शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दापोली आगार समस्यांच्या गर्तेत

By admin | Updated: July 21, 2014 23:38 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : हेच का बहुजन हिताय बहुजन सुखाय

दापोली : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन सुरु झालेली एस. टी. गरीब व बहुजनवर्गाला सुरुवातीच्या काळात आधारस्तंभ वाटत होती. मात्र, बदलत्या काळाप्रमाणे एस. टी. महामंडळाने सुविधा न दिल्याने दापोलीचे एस. टी. आगार विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहे.दापोली एस. टी. आगारातील प्रवाशांना अनेक समस्यांसह दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. आगारातील प्रवासी शेड प्रवाशांचा मुख्य निवारा असतो. परंतु ही प्रवासीशेडच नादुरुस्त असल्याने झाडावरून अंगावर पाणी टपकावे, त्याप्रमाणे ही प्रवासी शेड पावसात गळू लागली आहे. शेडमध्ये गळती होऊ लागल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे पावसाचे पाणी शेडमध्ये मोठ्या प्रमाणात साठत आहे. रात्री - अपरात्री प्रवास करुन आल्यावर शेडमध्ये बसण्यासाठी पुरेशी बाकडी नाहीत. रात्रीच्या वेळी आगारात पिण्याचे पाणी मिळत नाही. दिवसा दुकाने उघडी असल्याने मिनरल वॉटर मिळू शकते किंवा हॉटेलमध्ये जाऊन प्रवासी पाणी पिऊ शकतात. परंतु रात्रीचे काय? एस. टी. आगारातील पिण्याच्या पाण्याचा कुलर आहे. परंतु तो केवळ शोभेसाठी ठेवला आहे. या कुलरचे पाणी एप्रिल, मे महिन्यात प्रवाशांना मिळत नाहीच, शिवाय आता पावसाळ्यातही त्यातून पाणी मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दापोली आगारातील सर्वांत मोठी गैरसोय म्हणजे एस. टी. कँटिन होय. येथील कँटिन गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्याचप्रमाणे दापोली ते रत्नागिरी मार्गावरील एस. टी. प्रशासनाची बहुतांश कँटिन बंद आहेत. त्या सुरू कराव्यात. येथील एस. टी. आगाराच्या आवारामध्ये कँटिन नसल्याने प्रवाशांची फार गैरसोय होत आहे. त्यामुळे परगावच्या नाष्टा किंवा भोजनासाठी बाहेरच्या हॉटेलचा पर्याय प्रवाशांना शोधावा लागत आहे.आगारातील दुर्गंधी ही प्रवाशांची रोजची डोकेदुखी बनली आहे. दापोली एस. टी. आगारातील कॅम्पसमध्ये सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्याचबरोबर आगारातील दुर्गंधीमुळे प्रवाशांना नाक मुठीत धरुन बसावे लागते.आगारात पाऊल टाकताच आपण कुठेतरी चुकीच्या ठिकाणी आलोय की काय, असा भास प्रवाशांना होतो. एस. टी. आगारातील कॅम्पसमधे कचऱ्याचे अनेक ढीग आहेत. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असून, सुलभ शौचालयाचा वाससुद्धा सर्वत्र येतो. आगारात दत्त मंदिर आहे. या मंदिरात भाविक प्रवासी येतात. परंतु दुर्गंधीमुळे मंदिराचे पावित्र्यही धोक्यात आले आहे.दापोली एस. टी. आगारात प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. प्रवाशांच्या करमणुकीसाठी टी. व्ही. लावण्यात आला ओह. परंतु हा टी. व्ही.सुद्धा बऱ्याचदा बंद असतो. आगारातील बऱ्याच एस. टी. पावसाळ्यात झाडासारख्या गळत आहेत. त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. प्रवाशांना कर्मचाऱ्यांकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही. प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. कर्मचाऱ्यांनासुद्धा अपुऱ्या सुविधा मिळत असल्याने प्रवाशांप्रमाणे त्यांचीही गैरसोय होत आहे. (प्रतिनिधी)