शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

आरे-वारे होतोय धोकादायक?

By admin | Updated: September 11, 2014 23:03 IST

उपाययोजना हवी : दरडीचा धोका कायम

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे, मालगुंड व जयगड या गावांना जोडणारा जवळचा व रत्नागिरीला जाणारा आरे-वारे मार्ग दिवसेंदिवस धोकादायक होत आहे.रत्नागिरी तालुक्यातील सागरी महामार्गअंतर्गत झालेला जयगड, उंडी, रीळ, वरवडे, मालगुंड, गणपतीपुळे, भंडारपुळेमार्गे आरे-वारे रत्नागिरी हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे मार्गावर वाहने कसरत करताना दिसून येतात. यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. तसेच या मार्गावरुन जाणाऱ्या तातडीच्या रुग्णाला वा गर्भवती महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर सर्वांत जास्त खड्ड्यांचे साम्राज्य भंडारपुळे, नेवरे काजीरभाटी, कासारवेली ते शिरगाव या भागात आहे.भंडारपुळेतील अरुंद व खड्डेमय रस्ता, तीव्र उतारावरील वेडीवाकडी वळणे तसेच रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होते व अपघात होतात. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. भंडारपुळे ते नेवरे काजीरभाटी या दरम्यान असलेली वेडीवाकडी वळणे, अरुंद रस्ता व रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नाही. यामुळे अपघातात आणखी भर पडत आहे.भंडारपुळेतील नांदियाच्या डोंगरावरील रस्त्याच्या दुतर्फा दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्या देखील आहेत. तसेच आणखी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास व वाहतूक करणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.या मार्गाची संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांनी पाहणी करुन मार्गातील अडथळे व धोके दूर करावेत, अशी मागणी गणपतीपुळे, भंडारपुळे, मालगुंड, निवेंडी आदी परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)