजील आत्मविश्वास सेनेला नडला तर दुसरीकडे पक्षांतर्गत गटतटात तालुका सेना गुंतली होती. त्यामुळे विकास कामे व जनसंपर्काकडे दुर्लक्ष होत गेले. निवडणुकीच्या तोंडावर नारळ फोडणे व पुढील पाच वर्षासाठी मतदाराकडे झोळी पसरणे हा राजकीय हेतू ठेवून भूमिपूजनाचा सपाटा लावायचा परंतु प्रत्यक्षात मात्र विकास कामांच्या नावाने निष्क्रियपणा दाखवायचा हा प्रकार अलिकडे वाढला असल्याचे प्रत्येक गावात बोलले जात होते. परंतु उघडपणे बोलून कोणी रोष पत्करायला तयार नव्हते. केवळ निवडणुकीपुरत्या आश्वासनांना जनता कंटाळली होती. त्याचाच उद्रेक मतपेटीतून झाला.दरम्यानच्या काळात जनता सक्षम पर्याय शोधत होती. परंतु सक्षम विरोधक न मिळाल्याने स्थानिक राजकारणापासून रामदास कदम यांनी लक्ष काढून घेतल्याने दापोलीच्या राजकारणात सर्व काही अलबेल होते. एक वर्षापूर्वी दसऱ्यादरम्यान रामदास कदम यांनी दाभोळ चंडिकेचे दर्शन घेण्यासाठी दापोलीत एन्ट्री केली व अनेकांच्या भुवया उंचावल्या. रामदास कदम यांनी आपण दापोलीतून इच्छुक असल्याचे वक्तव्य करुन अनेकांना धक्का दिला. सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. रामदास कदमांची एंट्री पालगड गटाचे जि.प. सदस्य राजेंद्र फणसेंमुळेच झाली असा ठपका ठेवून त्यांना डावलण्यात येत असल्याचे वारंवार उघड झाले. फणसे यांचे विरोधात पालगड येथे त्यानंतर दापोली येथे सभा घेऊन फणसे प्रकरण चर्चेचे गुऱ्हाळ बनले होते. या सर्व प्रकरणात सेना अडकली असताना राष्ट्रवादीने आपला जनसंपर्क सुरुच ठेवला होता.सेनेतून बाहेर पडलेले किशोर देसाई राष्ट्रवादीत आले व राष्ट्रवादी खऱ्या झंजावाताची सुरुवात झाली. सेना स्टाईलने त्यांना पक्षाच्या माध्यमातून गावागावात पक्ष बांधणी केली. पक्ष वाढला परंतु सेनेला शह देण्याएवढी देसाईकडे ताकद नव्हती. परंतु ३ वर्षापूर्वी दळवी यांच्या विरोधात बंड करुन शिवसेनेतून कदम यांनी बाहेर पडून शक्तीप्रदर्शन घडविले व कदम यांनी जायंट किलरची भूमिका निभावली.