शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आरे-वारे होतोय धोकादायक?

By admin | Updated: September 11, 2014 23:03 IST

उपाययोजना हवी : दरडीचा धोका कायम

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे, मालगुंड व जयगड या गावांना जोडणारा जवळचा व रत्नागिरीला जाणारा आरे-वारे मार्ग दिवसेंदिवस धोकादायक होत आहे.रत्नागिरी तालुक्यातील सागरी महामार्गअंतर्गत झालेला जयगड, उंडी, रीळ, वरवडे, मालगुंड, गणपतीपुळे, भंडारपुळेमार्गे आरे-वारे रत्नागिरी हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे मार्गावर वाहने कसरत करताना दिसून येतात. यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. तसेच या मार्गावरुन जाणाऱ्या तातडीच्या रुग्णाला वा गर्भवती महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर सर्वांत जास्त खड्ड्यांचे साम्राज्य भंडारपुळे, नेवरे काजीरभाटी, कासारवेली ते शिरगाव या भागात आहे.भंडारपुळेतील अरुंद व खड्डेमय रस्ता, तीव्र उतारावरील वेडीवाकडी वळणे तसेच रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होते व अपघात होतात. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. भंडारपुळे ते नेवरे काजीरभाटी या दरम्यान असलेली वेडीवाकडी वळणे, अरुंद रस्ता व रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नाही. यामुळे अपघातात आणखी भर पडत आहे.भंडारपुळेतील नांदियाच्या डोंगरावरील रस्त्याच्या दुतर्फा दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्या देखील आहेत. तसेच आणखी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास व वाहतूक करणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.या मार्गाची संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांनी पाहणी करुन मार्गातील अडथळे व धोके दूर करावेत, अशी मागणी गणपतीपुळे, भंडारपुळे, मालगुंड, निवेंडी आदी परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)