शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

धरण उशाला, कोरड घशाला

By admin | Updated: October 1, 2016 00:17 IST

संगमेश्वर तालुका : गडनदी धरणाच्या पाण्यावाचून पायथ्याची गावे तहानलेलीच

देवरुख : संगमेश्वर तालुक्यात जलसंपदा विभागाने महत्त्वाकांक्षी असा गडनदी प्रकल्प उभा केला. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी तब्बल ३३ वर्ष लागली. या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही येथील कालवे अपूर्ण असल्याने धरणाच्या पायथ्याची असलेली शेती कोरडीच राहणार आहे. त्यामुळे ‘धरण उशाला, कोरड घशाला’ म्हणण्याची वेळ स्थानिक ग्रामस्थांवर आली आहे.गडनदी प्रकल्प उभारणीसाठी ६५१ कोटी रुपये खर्च झाला आहे. परंतु, येथील कालवे अपूर्ण असल्याने सिंंचन क्षेत्र वाढविण्याचा शासनाचा मुख्य हेतू असफल होताना दिसत आहे. गडनदी धरणाचा उजवा कालवा ४७ किलोमीटरवर आहे तर डावा कालवा हा २७ किलोमीटरवर आहे. मात्र, हे दोन्ही कालवे अपूर्णावस्थेत आहेत. सध्या धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र, कालवे नसल्याने हे पाणी सिंचनासाठी वापरता येत नाही.गडनदी धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या कुचांबे व कुंभारखणी गावांना या कालव्यांतून वगळल्याने दोनही गावातील शेती कोरडीच राहिली आहे. कुंभारखणी गावासाठी ‘रिव्हर्स’ कालवा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, स्थानिकांना हा प्रस्ताव मान्य नसल्याने तोही बारगळला. यानंतर धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या कुचांबे व कुंभारखणी गावाला लाभक्षेत्रात आणण्यासाठी धरणाला जोडून डावा कालवा तयार करण्यात यावा, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. कुंभारखणीचे सरपंच दिलीप सुर्वे यांनी ही भूमिका मांडतानाच परिसरातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ उभी करणार असल्याचे सांगितले. आधुनिक पध्दतीचा अवलंब करुन ही दोन्ही गावे कालव्याच्या लाभक्षेत्रात आणावीत यासाठी प्रयत्न सुरु असून, शेतकऱ्यांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहनही सुर्वे यांनी केले आहे.जलसंपदा विभाग आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कालवे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच धर्तीवर कोकणातील गडनदी धरणासह अन्य काही प्रकल्पांवर पाईपलाईनचा वापर करुन त्याद्वारे कालवे तयार करण्याची तयारी सुरु आहे. यामुळे कालव्याच्या खोदकामासाठी लागणारी शेतकऱ्यांची जमीन वाचणार असून, शासनाच्या खर्चातही कपात होणार आहे. याच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कुचांबे व कुंभारखणी या गावांसाठी कालवा तयार करावा, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबत ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देणार असल्याचे सरपंच दिलीप सुर्वे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सक्षम बनवण्याचा हेतू : नाबार्डकडून निधीगडनदी प्रकल्पाचा पंतप्रधान कृषी सिंंचन योजनेत समावेश करण्यात आल्याने शेतकऱ्याला सक्षम बनवण्याचा केंद्रासह राज्य सरकारचा हेतू आहे. मात्र, याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्याशिवाय शेतकरी समृध्द होणार नाही. या प्रकल्प पूर्ततेसाठी शासनस्तरावर हालचाली सुरु आहेत. ‘नाबार्ड’कडून १८६ कोटी रुपये मंजूर झाले असून, उर्वरीत कामे पूर्ण करण्यासाठी मंत्रालयस्तरावर हालचाली सुरु आहेत.