शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

तौक्ते वादळामुळे तालुक्यात एक काेटीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

राजापूर : तौक्ते वादळाचा राजापूर तालुक्याला जोरदार तडाखा बसला. अनेक ठिकाणी घरे, गोठे यासह विजेचे खांब पडून पडझड झाली. ...

राजापूर : तौक्ते वादळाचा राजापूर तालुक्याला जोरदार तडाखा बसला. अनेक ठिकाणी घरे, गोठे यासह विजेचे खांब पडून पडझड झाली. त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, प्रथमदर्शनी पंचनाम्याच्या आलेल्या अहवालानुसार सुमारे एक कोटी चार लाख ४४ हजार ४७१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकसानीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली. अनेक घरे, गोठे यांचे छप्पर उडून वा घरावर झाडे पडून नुकसान झाले आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्याद्वारे पुढे आले आहे. त्यामध्ये कच्चे आणि पक्के अशा ६७६ घरांचे तर ४६ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. दहा अंगणवाड्यांसह प्रत्येकी चार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, ३५ शाळांच्या इमारती, चार ग्रामपंचायतीचेही नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळून आणि वीजवाहिन्या तुटून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे. सद्य:स्थितीमध्ये पूर्ण झालेल्या पंचनाम्यानुसार कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडून तर काही ठिकाणी वीजवाहिन्या तुटून नुकसान झाले आहे. त्यांच्या जोडणीचे काम सुरू असून, काही गावांमधील जोडणीचे पूर्ण होऊन खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववतपणे सुरू झाला आहे.