शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

दापोलीत संजय कदम ‘जायंट किलर’

By admin | Updated: October 21, 2014 23:43 IST

तीन वर्षापूर्वी बंड : प्रस्थापित सूर्यकांत दळवींच्या साम्राज्याला जोरदार धक्का

शिवाजी गोरे- --प्रमुख पक्ष यावेळी स्वतंत्र लढल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लढती अटीतटीच्या होत्या. असे असले तरीही दापोली विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा सर्वात सुरक्षित व बालेकिल्ला असल्याचे बोलले जात होते. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी ५ वेळा निवडून जाण्याचा भीमपराक्रम केला होता. यावेळी ते षटकार मारणार असा सर्वांचाच अंदाज होता. सेनेच्या या जागेबाबत कुणालाही भीती नव्हती. मात्र त्यांचा पराभव करणारे राष्ट्रवादीचे नवखे तरूण उमेदवार संजय कदम खऱ्या अर्थाने कदम जायंट किलर ठरले आहेत.दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेला लोकसभा निवडणुकीतच धोक्याची घंटा वाजली होती. शिवसेना खासदार अनंत गीते यांना गेल्या वेळी दापोली विधानसभेतून ४८ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र २०१४ च्या निवडणुकीत अनंत गीते यांना जिंकण्यासाठी फार झगडावे लागले. शेवटच्या क्षणाला कुणबी समाजाचे कार्ड वापरल्याने त्याचा निसटता विजय झाला. मात्र दापोली विधानसभा मतदार संघातील ४८ हजारांचे मताधिक्य १४ हजार मतावर येवून ठेपल्याने अनंत गीते कुणबी समाजाचे असूनसुद्धा मतदारांनी त्यांना नाकारले हे सिद्ध झाले होते. अनंत गीते यांचे घटलेले मताधिक्य पाहून तरी वेळीच सावध होण्याची गरज असतानासुद्धा केवळ शिवसेना, भगवा झेंडा याभोवती भावनिक राजकारण सुरु ठेवले गेले.दापोली तालुक्यातील मतदार खेडच्या उमेदवाराला स्वीकारणार नाही हा फाजील आत्मविश्वास सेनेला नडला तर दुसरीकडे पक्षांतर्गत गटतटात तालुका सेना गुंतली होती. त्यामुळे विकास कामे व जनसंपर्काकडे दुर्लक्ष होत गेले. निवडणुकीच्या तोंडावर नारळ फोडणे व पुढील पाच वर्षासाठी मतदाराकडे झोळी पसरणे हा राजकीय हेतू ठेवून भूमिपूजनाचा सपाटा लावायचा परंतु प्रत्यक्षात मात्र विकास कामांच्या नावाने निष्क्रियपणा दाखवायचा हा प्रकार अलिकडे वाढला असल्याचे प्रत्येक गावात बोलले जात होते. परंतु उघडपणे बोलून कोणी रोष पत्करायला तयार नव्हते. केवळ निवडणुकीपुरत्या आश्वासनांना जनता कंटाळली होती. त्याचाच उद्रेक मतपेटीतून झाला.दरम्यानच्या काळात जनता सक्षम पर्याय शोधत होती. परंतु सक्षम विरोधक न मिळाल्याने स्थानिक राजकारणापासून रामदास कदम यांनी लक्ष काढून घेतल्याने दापोलीच्या राजकारणात सर्व काही अलबेल होते. एक वर्षापूर्वी दसऱ्यादरम्यान रामदास कदम यांनी दाभोळ चंडिकेचे दर्शन घेण्यासाठी दापोलीत एन्ट्री केली व अनेकांच्या भुवया उंचावल्या. रामदास कदम यांनी आपण दापोलीतून इच्छुक असल्याचे वक्तव्य करुन अनेकांना धक्का दिला. सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. रामदास कदमांची एंट्री पालगड गटाचे जि.प. सदस्य राजेंद्र फणसेंमुळेच झाली असा ठपका ठेवून त्यांना डावलण्यात येत असल्याचे वारंवार उघड झाले. फणसे यांचे विरोधात पालगड येथे त्यानंतर दापोली येथे सभा घेऊन फणसे प्रकरण चर्चेचे गुऱ्हाळ बनले होते. या सर्व प्रकरणात सेना अडकली असताना राष्ट्रवादीने आपला जनसंपर्क सुरुच ठेवला होता.सेनेतून बाहेर पडलेले किशोर देसाई राष्ट्रवादीत आले व राष्ट्रवादी खऱ्या झंजावाताची सुरुवात झाली. सेना स्टाईलने त्यांना पक्षाच्या माध्यमातून गावागावात पक्ष बांधणी केली. पक्ष वाढला परंतु सेनेला शह देण्याएवढी देसाईकडे ताकद नव्हती. परंतु ३ वर्षापूर्वी दळवी यांच्या विरोधात बंड करुन शिवसेनेतून कदम यांनी बाहेर पडून शक्तीप्रदर्शन घडविले व कदम यांनी जायंट किलरची भूमिका निभावली.