शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

धरण उशाला, कोरड घशाला

By admin | Updated: October 1, 2016 00:17 IST

संगमेश्वर तालुका : गडनदी धरणाच्या पाण्यावाचून पायथ्याची गावे तहानलेलीच

देवरुख : संगमेश्वर तालुक्यात जलसंपदा विभागाने महत्त्वाकांक्षी असा गडनदी प्रकल्प उभा केला. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तब्बल ३३ वर्ष लागली. या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही येथील कालवे अपूर्ण असल्याने धरणाच्या पायथ्याची असलेली शेती कोरडीच राहणार आहे. त्यामुळे ‘धरण उशाला, कोरड घशाला’ म्हणण्याची वेळ स्थानिक ग्रामस्थांवर आली आहे.गडनदी प्रकल्प उभारणीसाठी ६५१ कोटी रुपये खर्च झाला आहे. परंतु, येथील कालवे अपूर्ण असल्याने सिंंचन क्षेत्र वाढविण्याचा शासनाचा मुख्य हेतू असफल होताना दिसत आहे. गडनदी धरणाचा उजवा कालवा ४७ किलोमीटरवर आहे तर डावा कालवा हा २७ किलोमीटरवर आहे. मात्र, हे दोन्ही कालवे अपूर्णावस्थेत आहेत. सध्या धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र, कालवे नसल्याने हे पाणी सिंचनासाठी वापरता येत नाही.गडनदी धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या कुचांबे व कुंभारखणी गावांना या कालव्यांतून वगळल्याने दोनही गावातील शेती कोरडीच राहिली आहे. कुंभारखणी गावासाठी ‘रिव्हर्स’ कालवा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, स्थानिकांना हा प्रस्ताव मान्य नसल्याने तोही बारगळला. यानंतर धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या कुचांबे व कुंभारखणी गावाला लाभक्षेत्रात आणण्यासाठी धरणाला जोडून डावा कालवा तयार करण्यात यावा, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. कुंभारखणीचे सरपंच दिलीप सुर्वे यांनी ही भूमिका मांडतानाच परिसरातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ उभी करणार असल्याचे सांगितले. आधुनिक पध्दतीचा अवलंब करुन ही दोन्ही गावे कालव्याच्या लाभक्षेत्रात आणावीत यासाठी प्रयत्न सुरु असून, शेतकऱ्यांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही सुर्वे यांनी केले आहे.जलसंपदा विभाग आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कालवे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच धर्तीवर कोकणातील गडनदी धरणासह अन्य काही प्रकल्पांवर पाईपलाईनचा वापर करुन त्याद्वारे कालवे तयार करण्याची तयारी सुरु आहे. यामुळे कालव्याच्या खोदकामासाठी लागणारी शेतकऱ्यांची जमीन वाचणार असून, शासनाच्या खर्चातही कपात होणार आहे. याच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कुचांबे व कुंभारखणी या गावांसाठी कालवा तयार करावा, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देणार असल्याचे सरपंच दिलीप सुर्वे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सक्षम बनवण्याचा हेतू : नाबार्डकडून निधीगडनदी प्रकल्पाचा पंतप्रधान कृषी सिंंचन योजनेत समावेश करण्यात आल्याने शेतकऱ्याला सक्षम बनवण्याचा केंद्रासह राज्य सरकारचा हेतू आहे. मात्र, याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्याशिवाय शेतकरी समृध्द होणार नाही. या प्रकल्प पूर्ततेसाठी शासनस्तरावर हालचाली सुरु आहेत. ‘नाबार्ड’कडून १८६ कोटी रुपये मंजूर झाले असून, उर्वरीत कामे पूर्ण करण्यासाठी मंत्रालयस्तरावर हालचाली सुरु आहेत.